मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (LS polls) पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्ह्यात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून, फिरत्या गस्ती पथकांद्वारे मोठ्या प्रमाणावर ठिकठिकाणी तपासणी करण्यात येत आहे.
गुरुवारी रात्री प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, प्रशासनाने तपासणी प्रक्रियेत सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
निवडणूक काळात नागरिक, व्यापारी, व्यावसायिक यांनी कोणतेही साहित्य किंवा पैसे घेऊन जाताना संबंधित कागदपत्रे सोबत ठेवावीत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मतदान तपासनीसांकडून आवश्यकतेनुसार तपास आणि जप्तीची कडक व्यवस्था करण्यात आली आहे.
पैशांचा गैरवापर रोखण्यासाठी पोलीस प्रशासनासह आयकर, राज्य उत्पादन शुल्क, केंद्रीय वस्तू व सेवा कर, राज्य वस्तू व सेवा कर, व्यावसायिक कर, अंमली पदार्थ नियंत्रण दलासह विविध विभागांचे अधिकारी कसून तपासणी करत आहेत. दारूचा मोफत पुरवठा, भेटवस्तूंचे वाटप किंवा लोकसभा निवडणुकीदरम्यान कोणतेही आमिष कोणत्याही परिस्थितीत दिल्याचे निदर्शनास आल्यास कक कारवाई करण्यात येणार आहे.
सीमा सुरक्षा दल, सशस्त्र दल, केंद्रीय पोलीस दल, औद्योगिक सुरक्षा दल, भारतीय तटरक्षक दल, रेल्वे संरक्षण दल, टपाल विभाग, वन विभाग, नागरी विमान वाहतूक विभाग, विमानतळ प्राधिकरण, राज्य नागरी विमान वाहतूक विभाग, राज्य परिवहन विभाग, मोबाईल टीम (FST) आणि स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम (SST) देखील त्यांच्यासोबत काम करत आहेत.
निवडणूक काळात वाहनांची कसून तपासणी करण्यात येत असून, दररोज निवडणूक विभागाला अहवाल सादर करण्यात येत असल्याची माहिती निवडणूक प्रशासनाने दिली.
दिवसभरातील (Prahaar Bulletin) महत्वाच्या बातम्या… टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीत काही चाहते आजारी तर काही झाले…
राज्य मंत्रिमंडळाने घेतला मोठा निर्णय मुंबई : सरकारने माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर आता…
प्रश्नपत्रिका तयार करतानाच घेणार 'ही' खास काळजी मुंबई : NEET PG परीक्षा रद्द झाल्यानंतर जवळपास…
यांचा वारीतला सहभाग केवळ राजकीय फायद्यासाठी भाजपाच्या माजी खासदारांची विरोधकांवर बोचरी टीका सोलापूर : आषाढी…
आमदार नितेश राणे यांचा रोहित पवारांना अप्रत्यक्ष टोला कोणाची बुद्धी लहान याबाबत राहुल गांधी आणि…
भोलेबाबा करायचा दुधाची अंघोळ; खीर बनवून वाटला जायचा प्रसाद लखनऊ : काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या…