Voting Awareness : मतदानाला जावंच लागतंय! मेट्रोही देणार मतदानाच्या दिवशी सवलत

  59

मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी महामुंबई मेट्रो प्रशासनाचा निर्णय


मुंबई : मतदान (Voting) हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे आणि तो बजावला गेलाच पाहिजे. लोकशाहीमध्ये (Democracy) प्रत्येक मत हे अमूल्य असते. मात्र, अनेकदा मतदानाचा हक्क नागरिक बजावताना दिसत नाहीत. काही वेळेस कमी जनजागृती याचं कारण असू शकते. पण त्याचसोबत काहीजण मतदान केंद्रापर्यंत जाण्याचाही कंटाळा करतात. प्रवासाचा कंटाळा करतात. यामुळे त्यांचं अमूल्य मत वाया जातं. असं होऊ नये म्हणून महामुंबई मेट्रो प्रशासनाने (Maha Mumbai Metro Operation Corporation Limited) मतदानाच्या दिवशी सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. या दिवशी प्रवाशांना तिकीटावर १०% सवलत मिळणार आहे.


सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत नागरिकांना मेट्रोच्या माध्यमातून आरामदायक प्रवास करत, मतदानाचा आपला हक्क बजावता यावा यासाठी महामुंबई मेट्रो प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. मुंबई मेट्रो मार्ग २ अ आणि ७ च्या सर्व प्रवाशांना २० मे, २०२४ रोजी प्रवासी तिकिटावर (मूळ तिकिटदरावर) १०% सवलत देण्याचा महत्त्वाचा निर्णय महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाने घेतला आहे.


ही सवलत मुंबई मेट्रो १ कार्ड, मोबाईल क्यूआर तिकीट, पेपर तिकीट अशा सर्व माध्यमातून देण्यात येणार आहे. मुंबई मेट्रो मार्ग २ अ आणि ७ च्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे ९० कोटी नागरिकांनी प्रवास केला असल्याने मुंबई मेट्रोचा उपयुक्तता अधोरेखित झाली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करता येईल आणि त्यांना केंद्रापर्यंत आरामदायक प्रवासही करता येणार आहे.




Comments
Add Comment

श्री दत्तात्रेयाच्या गिरनार पर्वतावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

मुंबई: गुजरातमधील जुनागड येथील गिरनार पर्वताच्या पाचव्या भागात श्री दत्तात्रेय भगवान यांचे तपश्चर्या स्थान

एका मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर : पावसाची अपेक्षित दणकेबाज सुरुवात... शेतीची सर्व कामे आटोपलेली... मनात विठुरायाच्या दर्शनाची आस...

मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार !

७ जुलैच्या डब्याची सोय करून ठेवा! मुंबई (प्रतिनिधी) :मुंबईच्या गर्दीतून, पावसातून आणि खचाखच भरलेल्या ट्रेनमधून

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास रेल्वेचे तिकीट मिळेना

रात्रभर रांगेत जागूनही झाल्या दोन मिनिटांत गाड्या फुल्ल मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी गावाकडे नाणान्य

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात