MP Loksabha Election : निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! 'या' चार मतदान केंद्रावर होणार फेरमतदान

जाणून घ्या नेमकं कारण काय?


मध्य प्रदेश : लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election 2024) रणधुमाळी सुरु असताना निवडणुकीचे पहिले, दुसरे आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदान (voting) पार पडले आहे. मात्र मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात चार ठिकाणी पुन्हा मतदान होणार असल्याची अधिसूचना निवडणूक आयोगाकडून जाहीर केली आहे. बैतूलमध्ये तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे रोजी यशस्वीरित्या पार पडले होते. मात्र, मतदान झाल्यानंतर साहित्य घेऊन जाणाऱ्या बसला आग लागली होती. त्यामुळे या भागात फेरमतदान होणार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.


७ मे रोजी बसला लागलेल्या आगीमुळे बसमधील काही ईव्हीएम मशीन्स जळाले होते. त्यामुळे फेरमतदानाचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात ४ ठिकाणी १० मे रोजी फेरमतदान पार पडणार आहे. बैतूल लोकसभा मतदारसंघातील मुलताई येथील ४ मतदान केंद्रांवर हे फेरमतदान होणार आहे.



'या' चार जागांवर पुन्हा मतदान होणार


बैतूल लोकसभा मतदारसंघातील मुलताई येथील बुथ २७५- राजापूर, बुथ २७६- दुदर रयत, बुथ २७९- कुंदा रयत आणि बुथ २८०- चिखलीमाळ या ठिकाणी फेरमतदान होणार आहे. या फेरमतदानासाठी प्रशासनाकडून आवश्यक तयारी करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.


Comments
Add Comment

तिरुपती लाडू वाद पुन्हा पेटला, लाडूवात बाथरूम साफ करायचे केमिकल...... ; मुख्यमंत्री नायडूंचे गंभीर आरोप

तिरुपती : तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादाच्या शुद्धतेवरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा चर्चेच्या

इराणने पुन्हा एकदा जगाची झोप उडवली, इराणच्या क्षेपणास्त्राची धक्कादायक रेंज, जाणून घ्या

दिल्ली: अमेरिका आणि इराण या दोन देशांमधील तणावाने जगाचं टेन्शन वाढलं आहे. कोणत्याही क्षणी अमेरिका इराणवर हल्ला

Sikkim Earthquake: सिक्कीममध्ये जाणवले चक्क १३ भूकंपाचे धक्के

सिक्कीम: सिक्कीमच्या काही भागात चक्क १३ भूकंपाचे धक्के जाणवले. गुरुवारी रात्री उशिरा ते शुक्रवार सकाळपर्यंत हे

Bharat Taxi App: भारतीय टॅक्सी चालक ओला किंवा उबरपेक्षा किती जास्त कमावू शकतात?, जाणून घ्या...

मुंबई: जर तुम्ही ओला किंवा उबरने दररोज प्रवास करत असाल किंवा टॅक्सी चालवून उदरनिर्वाह करत असाल, तर ही बातमी

Maharashtra's Rajya Sabha Seats : महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांची निवडणूक 'बिनविरोध' होणार? शरद पवारांच्या जागेवरही टांगती तलवार

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयाचा फायदा आता महायुतीला राज्यसभेतही मिळणार

चेन्नईमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, H5N1 विषाणूमुळे शेकडो कावळे मृत्युमुखी; सरकारकडून महत्त्वाच्या सूचना जारी

चेन्नई: तामिळनाडूची राजधानी चेन्नईत बर्ड फ्लूचा इशारा देण्यात आला आहे. चेन्नईमध्ये शेकडो कावळे मृत आढळले आहेत.