मुंबई : सध्या अनेकजण सरकारी नोकरीच्या शोधात असतात. अशाच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. मुंबई शहराचे नियोजन आणि व्यवस्थापन करणारी मुंबई महानगर पालिका आणि मुंबईतील मोठ्या संस्थांपैकी टाटा मेमोरियल संस्थेमध्ये सध्या मोठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. यामुळे मुंबईत सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांची इच्छा आता पूर्ण होणार आहे. या दोन्ही ठिकाणांच्या रिक्त पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. जाणून घ्या याबाबतची सविस्तर माहिती.
मुंबई पालिकेअंतर्गत लायसन्स इन्स्पेक्टरच्या एकूण ११८ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना १७ मे २०२४ पर्यंत अर्ज करता येणार असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
मुंबई पालिकेअंतर्गत लायसन्स इन्स्पेक्टर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. लायसन्स इन्स्पेक्टर पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना मुंबईत नोकरी करावी लागणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे तर कमाल वय ४३ वर्षे इतके आहे. निवड झालेल्या उमेदवारांना भरतीची वेतनश्रेणी स्तर M17 नुसार पगार दिला जाईल. हा पगार २९ हजार २०० ते ९२ हजार ३०० रुपयांपर्यंत असणार आहे.
टाटा मेमोरियल सेंटरमध्ये वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी, HBNI फेलोशिपसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवारांना २२ मे २०२४ पर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज करताना उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोंदणी करावी लागणार आहे. १८ ते ४० वर्ष वयोगटातील उमेदवार यासाठी अर्ज करु शकणार आहेत. तसेच पात्र उमेदवारांना अर्ज करताना १ हजार रुपये अर्ज शुल्क भरावा लागणार आहे.
नवी दिल्ली : आज मला एका गंभीर विषयाकडे तुमचे आणि देशवासीयांचे लक्ष वेधायचे आहे. काल…
कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी लाभार्थींची कसरत! अर्ज करण्यासाठी आता ३१ ऑगस्टपर्यंत मुदत, दोन अटी केल्या शिथिल…
बार्बाडोस : आदरणीय नरेंद्र मोदी सर, तुमचे शब्द आणि पाठिंबा यासाठी तुमचे खूप खूप आभार.…
जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत, वेतन व शैक्षणिक पात्रता मुंबई : तरुणांसाठी भरघोस पगारासह सरकारी…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला मुंबई : 'विधीमंडळ लोकशाहीचा प्रमुख स्तंभ आहे. या सभागृहाचा…
हाथरस : उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये सत्संगात चेंगराचेंगरी होऊन भीषण दुर्घटना घडली असून यामध्ये १२२ जणांचा…