मुरुड-बीच ला पर्यटकांची गर्दी...तप्त वातावरणातही पर्यटकांनी घेतला आनंद....

  80

मुरुड( संतोष रांजणकर): मु‌रुड बीचवर पर्यटकांची गर्दी आज पाहावयास मिळाली. वाढलेल्या उष्णतेमुळे हैराण झालेले पर्यटकांनी समुद्रात मनसोक्त डुंबत आनंद घेतला. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर संपुर्ण तालुक्यावर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. दुपारनंतर तळपत्या सुर्याचे दर्शन होऊ लागले या तळपत्या उन्हात सुद्धा पर्यटकांनी मनसोक्त आनंद लुटला.


मुरुड-बीच समुद्र किनारा भरतीच्या वेळेस फेसाळणारे पाणी, पद्मदुर्ग किल्ल्याचे दर्शन, उसळणाऱ्या लाटा, किनाऱ्यावरील रुपेरी वाळू येथे पर्यटकांना आकर्षित करते. पर्यटकांच्या सोयी-सुविधात याठिकाणी असलेली स्पीडबोट, बनाना, बंफर तसेच घोडा-उंटावरील सफर, घोडागाडी , बग्गी सवारी, डबल सीट सायकल पर्यटनाचा आनंद द्विगुणीत करते. याचा पर्यटक मनसोक्त आनंद लुटत होते.


बीचवर विविध खाद्य-पेय चहा-नाष्टा सोयी सुविधा उपलब्ध आहेत. दर शनिवार, रविवार तसेच सुटीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देत असतात. रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. वेळप्रसंगी ट्रँफिक जँमलाही सामोरे जावे लागते. देश-विदेशातील पर्यटक देखील आवर्जून भेट देत असतात. यामुळे मुरुडबीचला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.


मुरुड बीचवर सुशोभीकरण करण्याचे काम सद्या जोरात सुरू आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पर्यटक मुरूड बिचवर थांबतील, विनामूल्य पार्किंगची व्यवस्था केली जात आहे. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी शेड बांधण्यात येत आहेत बैठकीची व्यवस्था केली जात आहे. बाजूलाच विश्राम बाग आहे, या ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी विविध प्रकारचे खेळणी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामुळे पर्यटक मुरूड बीचकडे जास्तीत जास्त आकर्षित होत आहेत.

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक