ICC Rankings: टीम इंडियाला मोठा झटका, कसोटीत गमावले अव्वल स्थान

मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ताज्या रँकिंगमध्ये भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या वार्षिक रँकिंग अपडेटमध्ये भारताने वनडे आणि टी-२० फॉरमॅटमध्ये आपले स्थान कायम ठेवले आहे. मात्र कसोटी रँकिंगमध्ये ते दुसऱ्या स्थानावर घसरले आहेत.


वार्षिक अपडेटमध्ये २०२०-२१च्या सत्राचे निकाल हटवण्यात आले. नव्या रँकिंगमध्ये मे २०२४ नंतर पूर्ण झालेल्या सीरिजचा समावेश आहे. भारत प्रामुख्याने २०२०-२१मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये मिळालेल्या २-१ विजयाचे निकाल हटवल्यानंर कसोटीत दुसऱ्या स्थानावर घसरला आहे.



भारतीय संघ ऑस्ट्रेलियापेक्षा इतक्या अंकांनी मागे


आता कसोटी रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ भारताला मागे टाकून अव्वल स्थानावर पोहोचला आहे. भारत कसोटी रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलियापेक्षा चार अंकांनी मागे आहे. तर तिसऱ्या स्थानावर इंग्लंड आहे. दक्षिण आफ्रिका १०३ अंकांसह चौथ्या स्थानावर आहे.


आता ९ संघ कसोटी रँकिंगमध्ये सामील आहेत कारण अफगाणिस्तान आणि आयर्लंड रँकिंगमध्ये सामील होण्यासाठी गरजेच्या कसोटी खेळत नाही तर झिम्बाब्वेने गेल्या तीन वर्षांत केवळ तीन कसोटी सामने खेळले आहेत. तीन वर्षांत कमीत कमी आठ कसोटी सामने खेळावे लागतात.


दरम्यान, वार्षिक अपडेटनंतर भारत वनडे आणि टी-२० रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर आहेत. भारताचे १२२ अंक आहेत

Comments
Add Comment

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना