Prakash Ambedkar : काँग्रेसचा न्यायाशी संबंध नाही!

काँग्रेस आणि तिची जातीय वर्चस्ववादी वृत्ती खाली आणा


आधी आघाडीची बोलणी झालेल्या काँग्रेसविषयी प्रकाश आंबेडकर यांची जहरी टीका


मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधी राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. एवढंच नव्हे तर आघाडीतील मित्रपक्षांमध्येही मतभेद असल्याचे वारंवार समोर आले आहे. त्यातच आता काँग्रेसशी (Congress) दोनदा आघाडीसंदर्भात बोलणी केलेले वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी काँग्रेसवरच जहरी टीका केली आहे. ‘काँग्रेसचा न्यायाशी संबंध नाही!’, असं ते म्हणाले आहेत. काँग्रेस लोकसभा निवडणुकीत न्याय पत्रावरून प्रचार करत असतानाच प्रकाश आंबडेकर यांनी रोहित वेमुला प्रकरणावरूनही (Rohit Vemula case) टीका केली आहे.





प्रकाश आंबेडकर यांनी यांनी ट्विट करून म्हटले आहे की, काँग्रेसचा न्यायाशी संबंध नाही! रोहित वेमुला हा दलित नव्हता, तेलंगणा पोलिसांनी रोहित वेमुला प्रकरणाच्या तपासाच्या क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटले होते. हे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील तेलंगणा सरकारच्या अखत्यारीत येते. रोहित वेमुलासाठी काँग्रेसचा न्याय म्हणजे आपली "खरी जातीय ओळख" शोधून काढेल या भीतीने रोहितने आत्महत्या केली. त्याला आत्महत्येसाठी ओढले गेलेले कोणतेही तथ्य किंवा परिस्थिती रेकॉर्डवर उपलब्ध नाही. त्याच्या मृत्यूला कोणी जबाबदार नाही. तपास अधिकाऱ्यांनी राधिका वेमुला विचारले की ती तिची जात स्थान निश्चित करण्यासाठी डीएनए चाचणी घेण्यास इच्छुक आहे का?



काँग्रेस न्यायाची अशी व्याख्या करते का?


काँग्रेस न्यायाची अशी व्याख्या करते का? रोहितच्या आई, बहीण आणि भावासाठी हा तुमचा न्याय आहे का? शैक्षणिक संस्थांमध्ये दर मिनिटाला भेदभाव आणि छळ करणाऱ्या एससी आणि एसटी विद्यार्थ्यांसाठी हा तुमचा न्याय आहे का? हा तुमचा दलितांचा न्याय आहे का? काँग्रेसला माझा सल्ला आहे की न्याय हा शब्द वापरणे बंद करा, जर तुम्हाला त्याचा अर्थ काय हे माहित नसेल तर! न्याय ही क्षुल्लक संज्ञा नाही! काँग्रेस आणि तिची जातीय वर्चस्ववादी वृत्ती खाली आणा.

Comments
Add Comment

Rajgad Accident : राजगडाच्या वाटेवर भीषण अपघात! पाबे घाटात मिनी बस २५ फूट दरीत कोसळली; दोन पर्यटकांचा मृत्यू, अनेक जण जखमी

पुणे : किल्ले राजगड (Rajgad Fort) येथे पर्यटनासाठी (Tourism) निघालेल्या मुंबईतील अंधेरी येथील पर्यटकांच्या मिनी बसचा (Mini Bus) पुणे

Nitesh Rane : छत्रपती शिवाजी महाराज समान नागरी कायद्याचे जनक - मंत्री नितेश राणे

विशाळगडाला अतिक्रमण मुक्त करण्याबाबत केले आश्वस्त मुंबई : "छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने समान नागरी

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच पावसाच्या सरी बरसणार

मुंबई : वाढत्या उष्णते मध्ये दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. 28 जून रोजीही राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा येलो

NCMC Card : वृद्ध असो की विद्यार्थी; सवलतीसाठी आता १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक

एसटीतील सवलतीसाठी १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक  मुंबई : राज्य मार्ग परिवहन (ST) महामंडळाच्या बसमधील सवलतीच्या

Maharashtra Farmers : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण; प्रत्येक गावात लाभार्थ्यांची यादी पाठवणार मुंबई : गेल्या काही वर्षांतील

Bharat Gogawale : राज्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

मंत्री भरत गोगावले यांची कबुली; हस्तलिखित आणि संगणकीय हजेरीपटात तफावत दाखवून गैरव्यवहार मुंबई : गरिबांच्या