MP Loksabha Election : निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! 'या' चार मतदान केंद्रावर होणार फेरमतदान

जाणून घ्या नेमकं कारण काय?


मध्य प्रदेश : लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election 2024) रणधुमाळी सुरु असताना निवडणुकीचे पहिले, दुसरे आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदान (voting) पार पडले आहे. मात्र मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात चार ठिकाणी पुन्हा मतदान होणार असल्याची अधिसूचना निवडणूक आयोगाकडून जाहीर केली आहे. बैतूलमध्ये तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे रोजी यशस्वीरित्या पार पडले होते. मात्र, मतदान झाल्यानंतर साहित्य घेऊन जाणाऱ्या बसला आग लागली होती. त्यामुळे या भागात फेरमतदान होणार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.


७ मे रोजी बसला लागलेल्या आगीमुळे बसमधील काही ईव्हीएम मशीन्स जळाले होते. त्यामुळे फेरमतदानाचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात ४ ठिकाणी १० मे रोजी फेरमतदान पार पडणार आहे. बैतूल लोकसभा मतदारसंघातील मुलताई येथील ४ मतदान केंद्रांवर हे फेरमतदान होणार आहे.



'या' चार जागांवर पुन्हा मतदान होणार


बैतूल लोकसभा मतदारसंघातील मुलताई येथील बुथ २७५- राजापूर, बुथ २७६- दुदर रयत, बुथ २७९- कुंदा रयत आणि बुथ २८०- चिखलीमाळ या ठिकाणी फेरमतदान होणार आहे. या फेरमतदानासाठी प्रशासनाकडून आवश्यक तयारी करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.


Comments
Add Comment

Andhra Pradesh Accident : आंध्र प्रदेशात खासगी ट्रॅव्हलची डंपरला जोरदार धडक; १३ जणांचा होरपळून मृत्यू

आंध्र प्रदेशातील मार्कापुरम जिल्ह्यात आज पहाटेच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली आहे. रायवरमजवळ एका खासगी

PM Narendra Modi : जगात मोदींचीच हवा! पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा बनले जगातील सर्वात लोकप्रिय नेते

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जागतिक स्तरावर सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून समोर आले आहेत.

खराब जेवण देणं पडलं महागात, भारतीय रेल्वेने आकारला ६० लाख रुपयांचा दंड

मुंबई: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. निकृष्ट दर्जाचे अन्न

रशियाकडून ६ कोटी बॅरल तेल खरेदी, एप्रिल महिन्यात होणार पुरवठा

नवी दिल्ली : आखाती देशातील युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून तब्बल ६ कोटी बॅरल तेलाची खरेदी केली

देशामध्ये १०० नवीन विमानतळ, २०० हेलीपॅड उभारणार, केंद्रीय मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत देशाच्या विमान वाहतूक, इमिग्रेशन आणि

देशभरात पेट्रोल-डिझेल, एलपीजीचा पुरवठा सुरळीत, सर्वपक्षीय बैठकीत सरकारची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली  : पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठकीचे