Salman Khan : सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणात पाचव्या आरोपीला अटक!

राजस्थानमध्ये पोलिसांनी ठोकल्या बेड्या


मुंबई : अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घरावर गोळीबार प्रकरणात (Firing case) मोठमोठे खुलासे होत आहेत. या प्रकरणात मुंबई पोलिसांचा (Mumbai Police) वेगाने तापास सुरु असून आता पाचव्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेने मोहम्मद चौधरी (Mohammed Choudhary) नावाच्या आरोपीला राजस्थानवरुन (Rajsthan) अटक केली आहे. गोळीबार करणाऱ्यांना लॉजिस्टिक्स मदत केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. गुन्हे शाखेचे पथक आरोपीला घेऊन मुंबईत आले आहेत.


मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने सांगितले की, आरोपी मोहम्मद चौधरीने सागर पाल आणि विक्की गुप्ता या दोघांनाही पैसे पुरवण्यात आणि रेकी करण्यात मदत केली. मोहम्मद चौधरीला आज मुंबईत आणण्यात आले असून त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. शिवाय कोठडीची मागणी करण्यात येणार आहे.


सलमान खानच्या घराजवळ १४ एप्रिल रोजी गोळीबार करण्यात आला. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी अत्यंत वेगाने हालचाली करत आरोपींना ताब्यात घेतले. दरम्यान, यातील एका आरोपीने अनुज थापनने (Anuj Thapan) १ मे रोजी तुरुंगात आत्महत्या केली. सध्या या प्रकरणाचा आणखी तपास सुरु आहे. मोहम्मद चौधरीकडून आणखी काय खुलासे होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

माजी लोकसभाध्यक्षांना 'ब्रह्मभूषण' पुरस्कार जाहीर

मुंबई : माजी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांना 'ब्रह्मभूषण’ २०२५ पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा

महापरिनिर्वाण दिनी नामांतराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; सत्ताधाऱ्यांची सकारात्मक प्रतिक्रिया

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर स्थानकाच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा

नियोजित कामं सुरळीत पार पडली तर पुढील महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे आपण लोकार्पण करु- मुख्यमंत्री

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम नियोजित

गोरेगाव-सांताक्रूझ दरम्यान आज रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या

वांद्रे-वर्सोवा सी लिंकवरील जोड मार्गाच्या कामाला गती

आतापर्यंत २२ टक्के काम पू्र्ण मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य

Mahaparinirvan Din: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले - राज्यपाल आचार्य देवव्रत

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीमुळे भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था -- मुख्यमंत्री