ICC Rankings: टीम इंडियाला मोठा झटका, कसोटीत गमावले अव्वल स्थान

  53

मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ताज्या रँकिंगमध्ये भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या वार्षिक रँकिंग अपडेटमध्ये भारताने वनडे आणि टी-२० फॉरमॅटमध्ये आपले स्थान कायम ठेवले आहे. मात्र कसोटी रँकिंगमध्ये ते दुसऱ्या स्थानावर घसरले आहेत.


वार्षिक अपडेटमध्ये २०२०-२१च्या सत्राचे निकाल हटवण्यात आले. नव्या रँकिंगमध्ये मे २०२४ नंतर पूर्ण झालेल्या सीरिजचा समावेश आहे. भारत प्रामुख्याने २०२०-२१मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये मिळालेल्या २-१ विजयाचे निकाल हटवल्यानंर कसोटीत दुसऱ्या स्थानावर घसरला आहे.



भारतीय संघ ऑस्ट्रेलियापेक्षा इतक्या अंकांनी मागे


आता कसोटी रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ भारताला मागे टाकून अव्वल स्थानावर पोहोचला आहे. भारत कसोटी रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलियापेक्षा चार अंकांनी मागे आहे. तर तिसऱ्या स्थानावर इंग्लंड आहे. दक्षिण आफ्रिका १०३ अंकांसह चौथ्या स्थानावर आहे.


आता ९ संघ कसोटी रँकिंगमध्ये सामील आहेत कारण अफगाणिस्तान आणि आयर्लंड रँकिंगमध्ये सामील होण्यासाठी गरजेच्या कसोटी खेळत नाही तर झिम्बाब्वेने गेल्या तीन वर्षांत केवळ तीन कसोटी सामने खेळले आहेत. तीन वर्षांत कमीत कमी आठ कसोटी सामने खेळावे लागतात.


दरम्यान, वार्षिक अपडेटनंतर भारत वनडे आणि टी-२० रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर आहेत. भारताचे १२२ अंक आहेत

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार