MI vs KKR: १२ वर्षांनी वानखेडेवर कोलकाताचा विजय

मुंबई: मुंबईच्या वानखेडे मैदानावर आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने बाजी मारली. तब्बल १२ वर्षांनी वानखेडेवर कोलकाताला विजय मिळवता आला आहे.कोलकाताने मुंबईला २४ धावांनी हरवले.


या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना १६९ धावा केल्या होत्या. कोलकाताची एकवेळ अशी परिस्थिती होती की त्यांनी त्यांचे ५ फलंदाज ५७ धावांवर गमावले होते. मात्र त्यानंतर कोलकाताच्या खेळाडूंनी स्थिती सुधारली आणि संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. वेंकटेश अय्यरने ५२ बॉलमध्ये ७२ धावांची ताबडतोब खेळी केली. तर मनीष पांडेने ३१ बॉलमध्ये ४२ धावा केल्या.


खरंतर आयपीएलमध्ये ही धावसंख्या काही मोठी नव्हती मात्र मुंबईला तितक्याही धावा करता आल्या नाहीत. मुंबईचा फलंदाज सूर्यकुमार यादवने या सामन्यात एकाकी लढत दिली. मात्र त्याला इतर फलंदाजांची साथ लाभली नाही. एकामागोएक मुंबईचे फलंदाज बाद होत गेले. त्यामुळे मुंबईला केवळ १४५ धावाच करता आल्या. शेवटचे तीन फलंदाज तर लगेचच एकामागोमाग बाद झाले.

Comments
Add Comment

अपोलो टायर्स टीम इंडियाचा नवीन स्पॉन्सर; प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला देणार ४.५ कोटी रुपये

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघासाठी नवीन जर्सी स्पॉन्सर म्हणून अपोलो

युवराज सिंगनं काय केलं... ? ईडीनं विचारला जाब

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप 1xBet प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे.

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या