Lok Sabha Election 2024: तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात, पंतप्रधान मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

  69

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाल आज सकाळी सात वाजल्यापासून सुरूवात केली आहे. देशभरातील अनेक दिग्गज नेत्यांचे भविष्य आज मतपेटीत बंद होणार आहे. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनीही जनतेला भरभरून मतदान करण्याचे आवाहन केले आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. गुजरातच्या अहमदाबाद येथील निशान हायर सेकंडरी स्कूलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मतदानाचा हक्क बजावला.


आजच्या तिसऱ्या टप्प्यात १२ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातील एकूण ९३ जागांवर मतदान होत आहे. खरंतप ९४ जागांवर आज मतदान होणार होते मात्र भारतीय जनता पक्षाने गुजरातच्या सुरतमध्ये बिनविरोध निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे या टप्प्यात ९३ जागांवर मतदान होत आहे.


तिसऱ्या टप्प्यात गोवामधील २, गुजरातच्या २५, छत्तीसगडच्या ७, कर्नाटकमधील १४, आसाममधील ४, बिहारच्या ५, मध्य प्रदेशातील ११, उत्तर प्रदेशातील १०, पश्चिम बंगालच्या ४, दादरा नगर हवेली आणि दमणच्या जागांवर मतदान होत आहे.


या टप्प्यात महाराष्ट्रातील रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या ११ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.


रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून केंद्रीय मंत्री नारायण राणे तर सातारा मतदारसंघातून उदयनराजे निवडणूक लढवत आहेत. सोलापुरमधून महाविकास आघाडीकडून प्रणिती शिंदे या मैदानात आहेत तर महायुतीकडून राम सातपुते निवडणूक लढवत आहेत. तर कोल्हापूरमध्ये महायुतीच्या संजय मंडलिक आणि मविआच्या छत्रपती शाहू महाराजांमध्ये सामना रंगणार आहे.


आजचे तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर चौथ्या टप्प्यासाठी १३ मेला मतदान, पाचव्या टप्प्यासाठी २० मेला, सहाव्या टप्प्यासाठी २५ मेला आणि सातव्या टप्प्यासाठी १ जूनला मतदान होणार आहे. १८व्या लोकसभा निवडणुकीचे निकाल ४ जूनला जाहीर केले जातील.

Comments
Add Comment

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके