ICC Rankings: टीम इंडियाला मोठा झटका, कसोटीत गमावले अव्वल स्थान

मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ताज्या रँकिंगमध्ये भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या वार्षिक रँकिंग अपडेटमध्ये भारताने वनडे आणि टी-२० फॉरमॅटमध्ये आपले स्थान कायम ठेवले आहे. मात्र कसोटी रँकिंगमध्ये ते दुसऱ्या स्थानावर घसरले आहेत.


वार्षिक अपडेटमध्ये २०२०-२१च्या सत्राचे निकाल हटवण्यात आले. नव्या रँकिंगमध्ये मे २०२४ नंतर पूर्ण झालेल्या सीरिजचा समावेश आहे. भारत प्रामुख्याने २०२०-२१मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये मिळालेल्या २-१ विजयाचे निकाल हटवल्यानंर कसोटीत दुसऱ्या स्थानावर घसरला आहे.



भारतीय संघ ऑस्ट्रेलियापेक्षा इतक्या अंकांनी मागे


आता कसोटी रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ भारताला मागे टाकून अव्वल स्थानावर पोहोचला आहे. भारत कसोटी रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलियापेक्षा चार अंकांनी मागे आहे. तर तिसऱ्या स्थानावर इंग्लंड आहे. दक्षिण आफ्रिका १०३ अंकांसह चौथ्या स्थानावर आहे.


आता ९ संघ कसोटी रँकिंगमध्ये सामील आहेत कारण अफगाणिस्तान आणि आयर्लंड रँकिंगमध्ये सामील होण्यासाठी गरजेच्या कसोटी खेळत नाही तर झिम्बाब्वेने गेल्या तीन वर्षांत केवळ तीन कसोटी सामने खेळले आहेत. तीन वर्षांत कमीत कमी आठ कसोटी सामने खेळावे लागतात.


दरम्यान, वार्षिक अपडेटनंतर भारत वनडे आणि टी-२० रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर आहेत. भारताचे १२२ अंक आहेत

Comments
Add Comment

IND vs PAk : वर्चस्व राखण्यासाठी 'हरमनसेना' सज्ज; पाकिस्तानचा 'झिरो' रेकॉर्ड मोडणार?

कोलंबो : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ मध्ये रविवार, ५ ऑक्टोबर रोजी क्रिकेट चाहत्यांना

एटीपी मास्टर्स १०००: नोवाक जोकोविचचा टेनिसमध्ये दबदबा कायम

शांघाय (वृत्तसंस्था): वयाच्या ३८ व्या वर्षीही जागतिक टेनिसमध्ये नोवाक जोकोविचचा दबदबा कायम आहे. आपल्या

बांगलादेशने अफगाणिस्तानला हरवून टी-२० मालिका जिंकली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशने दुसऱ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा दोन विकेट्सने पराभव करून तीन

महिला विश्वचषक : पावसामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना रद्द

कोलंबो (वृत्तसंस्था): शनिवारी कोलंबो येथे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला विश्वचषक सामना रद्द करावा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गिलकडे नेतृत्व; रोहित शर्माचा खेळाडू म्हणून संघात सहभाग

वनडे आणि टेस्टसाठी शुभमन गिल तर टी २० साठी सूर्यकुमार यादव करणार भारताचे नेतृत्व मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक

IND vs WI: तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, भारताचा एक डाव आणि १४० धावांनी विजय

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीचा निर्णय तिसऱ्याच दिवशी लागला.