Narendra Modi : बंगालचे नाव तृणमुलमुळे खराब झाले!

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल


कोलकाता : संदेशखालीमध्ये काय घडत आहे हे टीएमसीच्या नेत्यांना नेहमीच ठाऊक होते, परंतु गुन्हेगार त्यांच्यासाठी मालमत्ता असल्याने त्यांनी त्याच्यावर कधीही कारवाई केली नाही. ममता बॅनर्जीच्या तृणमुल पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात पश्चिम बंगालचे गौरवशाली नाव खराब झाले आहे. टीएमसीला संविधानाचे पालन करण्याचे निर्देश देण्यासाठी न्यायालयांना वारंवार हस्तक्षेप करावा लागला आहे, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.


देशात लोकसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यातील मतदान झाले आहे. आता तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे रोजी होणार आहे. या तिसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालमधील कृष्णनगर येथील प्रचारसभेला संबोधित केले. यावेळी नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालच्या टीएमसी सरकारवर जोरदार निशाणा साधला. टीएमसीने हे समजून घेतले पाहिजे की, ते काहीही झाले तरी सीएएची अंमलबजावणी थांबवू शकत नाहीत, असे नरेंद्र मोदी म्हणाले.


सीएएच्या माध्यमातून मी भारतीय नागरिकत्व मिळवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला खात्री देतो की,त्यांना लवकरच केंद्रीय उपक्रमाचा लाभ मिळेल. तसेच, संदेशखाली प्रकरणावरून सुद्धा नरेंद्र मोदींनी टीएमसीच्या नेत्यांवर निशाणा साधला. याचबरोबर,केंद्र सरकार लोकांना मोफत रेशन आणि आरोग्याच्या सुविधा देत आहे. मात्र, टीएमसी बंगालमध्ये आमचा उपक्रम राबवत नाही. त्यामुळे तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागत आहे, असे मोदी म्हणाले. तसेच, बंगालमध्ये आमच्या माजी सैनिकांवर अन्याय होत आहे. या आव्हानात्मक काळात भाजपा तुमच्या पाठीशी उभा आहे आणि तुमचे जीवन सुकर करण्यासाठी माझ्या तिसऱ्या कार्यकाळात केंद्र सरकार तुम्हाला सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन नरेंद्र मोदी यांनी दिले.

Comments
Add Comment

Education : १ जुलैपासून इयत्ता ९ वी आणि १० वीसाठी तीन भाषा अनिवार्य, CBSE चा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता ९ वी आणि १० वीच्या भाषा

NEET UG 2026 Paper Leak : नीट २०२६ पेपरफुटी प्रकरण : सीबीआयची मोठी कारवाई, एनटीएच्या बायोलॉजीच्या प्राध्यापिकेला पुण्यातून अटक

नवी दिल्ली : 'नीट-युजी' (NEET-UG) परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपासाची चक्रे

'पाकिस्तानने ठरवावे की त्यांना भूगोलाचा भाग व्हायचे आहे की इतिहासाचा ?'

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली. या

PM Modi : 'द हेग'मध्ये जाणवला महाराष्ट्र, राजस्थान आणि यूपीचा उत्साह! पंतप्रधान मोदींकडून नेदरलँड्समधील अनिवासी भारतीयांचे विशेष कौतुक

हेग : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी १६ मे रोजी नेदरलँड्समधील 'द हेग' (The Hague) शहरात अनिवासी भारतीयांच्या

Monsoon in Andaman 2026 : आला रे आला...अंदमान-निकोबारमध्ये पावसाची हजेरी, केरळ आणि कोकणात कधी धडकणार ?

संपूर्ण देशातील नागरिक आणि विशेषतः शेतकरी राजा ज्याची आतुरतेने वाट पाहत होता, तो मान्सून अखेर अंदमानच्या  (Andaman)

Fake News Alert! : अफवांवर विश्वास ठेवू नका! राज्यात 'कॅब' सेवा सुरूच राहणार; 'डीजीआयपीआर'ने सांगितले सत्य!

सध्या सोशल मीडियावर ओला (Ola), उबर (Uber) आणि रॅपिडो (Rapido) यांसारख्या लोकप्रिय कॅब सेवा महाराष्ट्रात कायमच्या बंद झाल्या