Weather Update : राज्यात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस व गारपीटीचा इशारा!

हवामान खात्याकडून 'या' जिल्ह्यात यलो तर काही भागात ऑरेंज अलर्ट, जाणून घ्या सविस्तर माहिती


मुंबई : मुंबईसह कोकणात उन्हाचा पारा वाढला असताना, राज्यात इतर ठिकाणी अवकाळी पावसामुळे उन्हाच्या कडाक्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. विदर्भ, मराठवाडा यासह मध्य महाराष्ट्रातही अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मात्र अनेक भागात मेघगर्जनेसह पावसाने पहाटेपासूनच हजेरी लावल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशाच काही जिल्ह्यात हवामान खात्याने (Meteorological Department) अवकाळी पावसासह गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली असून अलर्ट दिला आहे.



'या' जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता


भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या ताज्या अंदाजानुसार, आज पुणे, नाशिक, सोलापूर, सांगली, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. यावेळी सोसाट्याचा वारा पाहायला मिळणार असून वाऱ्याचा वेग ४० ते ५० किमी प्रति तास असण्याची शक्यता आहे.



'या' भागात पावसाचा यलो आणि ऑरेंज अलर्ट


हवामान विभागाने नाशिक, अहमदनगर, पुणे, सांगली, सोलापूर, औरंगाबाद या भागात पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. तर सातारा, कोल्हापूर, जळगाव नंदुरबार, धुळे या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्याला आज पाऊस आणि गारपीट होण्याचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.



विदर्भात पावसासह गारपीट होण्याची शक्यता


याशिवाय, मराठवाड्यात आज पावसाची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट होण्याचाही अंदाज आहे. अहमदनगर, जालना, परभणी, बीड या भागात तुरळक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. याशिवाय काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. तर उद्या या भागात वातावरण सामान्य राहण्याचा अंदाज असून पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

Comments
Add Comment

साखरपुड्यानंतर ४ दिवसांत जोडप्याचा दुर्दैवी अंत; धाराशिवमध्ये कारचा भीषण अपघात

धाराशिव : लग्नसमारंभाला अवघे काही दिवस बाकी असताना दोन कुटुंबांवर काळाने घाला घातला आहे. धाराशिव जिल्ह्यातील

राज्यात 'लव्ह जिहाद व अवैध धर्मांतर विरोधी' कायदा तात्काळ करण्याच्या मागणीला जोर

- हिंदू जनजागृती समितीसह हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून राज्यभर ठिकठिकाणी प्रशासनाला निवेदने मुंबई : गेल्या दोन

चेन्नईत बीचवर अडकले महाराष्ट्रातील विद्यार्थी, मुख्यमंत्री तामिळनाडू सरकारच्या संपर्कात

मुंबई : चेन्नई (तामिळनाडू) येथील गोल्डन बीचवर फिरण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या गटासोबत

Solapur Crime: हातावर सुसाईट नोट लिहत विवाहितेने संपवलं आयुष्य; सोलापुरातील नातेपुते शहरातील हृदयद्रावक घटना

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथे एका विवाहितेने आपल्या हातावर मजकूर लिहून आत्महत्या केल्याने खळबळ

आता… ‘गाव तिथे एसटी’ नव्हे... ‘आदिवासी पाडा, तिथे एसटी’! - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

सह्याद्री व मेळघाटच्या कुशीत, धुक्याने वेढलेल्या डोंगरदऱ्यांमध्ये, आजवर केवळ पायवाटांनीच ओलांडलेले अंतर आता

Mumbai-Nashik Local Train: मुंबई-नाशिक लोकलसेवा सुरु होणार; रेल्वे मार्गाच्या विस्ताराला मंजुरी

मुंबई: मुंबई आणि नाशिक या दोन महत्त्वाच्या शहरांमधील प्रवास आता अधिक वेगवान आणि सुखकर होणार आहे. मुंबईच्या