Kangana Ranaut : कंगना रणौतचा पुढचा प्लॅन; बॉलीवूडला करणार रामराम!

कंगनाच्या 'या' वक्तव्यामुळे आले चर्चेचे उधाण


मुंबई : देशभरात निवडणुकांची (Loksabha Election 2024) रणधुमाळी सुरु असताना बड्या बड्या नेत्यांचा जोरदार प्रचार सुरु आहे. अशातच भाजपाकडून (BJP) उमेदवारी मिळालेली बॉलिवूडची क्विन कंगना रणौत (Kangana Ranaut) हीदेखील हिमाचलमधील मंडीमधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. याच पार्श्वभूमीवर तिने जोरदार प्रचार सुरु केला आहे. प्रचारादरम्यान कंगनाने केलेल्या एका मोठ्या घोषणामुळे राजकीयसहित सिनेसृष्टीतील वर्तुळात चांगलीच चर्चा सुरु आहे.



काय म्हणाली कंगना?


कंगनाने लोकसभा निवडणूक जिंकल्यास बॉलिवूड सोडणार असल्याची घोषणा केली. तिने बॉलिवूड सोडून पूर्णवेळ राजकारणाला वेळ देणार असल्याचं ठरवलं आहे. निवडणूक जिंकल्यास पुढे काय करणार, या प्रश्नावर कंगना म्हणाली की, 'मी सिनेमाच्या कामानेही कंटाळली आहे. मला राजकारणात यश मिळाल्यास, लोक सोबत राहतील, तर मी राजकारणच करेन. मी एकाच कामावर लक्ष केंद्रीत करू इच्छित आहे'.


'लोकांना माझी गरज असेल, तर मी त्या दिशेने काम करेन. मला अनेक फिल्ममेकर म्हणाले की, 'राजकारणात नको जाऊ'. माझ्या वैयक्तिक महत्वाकांक्षेसाठी लोक म्हणत आहे की, हे योग्य नाही. मी प्रिविलेज आयुष्य जगले आहे. आता लोकांना जोडण्याची संधी मिळत आहे, त्यामुळे त्याला पूर्ण करु इच्छित आहे. लोकांच्या तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत, तुम्ही त्याला न्याय दिला पाहिजे' असेही कंगनाने म्हटले आहे.



राजकारण आणि सिनेसृष्टीत किती फरक आहे?


राजकारण आणि सिनेसृष्टीच्या प्रश्नावर अभिनेत्री कंगना म्हणाली, 'सिनेसृष्टी आणि राजकीय आयुष्य खूप वेगळं असतं. सिनेसृष्टीतील आयुष्य एक खोटं आयुष्य असतं. तिथे वेगळं आयुष्य भासवलं जातं. लोकांना आकर्षित करण्यासाठी वेगळं आयुष्य भासवलं जातं. तर राजकारण हे एक वास्तव आहे. मी लोकसेवेत नवीन आहे. मला खूप काही शिकायचं आहे'.

Comments
Add Comment

फ्लॅटमध्ये आग लागल्याने या अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू

जयपूर : राजस्थानच्या कोटा येथे एका फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत अभिनेत्री रीता शर्माच्या दोन मुलांचा गुदमरून

लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त ‘१२० बहादुर’चा दुसरा टीझर प्रदर्शित

मुंबई : भारताची स्वरकोकिळा लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त एक्सेल एंटरटेनमेंट आणि ट्रिगर हॅपी स्टुडिओज यांनी

IND vs PAK Final: फायनलच्या आधी टीम इंडियाला मोठा झटका

दुबई: आशिया कपचा फायनल सामना आज दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये भारत आणि

प्रसिद्ध वेशभूषाकार दीपा मेहता यांचे निधन

मुंबई : प्रसिद्ध वेशभूषाकार (कॉस्ट्यूम डिझायनर) आणि नावाजलेले अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर

IND vs PAK Final : भारत-पाकिस्तान अंतिम सामन्यासाठी दुबई स्टेडियम हाऊसफुल्ल!

४१ वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती; २८ हजार क्रिकेट चाहत्यांची गर्दी, महागडी प्रीमियम तिकिटे अजूनही

सैफ अली खानचा धक्कादायक खुलासा: 'पैसे घेण्यासाठी एका महिला निर्मातीची अश्लील मागणी पूर्ण करावी लागायची!'

बॉलिवूडच्या सुरुवातीच्या काळात मिळाला विचित्र अनुभव; आठवड्याला १ हजार रुपयांसाठी करावे लागायचे १० वेळा