Loksabha Election 2024: रायबरेली येथून राहुल गांधी, अमेठीमधून केएल शर्मा उमेदवार, काँग्रेसची घोषणा

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी मतदारसंघातून काँग्रेस उमेदवारांची घोषणा अखेर करण्याती आली आहे. पक्षाने रायबरेली मतदारसंघातून राहुल गांधींना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे तर भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याविरोधात अमेठी येथून किशोली लाल शर्मा यांना तिकीट देण्यात आले आहे.


काँग्रेसने सोशल मीडिया एक्सवर पोस्ट लिहित म्हटले, केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत लोकसभा निवडणूक २०२४साठी राहुल गांधींना उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि किशोरी लाल शर्मा यांना अमेठीतून काँग्रेस उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे.


 


नामांकन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसने अमेठी आणि रायबरेली मतदारसंघातून उमेदवारांची घोषण केली. गेल्या पंचवीस वर्षांपासून केएल शर्मा अमेठी रायबरेलीमध्ये गांधी कुटुंब खासकरून सोनिया गांधींच्या नामांकनापासून ते प्रचाराची कमान सांभाळत आले आहेत. २००४मध्ये जेव्हा राहुल गांधींनी पहिल्यांदा अमेठी येथून पत्र भरले होते तेव्हा केएल तेथे उपस्थित होते. त्यानंतर आता २० वर्षांनी अमेठी येथून राहुलच्या जागी निवडणूक लढवत आहेत.

Comments
Add Comment

आयएनएस ‘अरिदमन’ आणि ‘तारगिरी’ नौदलात दाखल

विशाखापट्टणम : आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम येथे आयोजित नेत्रदीपक सोहळ्यात स्वदेशी बनावटीची आयएनएस अरिदमन ही

West Bengal : पश्चिम बंगाल : मालदा हिंसाचाराच्या सूत्रधाराला अटक

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील कालियाचक इथल्या हिंसाचाराचा सूत्रधार आणि एआयएमआयएम नेते

जन विश्वास विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर; वाहतूक कोंडी, ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणात होणारा विलंब हे आता गुन्हे नाहीत

नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांनी जन विश्वास विधेयकाला मंजुरी दिली. राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली की

संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते विशाखापट्टणममध्ये अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीचे आणि स्टेल्थ फ्रिगेटचे जलावतरण

विशाखापट्टणम : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज (शुक्रवार ३ एप्रिल २०२६) विशाखापट्टणममध्ये

PM Kisan Yojana 23rd Instalment: पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता 'या' महिन्यात मिळण्याची शक्यता

मुंबई: भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे लाखो लोक शेती करतात. त्यांच्यापैकी अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न

Summer Special Train: उन्हाळ्यात घरी परतणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मुंबई-पुणे दरम्यान २१०० हून अधिक विशेष गाड्या धावणार

मुंबई: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी घरी परतण्याची योजना आखणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेने