मुरुड-बीच ला पर्यटकांची गर्दी...तप्त वातावरणातही पर्यटकांनी घेतला आनंद....

मुरुड( संतोष रांजणकर): मु‌रुड बीचवर पर्यटकांची गर्दी आज पाहावयास मिळाली. वाढलेल्या उष्णतेमुळे हैराण झालेले पर्यटकांनी समुद्रात मनसोक्त डुंबत आनंद घेतला. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर संपुर्ण तालुक्यावर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. दुपारनंतर तळपत्या सुर्याचे दर्शन होऊ लागले या तळपत्या उन्हात सुद्धा पर्यटकांनी मनसोक्त आनंद लुटला.


मुरुड-बीच समुद्र किनारा भरतीच्या वेळेस फेसाळणारे पाणी, पद्मदुर्ग किल्ल्याचे दर्शन, उसळणाऱ्या लाटा, किनाऱ्यावरील रुपेरी वाळू येथे पर्यटकांना आकर्षित करते. पर्यटकांच्या सोयी-सुविधात याठिकाणी असलेली स्पीडबोट, बनाना, बंफर तसेच घोडा-उंटावरील सफर, घोडागाडी , बग्गी सवारी, डबल सीट सायकल पर्यटनाचा आनंद द्विगुणीत करते. याचा पर्यटक मनसोक्त आनंद लुटत होते.


बीचवर विविध खाद्य-पेय चहा-नाष्टा सोयी सुविधा उपलब्ध आहेत. दर शनिवार, रविवार तसेच सुटीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देत असतात. रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. वेळप्रसंगी ट्रँफिक जँमलाही सामोरे जावे लागते. देश-विदेशातील पर्यटक देखील आवर्जून भेट देत असतात. यामुळे मुरुडबीचला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.


मुरुड बीचवर सुशोभीकरण करण्याचे काम सद्या जोरात सुरू आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पर्यटक मुरूड बिचवर थांबतील, विनामूल्य पार्किंगची व्यवस्था केली जात आहे. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी शेड बांधण्यात येत आहेत बैठकीची व्यवस्था केली जात आहे. बाजूलाच विश्राम बाग आहे, या ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी विविध प्रकारचे खेळणी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामुळे पर्यटक मुरूड बीचकडे जास्तीत जास्त आकर्षित होत आहेत.

Comments
Add Comment

छत्रपती संभाजीनगर : फडणवीसांच्या दौर्‍याने राजकीय वातावरण तापलं

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या भाजपच्या कार्यक्रमामुळे संपूर्ण शहरात राजकीय हालचालींना

येणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : आयुर्वेद या निसर्गाशी अनुरुप उपचार पद्धतीचे महत्त्व जगभरात मान्य झाले आहे. आयुष

स्वामी रामनंद तीर्थ यांचे मराठवाडा मुक्ती संग्रामात अमूल्य योगदान : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांनी तरुणाईमध्ये देशभक्ती जागृत

सततच्या अपघातांमुळे नवले पूल परिसर ‘मृत्यूचा सापळा’

पाच वर्षांत २५७ अपघात; ११५ जणांचा बळी पुणे  : नवले पूल परिसरातील प्राणांतिक अपघातांची साखळी थांबण्याचे नाव घेत

‘डॉक्टर नसलो,… पण मोठी ऑपरेशन मी करतो!’

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाबळेश्वरमध्ये जोरदार फटकेबाजी महाबळेश्वर : “मी पेशाने डॉक्टर नाही… पण

आदिवासींच्या जल, जंगल, जमीन आणि संस्कृतीचे रक्षण करू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन  राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन नागपूर : राज्य