ICC Rankings: टीम इंडियाला मोठा झटका, कसोटीत गमावले अव्वल स्थान

मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ताज्या रँकिंगमध्ये भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या वार्षिक रँकिंग अपडेटमध्ये भारताने वनडे आणि टी-२० फॉरमॅटमध्ये आपले स्थान कायम ठेवले आहे. मात्र कसोटी रँकिंगमध्ये ते दुसऱ्या स्थानावर घसरले आहेत.


वार्षिक अपडेटमध्ये २०२०-२१च्या सत्राचे निकाल हटवण्यात आले. नव्या रँकिंगमध्ये मे २०२४ नंतर पूर्ण झालेल्या सीरिजचा समावेश आहे. भारत प्रामुख्याने २०२०-२१मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये मिळालेल्या २-१ विजयाचे निकाल हटवल्यानंर कसोटीत दुसऱ्या स्थानावर घसरला आहे.



भारतीय संघ ऑस्ट्रेलियापेक्षा इतक्या अंकांनी मागे


आता कसोटी रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ भारताला मागे टाकून अव्वल स्थानावर पोहोचला आहे. भारत कसोटी रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलियापेक्षा चार अंकांनी मागे आहे. तर तिसऱ्या स्थानावर इंग्लंड आहे. दक्षिण आफ्रिका १०३ अंकांसह चौथ्या स्थानावर आहे.


आता ९ संघ कसोटी रँकिंगमध्ये सामील आहेत कारण अफगाणिस्तान आणि आयर्लंड रँकिंगमध्ये सामील होण्यासाठी गरजेच्या कसोटी खेळत नाही तर झिम्बाब्वेने गेल्या तीन वर्षांत केवळ तीन कसोटी सामने खेळले आहेत. तीन वर्षांत कमीत कमी आठ कसोटी सामने खेळावे लागतात.


दरम्यान, वार्षिक अपडेटनंतर भारत वनडे आणि टी-२० रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर आहेत. भारताचे १२२ अंक आहेत

Comments
Add Comment

भारत - ऑस्ट्रेलिया पहिला T20 सामना २९ ऑक्टोबरला, पहा टीम इंडियाची संभाव्य Playing XI

मुंबई : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताचा पराभव झाला. ही मालिका ऑस्ट्रेलियाने २-१

बाईपण भारी देवा ! ७ महिन्यांची गरोदर तरीही १४५ किलो वजन उचलत जिंकली वेटलिफ्टिंग स्पर्धा

दिल्ली : आयुष्यात काहीही अशक्य नसत फक्त जिद्द असायला हवी . दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल सोनिका यादव यांनी हे सिद्ध

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेचा २९ ऑक्टोबरपासून थरार

दुपारी १.४५ वाजता सामन्यांना होणार सुरुवात मुंबई  : भारतीय संघाचा सध्या ऑस्ट्रेलिया दौरा सुरू आहे. नुकतीच तीन

श्रेयस अय्यर आयसीयूमधून बाहेर

गंभीर दुखापतीनंतर प्रकृती स्थिर मुंबई  : भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज श्रेयस अय्यर याची प्रकृती अद्यापही

मला चिंता नाही, सूर्यकुमार यादवच्या खराब फॉर्मवर प्रशिक्षक गौतम गंभीरचा पूर्ण पाठिंबा!

मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आगामी टी-२० मालिकेपूर्वी टीम इंडियाचे मुख्य

भारत-ऑस्ट्रेलिया महिला वर्ल्डकप उपांत्य सामना पावसामुळे रद्द झाल्यास काय होईल? वाचा नियम

मुंबई : महिला वनडे वर्ल्डकप २०२५ आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, क्रिकेट चाहत्यांना उपांत्य फेरीतील रोमांचक