MP Loksabha Election : निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! 'या' चार मतदान केंद्रावर होणार फेरमतदान

  114

जाणून घ्या नेमकं कारण काय?


मध्य प्रदेश : लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election 2024) रणधुमाळी सुरु असताना निवडणुकीचे पहिले, दुसरे आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदान (voting) पार पडले आहे. मात्र मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात चार ठिकाणी पुन्हा मतदान होणार असल्याची अधिसूचना निवडणूक आयोगाकडून जाहीर केली आहे. बैतूलमध्ये तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे रोजी यशस्वीरित्या पार पडले होते. मात्र, मतदान झाल्यानंतर साहित्य घेऊन जाणाऱ्या बसला आग लागली होती. त्यामुळे या भागात फेरमतदान होणार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.


७ मे रोजी बसला लागलेल्या आगीमुळे बसमधील काही ईव्हीएम मशीन्स जळाले होते. त्यामुळे फेरमतदानाचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात ४ ठिकाणी १० मे रोजी फेरमतदान पार पडणार आहे. बैतूल लोकसभा मतदारसंघातील मुलताई येथील ४ मतदान केंद्रांवर हे फेरमतदान होणार आहे.



'या' चार जागांवर पुन्हा मतदान होणार


बैतूल लोकसभा मतदारसंघातील मुलताई येथील बुथ २७५- राजापूर, बुथ २७६- दुदर रयत, बुथ २७९- कुंदा रयत आणि बुथ २८०- चिखलीमाळ या ठिकाणी फेरमतदान होणार आहे. या फेरमतदानासाठी प्रशासनाकडून आवश्यक तयारी करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.


Comments
Add Comment

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )