Lok Sabha Election 2024: तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात, पंतप्रधान मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाल आज सकाळी सात वाजल्यापासून सुरूवात केली आहे. देशभरातील अनेक दिग्गज नेत्यांचे भविष्य आज मतपेटीत बंद होणार आहे. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनीही जनतेला भरभरून मतदान करण्याचे आवाहन केले आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. गुजरातच्या अहमदाबाद येथील निशान हायर सेकंडरी स्कूलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मतदानाचा हक्क बजावला.


आजच्या तिसऱ्या टप्प्यात १२ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातील एकूण ९३ जागांवर मतदान होत आहे. खरंतप ९४ जागांवर आज मतदान होणार होते मात्र भारतीय जनता पक्षाने गुजरातच्या सुरतमध्ये बिनविरोध निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे या टप्प्यात ९३ जागांवर मतदान होत आहे.


तिसऱ्या टप्प्यात गोवामधील २, गुजरातच्या २५, छत्तीसगडच्या ७, कर्नाटकमधील १४, आसाममधील ४, बिहारच्या ५, मध्य प्रदेशातील ११, उत्तर प्रदेशातील १०, पश्चिम बंगालच्या ४, दादरा नगर हवेली आणि दमणच्या जागांवर मतदान होत आहे.


या टप्प्यात महाराष्ट्रातील रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या ११ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.


रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून केंद्रीय मंत्री नारायण राणे तर सातारा मतदारसंघातून उदयनराजे निवडणूक लढवत आहेत. सोलापुरमधून महाविकास आघाडीकडून प्रणिती शिंदे या मैदानात आहेत तर महायुतीकडून राम सातपुते निवडणूक लढवत आहेत. तर कोल्हापूरमध्ये महायुतीच्या संजय मंडलिक आणि मविआच्या छत्रपती शाहू महाराजांमध्ये सामना रंगणार आहे.


आजचे तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर चौथ्या टप्प्यासाठी १३ मेला मतदान, पाचव्या टप्प्यासाठी २० मेला, सहाव्या टप्प्यासाठी २५ मेला आणि सातव्या टप्प्यासाठी १ जूनला मतदान होणार आहे. १८व्या लोकसभा निवडणुकीचे निकाल ४ जूनला जाहीर केले जातील.

Comments
Add Comment

आयएनएस ‘अरिदमन’ आणि ‘तारगिरी’ नौदलात दाखल

विशाखापट्टणम : आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम येथे आयोजित नेत्रदीपक सोहळ्यात स्वदेशी बनावटीची आयएनएस अरिदमन ही

West Bengal : पश्चिम बंगाल : मालदा हिंसाचाराच्या सूत्रधाराला अटक

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील कालियाचक इथल्या हिंसाचाराचा सूत्रधार आणि एआयएमआयएम नेते

जन विश्वास विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर; वाहतूक कोंडी, ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणात होणारा विलंब हे आता गुन्हे नाहीत

नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांनी जन विश्वास विधेयकाला मंजुरी दिली. राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली की

संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते विशाखापट्टणममध्ये अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीचे आणि स्टेल्थ फ्रिगेटचे जलावतरण

विशाखापट्टणम : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज (शुक्रवार ३ एप्रिल २०२६) विशाखापट्टणममध्ये

PM Kisan Yojana 23rd Instalment: पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता 'या' महिन्यात मिळण्याची शक्यता

मुंबई: भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे लाखो लोक शेती करतात. त्यांच्यापैकी अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न

Summer Special Train: उन्हाळ्यात घरी परतणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मुंबई-पुणे दरम्यान २१०० हून अधिक विशेष गाड्या धावणार

मुंबई: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी घरी परतण्याची योजना आखणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेने