Narendra Modi : बंगालचे नाव तृणमुलमुळे खराब झाले!

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल


कोलकाता : संदेशखालीमध्ये काय घडत आहे हे टीएमसीच्या नेत्यांना नेहमीच ठाऊक होते, परंतु गुन्हेगार त्यांच्यासाठी मालमत्ता असल्याने त्यांनी त्याच्यावर कधीही कारवाई केली नाही. ममता बॅनर्जीच्या तृणमुल पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात पश्चिम बंगालचे गौरवशाली नाव खराब झाले आहे. टीएमसीला संविधानाचे पालन करण्याचे निर्देश देण्यासाठी न्यायालयांना वारंवार हस्तक्षेप करावा लागला आहे, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.


देशात लोकसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यातील मतदान झाले आहे. आता तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे रोजी होणार आहे. या तिसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालमधील कृष्णनगर येथील प्रचारसभेला संबोधित केले. यावेळी नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालच्या टीएमसी सरकारवर जोरदार निशाणा साधला. टीएमसीने हे समजून घेतले पाहिजे की, ते काहीही झाले तरी सीएएची अंमलबजावणी थांबवू शकत नाहीत, असे नरेंद्र मोदी म्हणाले.


सीएएच्या माध्यमातून मी भारतीय नागरिकत्व मिळवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला खात्री देतो की,त्यांना लवकरच केंद्रीय उपक्रमाचा लाभ मिळेल. तसेच, संदेशखाली प्रकरणावरून सुद्धा नरेंद्र मोदींनी टीएमसीच्या नेत्यांवर निशाणा साधला. याचबरोबर,केंद्र सरकार लोकांना मोफत रेशन आणि आरोग्याच्या सुविधा देत आहे. मात्र, टीएमसी बंगालमध्ये आमचा उपक्रम राबवत नाही. त्यामुळे तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागत आहे, असे मोदी म्हणाले. तसेच, बंगालमध्ये आमच्या माजी सैनिकांवर अन्याय होत आहे. या आव्हानात्मक काळात भाजपा तुमच्या पाठीशी उभा आहे आणि तुमचे जीवन सुकर करण्यासाठी माझ्या तिसऱ्या कार्यकाळात केंद्र सरकार तुम्हाला सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन नरेंद्र मोदी यांनी दिले.

Comments
Add Comment

प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जयघोष निनादणार

गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक' चित्ररथ सज्ज नवी दिल्ली: भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७७ व्या

आयडब्ल्यूडीसी ३.०' अंतर्देशीय जलमार्ग विकासाला नवी दिशा देणार

कोची : अंतर्देशीय जल वाहतूक (आयडब्ल्युटी) क्षेत्रातील यशावर प्रकाश टाकण्यासाठी आणि भविष्यातील दृष्टिकोन

कोळंबी उत्पादन आणि मत्स्यव्यवसाय विकासासाठी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक संपन्न

महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती नवी दिल्ली: देशातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा कायापालट

जम्मू काश्मीर : डोडा जिल्ह्यात लष्करी वाहनाला अपघात, १० जवानांचा मृत्यू

डोडा : जम्मू काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात लष्करी वाहन जरीत कोसळले. या अपघातात दहा जवानांचा मृत्यू झाला. तसेच अकरा

Vaishno Devi Dham : आता रात्रीही घेता येणार माता वैष्णोदेवीच्या प्राचीन गुहेचे दर्शन, वाचा नवीन वेळापत्रक

कटरा : माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या लाखो भाविकांसाठी श्राईन बोर्डाने एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय

चकमकीत ठार झाला एक कोटींचे बक्षीस लावलेला नक्षलवादी अनल दा, इतर १४ नक्षलवादीही ठार

रांची : गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीआधारे सापळा रचून झारखंड पोलिसांनी सारंडाच्या घनदाट जंगलात अनेक