मुंबई: मुंबईच्या वानखेडे मैदानावर आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने बाजी मारली. तब्बल १२ वर्षांनी वानखेडेवर कोलकाताला विजय मिळवता आला आहे.कोलकाताने मुंबईला २४ धावांनी हरवले.
या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना १६९ धावा केल्या होत्या. कोलकाताची एकवेळ अशी परिस्थिती होती की त्यांनी त्यांचे ५ फलंदाज ५७ धावांवर गमावले होते. मात्र त्यानंतर कोलकाताच्या खेळाडूंनी स्थिती सुधारली आणि संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. वेंकटेश अय्यरने ५२ बॉलमध्ये ७२ धावांची ताबडतोब खेळी केली. तर मनीष पांडेने ३१ बॉलमध्ये ४२ धावा केल्या.
खरंतर आयपीएलमध्ये ही धावसंख्या काही मोठी नव्हती मात्र मुंबईला तितक्याही धावा करता आल्या नाहीत. मुंबईचा फलंदाज सूर्यकुमार यादवने या सामन्यात एकाकी लढत दिली. मात्र त्याला इतर फलंदाजांची साथ लाभली नाही. एकामागोएक मुंबईचे फलंदाज बाद होत गेले. त्यामुळे मुंबईला केवळ १४५ धावाच करता आल्या. शेवटचे तीन फलंदाज तर लगेचच एकामागोमाग बाद झाले.
मध्यप्रदेशात एकाच घरातील पाच जणांचे मृतदेह आढळले लटकलेल्या अवस्थेत भोपाळ : दिल्लीत १ जुलै २०१८…
कोकण पदवीधर मतदार संघातून भाजपाचे निरंजन डावखरे विजयी ठाणे : अत्यंत चुरशीच्या आणि राज्याचे लक्ष…
नागपूर : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मातोश्री प्रभावती कृष्णराव बावनकुळे यांचे…
पावसाळी पर्यटन ठरतंय धोक्याचं... कोल्हापूर : पावसाळी पर्यटन (Monsoon trip) जीवावर बेतत असल्याच्या घटना सातत्याने…
नवी दिल्ली : जनरल उपेंद्र द्विवेदी, पीव्हीएसएम, एव्हीएसएम (Upendra Dwivedi) आता भारताचे नवे लष्करप्रमुख झाले…
भुशी डॅमच्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय पुणे : रविवारी भुशी धरणात पुण्यातील पाच जणांचा मृत्यू…