Kangana Ranaut : कंगना रणौतचा पुढचा प्लॅन; बॉलीवूडला करणार रामराम!

  60

कंगनाच्या 'या' वक्तव्यामुळे आले चर्चेचे उधाण


मुंबई : देशभरात निवडणुकांची (Loksabha Election 2024) रणधुमाळी सुरु असताना बड्या बड्या नेत्यांचा जोरदार प्रचार सुरु आहे. अशातच भाजपाकडून (BJP) उमेदवारी मिळालेली बॉलिवूडची क्विन कंगना रणौत (Kangana Ranaut) हीदेखील हिमाचलमधील मंडीमधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. याच पार्श्वभूमीवर तिने जोरदार प्रचार सुरु केला आहे. प्रचारादरम्यान कंगनाने केलेल्या एका मोठ्या घोषणामुळे राजकीयसहित सिनेसृष्टीतील वर्तुळात चांगलीच चर्चा सुरु आहे.



काय म्हणाली कंगना?


कंगनाने लोकसभा निवडणूक जिंकल्यास बॉलिवूड सोडणार असल्याची घोषणा केली. तिने बॉलिवूड सोडून पूर्णवेळ राजकारणाला वेळ देणार असल्याचं ठरवलं आहे. निवडणूक जिंकल्यास पुढे काय करणार, या प्रश्नावर कंगना म्हणाली की, 'मी सिनेमाच्या कामानेही कंटाळली आहे. मला राजकारणात यश मिळाल्यास, लोक सोबत राहतील, तर मी राजकारणच करेन. मी एकाच कामावर लक्ष केंद्रीत करू इच्छित आहे'.


'लोकांना माझी गरज असेल, तर मी त्या दिशेने काम करेन. मला अनेक फिल्ममेकर म्हणाले की, 'राजकारणात नको जाऊ'. माझ्या वैयक्तिक महत्वाकांक्षेसाठी लोक म्हणत आहे की, हे योग्य नाही. मी प्रिविलेज आयुष्य जगले आहे. आता लोकांना जोडण्याची संधी मिळत आहे, त्यामुळे त्याला पूर्ण करु इच्छित आहे. लोकांच्या तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत, तुम्ही त्याला न्याय दिला पाहिजे' असेही कंगनाने म्हटले आहे.



राजकारण आणि सिनेसृष्टीत किती फरक आहे?


राजकारण आणि सिनेसृष्टीच्या प्रश्नावर अभिनेत्री कंगना म्हणाली, 'सिनेसृष्टी आणि राजकीय आयुष्य खूप वेगळं असतं. सिनेसृष्टीतील आयुष्य एक खोटं आयुष्य असतं. तिथे वेगळं आयुष्य भासवलं जातं. लोकांना आकर्षित करण्यासाठी वेगळं आयुष्य भासवलं जातं. तर राजकारण हे एक वास्तव आहे. मी लोकसेवेत नवीन आहे. मला खूप काही शिकायचं आहे'.

Comments
Add Comment

Astrology: ज्या लोकांच्या नशीबात असतो खूप पैसा, त्यांच्यामध्ये दिसतात ही लक्षणे

मुंबई: हस्तरेषा शास्त्र हे व्यक्तीच्या हातावरील रेषा पाहून त्याचे भविष्य आणि नशीबाबाबत सांगितले जाते. दरम्यान,

ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचे निधन

ठाणे : ज्येष्ठ विचारवंत, लेखक आणि व्याख्याते दाजी पणशीकर यांचे शुक्रवार, ६ जून रोजी संध्याकाळी ठाण्यातील राहत्या

घोडबंदर मार्गावर वाहतुकीत बदल

मेट्रो प्रकल्पाच्या खांबावर गर्डर टाकण्याचे काम हाती ठाणे : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत सुरू

नीट पीजी परीक्षा ३ ऑगस्टला

नवी दिल्ली : पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेशपूर्व परीक्षा अर्थात नीट पीजी परीक्षेची

आणखी एका गर्दीने घेतले नाहक जीव! मरण खरंच स्वस्त झालंय का?

मुंबई : आपल्या देशात कोणत्याही सण, उत्सव, सेलिब्रेशनसाठी होणारी गर्दी आणि त्यात जाणारे बळी हे नेहमीचंच झालंय.

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.