मुंबई: हल्ली मोबाईल फोन(mobile phone) सगळ्यांची गरज बनली आहे. फोन नेहमी व्यवस्थित चालू राहावा यासाठी आपण विविध पद्धती वापरतो. नवीन फोन घेतल्यावर त्याला नवीन कव्हर घातले जाते. त्याला स्क्रॅच येऊ नये यासाठी स्क्रीन गार्ड लावले जाते. मात्र जेव्हा फोन जुना होतो तेव्हा काही समस्या सतावू लागता. त्यापैकीच एक म्हणजे फोनची बॅटरी लवकर लवकर संपू लागते. मोबाईल फोनच्या चार्जिंगमध्ये समस्या येऊ लागतात.
एकतर मोबाईल फोन स्लो होतो अथवा बॅटरी लवकर लवकर संपू लागते. फोन जुना झाला की अनेकांना ही समस्या सतावत असते. मात्र असे नेहमीच काही होत नाही. तुमच्या काही चुकीच्या सवयींमुळेही फोनच्या बॅटरीमध्ये समस्या येऊ लागतात. तसेच बॅटरीही लवकर लवकर संपते.
उन्हाळ्याच्या दिवसांत फोन अधिक गरम होण्याची शक्यता अधिक असते. तुम्हाला माहीत आहे का की चार्जिंगच्या वेळेस फोनचे कव्हर न काढल्यास बॅटरीतून निघणारी गरम हवा मोबाईलच्या कव्हरमुळे बाहेर पडू शकत नाही. बॅटरी गरम झाल्यास चार्जिंग थांबते आणि बॅटरीची टक्के वारी वाढण्याऐवजी कमी होते. यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत कव्हर काढून चार्जिंग करण्याचा सल्ला दिला जातो.
अनेकदा लोक फोनची बॅटरी एकदम कमी झाल्यावरच चार्ज करतात. अशातच हे जाणून घेणे गरजेचे आहे की अखेर बॅटरी किती टक्के राहिल्यावर चार्ज करायला हवी. जर तुम्ही फोनची बॅटरी १०-१५ टक्क्यांपर्यंत पोहोचल्यावरच चार्जिंगला लावत असाल तर यामुळे बॅटरीवर परिणाम होतो.
फोन कधीही रात्रभर चार्जिंगला लावून ठेवू नये. ही सवय कोणत्याही फोनसाठी चांगली नसते. फोनला अधिक चार्ज करणेही चांगले नसते. यामुळे बॅटरी खराब होण्याचा धोका वाढतो.
पासही काढू शकता ऑनलाईन पुणे : पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी (Pune news) समोर आली आहे.…
भारंगी नदीला पूर, गाड्या वाहून गेल्या, वाहतूकही ठप्प खर्डी : जुलै महिन्याला सुरुवात होताच पावसाने…
अकोल्यातील जवानाला २४ व्या वर्षी आले वीरमरण अकोला : जम्मू-काश्मीरच्या (Jammu Kashmir) कुलगाम जिल्ह्यात काल…
बुलढाणा : बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. बुलढाण्यात…
कारचालक फरार मुंबई : राज्यभरात हिट अँड रनच्या (Heat And Run) वाढत्या केसेसमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले…
नागपूर : विदर्भात अधिकाधिक रोजगारनिर्मिती होण्याच्या दृष्टीने सर्व सुविधांनी परिपूर्ण औद्योगिक क्षेत्र निर्माण करण्यावर आपण…