Kangana Ranaut : कंगना रणौतचा पुढचा प्लॅन; बॉलीवूडला करणार रामराम!

कंगनाच्या 'या' वक्तव्यामुळे आले चर्चेचे उधाण


मुंबई : देशभरात निवडणुकांची (Loksabha Election 2024) रणधुमाळी सुरु असताना बड्या बड्या नेत्यांचा जोरदार प्रचार सुरु आहे. अशातच भाजपाकडून (BJP) उमेदवारी मिळालेली बॉलिवूडची क्विन कंगना रणौत (Kangana Ranaut) हीदेखील हिमाचलमधील मंडीमधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. याच पार्श्वभूमीवर तिने जोरदार प्रचार सुरु केला आहे. प्रचारादरम्यान कंगनाने केलेल्या एका मोठ्या घोषणामुळे राजकीयसहित सिनेसृष्टीतील वर्तुळात चांगलीच चर्चा सुरु आहे.



काय म्हणाली कंगना?


कंगनाने लोकसभा निवडणूक जिंकल्यास बॉलिवूड सोडणार असल्याची घोषणा केली. तिने बॉलिवूड सोडून पूर्णवेळ राजकारणाला वेळ देणार असल्याचं ठरवलं आहे. निवडणूक जिंकल्यास पुढे काय करणार, या प्रश्नावर कंगना म्हणाली की, 'मी सिनेमाच्या कामानेही कंटाळली आहे. मला राजकारणात यश मिळाल्यास, लोक सोबत राहतील, तर मी राजकारणच करेन. मी एकाच कामावर लक्ष केंद्रीत करू इच्छित आहे'.


'लोकांना माझी गरज असेल, तर मी त्या दिशेने काम करेन. मला अनेक फिल्ममेकर म्हणाले की, 'राजकारणात नको जाऊ'. माझ्या वैयक्तिक महत्वाकांक्षेसाठी लोक म्हणत आहे की, हे योग्य नाही. मी प्रिविलेज आयुष्य जगले आहे. आता लोकांना जोडण्याची संधी मिळत आहे, त्यामुळे त्याला पूर्ण करु इच्छित आहे. लोकांच्या तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत, तुम्ही त्याला न्याय दिला पाहिजे' असेही कंगनाने म्हटले आहे.



राजकारण आणि सिनेसृष्टीत किती फरक आहे?


राजकारण आणि सिनेसृष्टीच्या प्रश्नावर अभिनेत्री कंगना म्हणाली, 'सिनेसृष्टी आणि राजकीय आयुष्य खूप वेगळं असतं. सिनेसृष्टीतील आयुष्य एक खोटं आयुष्य असतं. तिथे वेगळं आयुष्य भासवलं जातं. लोकांना आकर्षित करण्यासाठी वेगळं आयुष्य भासवलं जातं. तर राजकारण हे एक वास्तव आहे. मी लोकसेवेत नवीन आहे. मला खूप काही शिकायचं आहे'.

Comments
Add Comment

माजी खासदाराचे निधन, मुख्यमंत्र्यांनी पाठवला शोकसंदेश

लातूर : लातूर पॅटर्नचे शिल्पकार, माजी खासदार, माजी कुलगुरू आणि प्रख्यात विचारवंत डॉ. जनार्दन वाघमारे यांचे

Chandra Grahan 2026: चंद्रग्रहणात धुळवड खेळावी? काय करावे, टाळावे? जाणून घ्या

मुंबई: यंदा होळी आणि चंद्रग्रहण अशी दुर्मीळ घटना जुळून आली आहे. २ मार्च रोजी होलिका दहन असून ३ मार्चला

UAE मध्ये रायगड आणि नवी मुंबईतील नागरिक अडकले; आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द, प्रवाशांना फटका

रायगड: मध्यपूर्वेत भडकलेल्या तणावाची झळ आता थेट सामान्य प्रवाशांना बसू लागली आहे. इराण, अमेरिका आणि इस्रायल

मध्य रेल्वेच्या १८ होळी विशेष गाड्यांची घोषणा

मुंबई : होळी सणाच्या निमित्ताने होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज

Holi 2026 : रंग-पिचकाऱ्यांच्या किंमतीत सरासरी पाच टक्के वाढ, तरीही खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद

अलिबागसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा रंगांनी न्हाऊन निघाल्या आहेत.

Big Boss Marathi Season 6 : बिग बॉस मराठी ६ मध्ये आयुषच्या विषयावरून तन्वीची खरडपट्टी; प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई : बिग बॉस मराठी ६ मध्ये सातव्या आठवड्यात ड्रामा, आरोप-प्रत्यारोप आणि भावनिक उद्रेक यांचा जोर वाढला आहे.