LS Polls : लोकसभा निवडणुकीपूर्वी मुंबईत कडक सुरक्षा तपासणी

  43

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (LS polls) पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्ह्यात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून, फिरत्या गस्ती पथकांद्वारे मोठ्या प्रमाणावर ठिकठिकाणी तपासणी करण्यात येत आहे.


गुरुवारी रात्री प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, प्रशासनाने तपासणी प्रक्रियेत सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.


निवडणूक काळात नागरिक, व्यापारी, व्यावसायिक यांनी कोणतेही साहित्य किंवा पैसे घेऊन जाताना संबंधित कागदपत्रे सोबत ठेवावीत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मतदान तपासनीसांकडून आवश्यकतेनुसार तपास आणि जप्तीची कडक व्यवस्था करण्यात आली आहे.


पैशांचा गैरवापर रोखण्यासाठी पोलीस प्रशासनासह आयकर, राज्य उत्पादन शुल्क, केंद्रीय वस्तू व सेवा कर, राज्य वस्तू व सेवा कर, व्यावसायिक कर, अंमली पदार्थ नियंत्रण दलासह विविध विभागांचे अधिकारी कसून तपासणी करत आहेत. दारूचा मोफत पुरवठा, भेटवस्तूंचे वाटप किंवा लोकसभा निवडणुकीदरम्यान कोणतेही आमिष कोणत्याही परिस्थितीत दिल्याचे निदर्शनास आल्यास कक कारवाई करण्यात येणार आहे.


सीमा सुरक्षा दल, सशस्त्र दल, केंद्रीय पोलीस दल, औद्योगिक सुरक्षा दल, भारतीय तटरक्षक दल, रेल्वे संरक्षण दल, टपाल विभाग, वन विभाग, नागरी विमान वाहतूक विभाग, विमानतळ प्राधिकरण, राज्य नागरी विमान वाहतूक विभाग, राज्य परिवहन विभाग, मोबाईल टीम (FST) आणि स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम (SST) देखील त्यांच्यासोबत काम करत आहेत.


निवडणूक काळात वाहनांची कसून तपासणी करण्यात येत असून, दररोज निवडणूक विभागाला अहवाल सादर करण्यात येत असल्याची माहिती निवडणूक प्रशासनाने दिली.

Comments
Add Comment

परळच्या उड्डाणपुलाची लवकरच दुरुस्ती होणार!

मुंबई : 'बृहन्मुंबई महानगरपालिका' पावसाळ्यानंतर परळ 'टीटी ब्रिज' उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात दुरुस्ती आणि

पालिकेच्या भाभा रुग्णालयात १३ 'बोगस' तंत्रज्ञ!

मुंबई : एका माहितीच्या अधिकाराच्या प्रश्नातून असे उघड झाले आहे की, मुंबईतील भाभा रुग्णालयात १३ 'बोगस' प्रयोगशाळा

आता मुंबईतही भटक्या कुत्र्यांची तक्रार तीन वेळा घेतली जाणार!

अखेर पालिका प्रशासनाला जाग! मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेने आता भटक्या कुत्र्यांच्या तक्रारींवर आठवड्यातून

स्वातंत्र्यदिनी मांसाहार विक्री बंदीवरून आदित्य आणि जितेंद्र आव्हाडांची पुराव्यासकट भाजपने केली बोलती बंद!

तेव्हा जिभेवर कुलूप, तोंड उघडण्यापूर्वी निर्णय वाचून घ्या; भाजप नेते नवनाथ बन यांचे आदित्य ठाकरे आणि जितेंद्र

IAS Transferred: राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशीच राज्यातील सात बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई: राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशीच राज्यातील सात बड्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत.

Kabutarkhana: दादरमध्ये नवा कबुतरखाना! कोर्टाचा निर्णय पायदळी तुडवत जैन मंदिराशेजारील इमारतीच्या छतावर कबुतरांसाठी सोय

मुंबई: कबुतरखाना बंद करण्यावरून दादर येथे मोठा वाद सुरू आहे. हा वाद कोर्टाच्या निर्णयानंतरही थांबलेला नाही,