Devendra Fadnavis : मानसिक संतुलन बिघडलेले उद्धवजी पवार साहेब सांगतील तेच करतील!

देवेंद्र फडणवीस यांची विरोधकांवर बोचरी टीका


छत्रपती संभाजीनगर : देशभरात निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) रणधुमाळीत निवडणुकीचे तिन्ही टप्पे यशस्वीरित्या पार पडले आहेत. आता निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याला वेग आला असून सर्व नेते आपल्या प्रचारात गुंतलेले आहेत. अशाच प्रचार सभांच्या दरम्यान बडे बडे नेते विरोधकांवर हल्लाबोल करत आहेत. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) छत्रपती संभाजीनगरमधून विरोधकांवर चांगलाच टोला लगावला आहे.


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना, उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधला आहे. अजित पवार यांनी उद्धव ठाकरे पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन करणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. यावरून देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, अजित पवार उद्धव ठाकरेंना किती ओळखतात, हे मला माहीत नाही. पण मी उद्धवजी यांना चांगलं ओळखलं आहे. सध्या उद्धव ठाकरे यांचा मार्गदर्शक शरद पवार आहेत. त्यामुळे पवार साहेब (Sharad Pawar) जे म्हणतील तेच उद्धवजी करतात, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.



उद्धवजी आणि संजय राऊत यांचा मानसिक बॅलन्स गेला आहे


तसेच देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंसह संजय राऊतांवरही टीकास्त्र सोडले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धवजी आणि संजय राऊत यांचा मानसिक बॅलन्स गेलेला आहे. त्यांना मेडिकल हेल्पची आवश्यकता आहे. त्यांनी एखाद्या चांगल्या मानसोपचार तज्ञाला दाखवावं. त्यांची मदत घ्यावी. त्यांच्या लक्षात आलंय की, जनतेने आपल्याला रिजेक्ट केलेलं आहे. म्हणून ते आता शिवीगाळ करण्यावर उतरलेले आहेत. त्यांचं खरोखर मानसिक संतुलन बिघडलं असल्याची टिका देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.

Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा