Utkarsha Rupwate : वंचितच्या शिर्डीमधील उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या गाडीवर दगडफेक!

हल्लेखोर घटनास्थळावरुन पसार


शिर्डी : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर राज्यात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. राजकीय नेत्यांच्या गाड्या फोडण्याचे व अपघात होण्याचे प्रकार तर दर आठवड्याला घडत आहेत. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aghadi) शिर्डी लोकसभा (Shirdi Loksabha) मतदारसंघातील उमेदवार उत्कर्षा रुपवते (Utkarsha Rupwate) यांच्या गाडीवर काल हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गाडीच्या समोरील काचा फुटल्या असून उत्कर्षा रुपवते सुखरूप आहेत.


उत्कर्षा रुपवते या काल रात्री अकोले राजूर (जिल्हा अहिल्यानगर) येथील प्रचारदौरा संपवून संगमनेरला परत येत असताना त्यांच्या कारवर दगडफेक झाली. रस्त्यालगतच्या झाडीतून दगडफेक करत हा हल्ला करण्यात आला. दगडफेकीनंतर हल्लेखोर घटनास्थळावरुन पळून गेले.


गाडीवर झालेल्या दगडफेकीनंतर उत्कर्षा यांनी कार्यकर्त्यांना एक आवाहन केलं. त्या म्हणाल्या, मी सुखरूप असून या क्षणी राजूर पोलीस स्टेशन मध्ये आहे. कार्यकर्त्यांनी घरीच राहावे. राजूरच्या दिशेने कोणीही येऊ नये. कृपया संयम राखा. आपल्याला निवडणूक तडीस न्यायची आहे. उद्या माझा कोपरगावचा पूर्वनियोजित दौरा ठरल्याप्रमाणे होणार आहे, आपण तिकडे भेटूयात, असं त्या म्हणाल्या.


उत्कर्षा रुपवते यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता. त्या शिर्डीतून उमेदवारीसाठी इच्छूक होत्या. मात्र, महाविकास आघाडीच्या जागावाटपात शिर्डी लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाच्या वाट्याला आला आणि भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळेच नाराज होऊन उत्कर्षा रुपवते यांनी वंचितमध्ये प्रवेश करत शिर्डी लोकसभेची उमेदवारी मिळवली होती.


Comments
Add Comment

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी मंत्री शेतक - यांच्या बांधावर

राज्यात अवकाळी पावसामुळे १ लाख २२ हजारहून अधिक हेक्टर शेती पिकांचे नुकसान पुणे : राज्यात वादळी वारा व गारांच्या

उद्योगांना एलपीजीचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील - राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

मुंबई : महाराष्ट्रात कार्यरत असलेली प्रत्येक विदेशी कंपनी ही राज्याचीच आहे, या भूमिकेतून राज्य शासन सर्वतोपरी

मंत्रालय प्रवेशासाठी लागणारी १० हजार ओळखपत्रे गायब

मुंबई : मंत्रालयातील प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘डिजी प्रवेश’ प्रणालीतील १०

Ladaki Bahin Yojna E Kyc : ई-केवायसी न केल्याने लाडकी बहीण योजनेतील ६८ लाख खाती बंद

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या ‘लाडकी बहिण योजना’ संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. या योजनेअंतर्गत अनिवार्य

ऑपरेशन टायगर? : शिवसेनेच्या मेजवानीला ‘उबाठा’च्या खासदारांची हजेरी

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांनी जोर धरलेला असतानाच, बुधवारी रात्री राजधानी

SSC Exam 2026 Major Reform : कागदपत्रांचा गोंधळ संपणार! आता 'मार्कशीट' आणि 'पासिंग सर्टिफिकेट' मिळणार...बोर्डाचा नवीन निर्णय काय ?

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक