Kiran Sarnaik : आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबियांच्या गाडीला अपघात; ५ जणांचा मृत्यू!

  182

मृतांमध्ये नऊ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश; तर तीन जण जखमी


अकोला : गेल्या काही दिवसांत अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झालेली असतानाच आता अकोला जिल्ह्यातून (Akola news) अपघाताची (Accident) घटना समोर आली आहे. शिक्षक आमदार किरण सरनाईक (Kiran Sarnaik) यांच्या कुटुंबियांच्या गाडीचा आज दुपारी पातूर शहराजवळ भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यात किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील ४ व्यक्तींचा समावेश आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, कारमधून किरण सरनाईक यांचा भाऊ, भावाचा मुलगा, मुलगी आणि नात प्रवास करत होते. वाशिम रोडवर दोन कारची समोरासमोर जोरदार धडक झाल्यामुळे हा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही कारचा चक्काचूर झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.


अपघातामध्ये किरण सरनाईक यांचे पुतणे रघुवीर सरनाईक (वय २८) यांचा मृत्यू झाला आहे. तसेच शिवाजी आमले (वय ३०), सिद्धार्थ यशवंत इंगळे (वय ३५) आणि एका नऊ महिन्यांच्या मुलासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये तीन जण जखमी झाले आहेत. त्यात पियुष देशमुख (वय ११), सपना देशमुख आणि श्रेयस इंगळे यांचा समावेश आहे. जखमींना अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

अशोक नगरमधील पालिकेच्या मैदानाला तलावाचे स्वरूप

नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही पालिकेचे दुर्लक्ष कांदिवली : कांदिवली पूर्वेला अशोक नगरमधील एकमेव असलेल्या

पुण्यात भिडे पूल दीड महिना बंद

पुणे : सदाशिवपेठेतून डेक्कन मेट्रो स्थानकात जाण्यासाठी महामेट्रोकडून भिडे पुलावरून लोखंडी पादचारी पूल

महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची

आरबीएलतर्फे विद्यार्थिनींना सायकलसह शालेय साहित्याचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे

ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री ८ वाजता

पुणे : आषाढी वारीतील संत ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री आठ वाजता होणार आहे.

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली