Prakash Ambedkar : काँग्रेसचा न्यायाशी संबंध नाही!

काँग्रेस आणि तिची जातीय वर्चस्ववादी वृत्ती खाली आणा


आधी आघाडीची बोलणी झालेल्या काँग्रेसविषयी प्रकाश आंबेडकर यांची जहरी टीका


मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधी राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. एवढंच नव्हे तर आघाडीतील मित्रपक्षांमध्येही मतभेद असल्याचे वारंवार समोर आले आहे. त्यातच आता काँग्रेसशी (Congress) दोनदा आघाडीसंदर्भात बोलणी केलेले वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी काँग्रेसवरच जहरी टीका केली आहे. ‘काँग्रेसचा न्यायाशी संबंध नाही!’, असं ते म्हणाले आहेत. काँग्रेस लोकसभा निवडणुकीत न्याय पत्रावरून प्रचार करत असतानाच प्रकाश आंबडेकर यांनी रोहित वेमुला प्रकरणावरूनही (Rohit Vemula case) टीका केली आहे.





प्रकाश आंबेडकर यांनी यांनी ट्विट करून म्हटले आहे की, काँग्रेसचा न्यायाशी संबंध नाही! रोहित वेमुला हा दलित नव्हता, तेलंगणा पोलिसांनी रोहित वेमुला प्रकरणाच्या तपासाच्या क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटले होते. हे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील तेलंगणा सरकारच्या अखत्यारीत येते. रोहित वेमुलासाठी काँग्रेसचा न्याय म्हणजे आपली "खरी जातीय ओळख" शोधून काढेल या भीतीने रोहितने आत्महत्या केली. त्याला आत्महत्येसाठी ओढले गेलेले कोणतेही तथ्य किंवा परिस्थिती रेकॉर्डवर उपलब्ध नाही. त्याच्या मृत्यूला कोणी जबाबदार नाही. तपास अधिकाऱ्यांनी राधिका वेमुला विचारले की ती तिची जात स्थान निश्चित करण्यासाठी डीएनए चाचणी घेण्यास इच्छुक आहे का?



काँग्रेस न्यायाची अशी व्याख्या करते का?


काँग्रेस न्यायाची अशी व्याख्या करते का? रोहितच्या आई, बहीण आणि भावासाठी हा तुमचा न्याय आहे का? शैक्षणिक संस्थांमध्ये दर मिनिटाला भेदभाव आणि छळ करणाऱ्या एससी आणि एसटी विद्यार्थ्यांसाठी हा तुमचा न्याय आहे का? हा तुमचा दलितांचा न्याय आहे का? काँग्रेसला माझा सल्ला आहे की न्याय हा शब्द वापरणे बंद करा, जर तुम्हाला त्याचा अर्थ काय हे माहित नसेल तर! न्याय ही क्षुल्लक संज्ञा नाही! काँग्रेस आणि तिची जातीय वर्चस्ववादी वृत्ती खाली आणा.

Comments
Add Comment

Pro Govinda Season 4 : प्रो गोविंदा सीझन ४ चा थरार रंगला; विजेत्यांवर बक्षिसांची लयलूट, दहीहंडी ऑलिम्पिकपर्यंत नेण्याचा निर्धार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्या हस्ते

Eknath Shinde : नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकार सक्रिय

मुंबई : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील

CM Devendra Fadnavis : औंढा नागनाथ मंदिराच्या विकासाला १९३ कोटींची मंजुरी

मुंबई : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ (Aundha Nagnath) मंदिराच्या प्राचीन शिल्पकलेचे जतन करताना

Dada Bhuse : शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा! पवित्र पोर्टलद्वारे १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस

मुंबई : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, पवित्र पोर्टलमार्फत १३ हजार ११९ शिक्षक पदांसाठी

CM Devendra Fadnavis : पंढरपूरचा विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊनच अंतिम करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पंढरपूरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा वारकरी, भाविक, स्थानिक नागरिक, व्यापारी, मठाधिपती आणि

Amravati : अमरावतीतील नवजात बालकांच्या मृत्यूची NHRCकडून स्वतःहून दखल; महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना नोटीस

अमरावती येथील जिल्हा महिला रुग्णालयाच्या नवजात बालकांच्या देखभाल विभागात (SNCU) लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा