नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी मतदारसंघातून काँग्रेस उमेदवारांची घोषणा अखेर करण्याती आली आहे. पक्षाने रायबरेली मतदारसंघातून राहुल गांधींना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे तर भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याविरोधात अमेठी येथून किशोली लाल शर्मा यांना तिकीट देण्यात आले आहे.
काँग्रेसने सोशल मीडिया एक्सवर पोस्ट लिहित म्हटले, केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत लोकसभा निवडणूक २०२४साठी राहुल गांधींना उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि किशोरी लाल शर्मा यांना अमेठीतून काँग्रेस उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे.
नामांकन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसने अमेठी आणि रायबरेली मतदारसंघातून उमेदवारांची घोषण केली. गेल्या पंचवीस वर्षांपासून केएल शर्मा अमेठी रायबरेलीमध्ये गांधी कुटुंब खासकरून सोनिया गांधींच्या नामांकनापासून ते प्रचाराची कमान सांभाळत आले आहेत. २००४मध्ये जेव्हा राहुल गांधींनी पहिल्यांदा अमेठी येथून पत्र भरले होते तेव्हा केएल तेथे उपस्थित होते. त्यानंतर आता २० वर्षांनी अमेठी येथून राहुलच्या जागी निवडणूक लढवत आहेत.
म्हणाले, तू सर्व आयसीसी व्हाईट बॉल ट्रॉफी तर जिंकल्यास, पण... मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने…
नाशिक : नाशिकमध्ये मतमोजणी केंद्रामध्ये मतमोजणी प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. एकाच मतपेटीत तब्बल ३ मतपत्रिका…
इनोव्हा कार ट्रकला धडकल्याने झाला अपघात यवतमाळ : गेल्या काही दिवसांत अपघातांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ…
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषकाचे (ITC T20 World cup) विजेतेपद पटकावल्याने देशवासीयांमध्ये आनंदाची…
पर्यटनासाठी आले आणि... पुणे : पावसाळा सुरु होताच अनेकजण पर्यटनाचं (Monsoon picnic) आयोजन करतात. मात्र,…
नवी मुंबई : महाराष्ट्र शासनामार्फत बेलापूर गावात होत असलेल्या विकास कामांचा पाहणी दौरा भाजपाच्या आमदार…