Loksabha Election 2024: रायबरेली येथून राहुल गांधी, अमेठीमधून केएल शर्मा उमेदवार, काँग्रेसची घोषणा

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी मतदारसंघातून काँग्रेस उमेदवारांची घोषणा अखेर करण्याती आली आहे. पक्षाने रायबरेली मतदारसंघातून राहुल गांधींना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे तर भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याविरोधात अमेठी येथून किशोली लाल शर्मा यांना तिकीट देण्यात आले आहे.


काँग्रेसने सोशल मीडिया एक्सवर पोस्ट लिहित म्हटले, केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत लोकसभा निवडणूक २०२४साठी राहुल गांधींना उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि किशोरी लाल शर्मा यांना अमेठीतून काँग्रेस उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे.


 


नामांकन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसने अमेठी आणि रायबरेली मतदारसंघातून उमेदवारांची घोषण केली. गेल्या पंचवीस वर्षांपासून केएल शर्मा अमेठी रायबरेलीमध्ये गांधी कुटुंब खासकरून सोनिया गांधींच्या नामांकनापासून ते प्रचाराची कमान सांभाळत आले आहेत. २००४मध्ये जेव्हा राहुल गांधींनी पहिल्यांदा अमेठी येथून पत्र भरले होते तेव्हा केएल तेथे उपस्थित होते. त्यानंतर आता २० वर्षांनी अमेठी येथून राहुलच्या जागी निवडणूक लढवत आहेत.

Comments
Add Comment

तिरुपती लाडू वाद पुन्हा पेटला, लाडूवात बाथरूम साफ करायचे केमिकल...... ; मुख्यमंत्री नायडूंचे गंभीर आरोप

तिरुपती : तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादाच्या शुद्धतेवरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा चर्चेच्या

इराणने पुन्हा एकदा जगाची झोप उडवली, इराणच्या क्षेपणास्त्राची धक्कादायक रेंज, जाणून घ्या

दिल्ली: अमेरिका आणि इराण या दोन देशांमधील तणावाने जगाचं टेन्शन वाढलं आहे. कोणत्याही क्षणी अमेरिका इराणवर हल्ला

Sikkim Earthquake: सिक्कीममध्ये जाणवले चक्क १३ भूकंपाचे धक्के

सिक्कीम: सिक्कीमच्या काही भागात चक्क १३ भूकंपाचे धक्के जाणवले. गुरुवारी रात्री उशिरा ते शुक्रवार सकाळपर्यंत हे

Bharat Taxi App: भारतीय टॅक्सी चालक ओला किंवा उबरपेक्षा किती जास्त कमावू शकतात?, जाणून घ्या...

मुंबई: जर तुम्ही ओला किंवा उबरने दररोज प्रवास करत असाल किंवा टॅक्सी चालवून उदरनिर्वाह करत असाल, तर ही बातमी

Maharashtra's Rajya Sabha Seats : महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांची निवडणूक 'बिनविरोध' होणार? शरद पवारांच्या जागेवरही टांगती तलवार

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयाचा फायदा आता महायुतीला राज्यसभेतही मिळणार

चेन्नईमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, H5N1 विषाणूमुळे शेकडो कावळे मृत्युमुखी; सरकारकडून महत्त्वाच्या सूचना जारी

चेन्नई: तामिळनाडूची राजधानी चेन्नईत बर्ड फ्लूचा इशारा देण्यात आला आहे. चेन्नईमध्ये शेकडो कावळे मृत आढळले आहेत.