Jay Pawar : प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जय पवार अंतरवाली सराटीत जरांगेंच्या भेटीला

गुपचूप भेटीमागील कारण काय?


जालना : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha) आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. राष्ट्रवादीतील फुटीमुळे देखील बारामतीकडे जनतेची विशेष नजर आहे. या ठिकाणी पवारांमध्येच अटीतटीचा सामना होणार असून त्यासाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांकडून (Ajit Pawar) एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार (Jay Pawar) यांनी आज सकाळी अचानकपणे अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या असून या गुपचूप भेटीमागील नेमकं कारण काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.


मनोज जरांगे यांच्या भेटीला जाणार असल्याचा थांगपत्ता कोणालाही लागू न देता जय पवार आज सकाळी मुंबईतून हेलिकॉप्टरने थेट छत्रपती संभाजीनगरला पोहोचले. तेथून कारने ते अंतरवाली सराटी येथे पोहोचले. याठिकाणी जय पवार यांनी अर्धा तास वाट पाहिल्यानंतर मनोज जरांगे यांच्याशी त्यांची भेट झाली. यानंतर आगतस्वागतचा कार्यक्रम पार पडला. जय पवार यांनी ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे सांगितले. मात्र, या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.


मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे ते माध्यमांवर बराच काळ चर्चेत होते. त्यांच्या उपोषणामुळे राज्य सरकारने अखेर त्यांच्या मागण्या मान्य करत मराठा आरक्षण देऊ केले. मात्र, त्यानंतर जरांगेंच्या मागण्या बदलत गेल्या. शिवाय या मागण्या मान्य करत नसल्याचा आरोप त्यांनी सरकारवर केला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले. या प्रकारामुळे भाजप नेत्यांनी त्यांच्यावर प्रचंड संताप व्यक्त केला. तर सरकारनेही त्यानंतर जरांगेंना गांभीर्याने घेतले नाही. जरांगेंचं आंदोलन काही काळ थांबलं. तेव्हापासून राज्य सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात कोणतीही चर्चा झालेली नाही. मात्र, आज अजित पवार यांचे चिरंजीव अचानक मनोज जरांगे यांच्या भेटीला पोहोचल्याने यामागे नेमके काय कारण असावे, याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Comments
Add Comment

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य