Loksabha Election 2024: रायबरेली येथून राहुल गांधी, अमेठीमधून केएल शर्मा उमेदवार, काँग्रेसची घोषणा

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी मतदारसंघातून काँग्रेस उमेदवारांची घोषणा अखेर करण्याती आली आहे. पक्षाने रायबरेली मतदारसंघातून राहुल गांधींना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे तर भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याविरोधात अमेठी येथून किशोली लाल शर्मा यांना तिकीट देण्यात आले आहे.


काँग्रेसने सोशल मीडिया एक्सवर पोस्ट लिहित म्हटले, केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत लोकसभा निवडणूक २०२४साठी राहुल गांधींना उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि किशोरी लाल शर्मा यांना अमेठीतून काँग्रेस उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे.


 


नामांकन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसने अमेठी आणि रायबरेली मतदारसंघातून उमेदवारांची घोषण केली. गेल्या पंचवीस वर्षांपासून केएल शर्मा अमेठी रायबरेलीमध्ये गांधी कुटुंब खासकरून सोनिया गांधींच्या नामांकनापासून ते प्रचाराची कमान सांभाळत आले आहेत. २००४मध्ये जेव्हा राहुल गांधींनी पहिल्यांदा अमेठी येथून पत्र भरले होते तेव्हा केएल तेथे उपस्थित होते. त्यानंतर आता २० वर्षांनी अमेठी येथून राहुलच्या जागी निवडणूक लढवत आहेत.

Comments
Add Comment

पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांची कारवाई, उत्तर प्रदेशमधून गुंड सुभाष सिंह ठाकूरला अटक

फतेहगढ : विरारमधील चाळ बिल्डर समय चौहान याच्या हत्या प्रकरणात मिरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे

अणुऊर्जा क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले होणार

संसदेत आज सादर होणार विधेयक नवी दिल्ली : भारत एका मोठ्या ऊर्जा सुधारणेकडे वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंकज चौधरी उत्तर प्रदेश भाजपचे नवे अध्यक्ष

लखनऊ : उत्तर प्रदेश भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी रविवारी केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांच्या

एक हजार कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय सायबर फसवणुकीमागे ४ चिनी नागरिक

सीबीआयच्या आरोपपत्रात मोठा खुलासा नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)ने १७ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

प्रवाशांचा संताप ! 'इंडिगो'विरुद्ध सामूहिक भरपाईची मागणी

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोला सध्या गंभीर संकटाचा सामना करावा लागत आहे. विमानांच्या