Narendra Modi : बंगालचे नाव तृणमुलमुळे खराब झाले!

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल


कोलकाता : संदेशखालीमध्ये काय घडत आहे हे टीएमसीच्या नेत्यांना नेहमीच ठाऊक होते, परंतु गुन्हेगार त्यांच्यासाठी मालमत्ता असल्याने त्यांनी त्याच्यावर कधीही कारवाई केली नाही. ममता बॅनर्जीच्या तृणमुल पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात पश्चिम बंगालचे गौरवशाली नाव खराब झाले आहे. टीएमसीला संविधानाचे पालन करण्याचे निर्देश देण्यासाठी न्यायालयांना वारंवार हस्तक्षेप करावा लागला आहे, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.


देशात लोकसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यातील मतदान झाले आहे. आता तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे रोजी होणार आहे. या तिसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालमधील कृष्णनगर येथील प्रचारसभेला संबोधित केले. यावेळी नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालच्या टीएमसी सरकारवर जोरदार निशाणा साधला. टीएमसीने हे समजून घेतले पाहिजे की, ते काहीही झाले तरी सीएएची अंमलबजावणी थांबवू शकत नाहीत, असे नरेंद्र मोदी म्हणाले.


सीएएच्या माध्यमातून मी भारतीय नागरिकत्व मिळवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला खात्री देतो की,त्यांना लवकरच केंद्रीय उपक्रमाचा लाभ मिळेल. तसेच, संदेशखाली प्रकरणावरून सुद्धा नरेंद्र मोदींनी टीएमसीच्या नेत्यांवर निशाणा साधला. याचबरोबर,केंद्र सरकार लोकांना मोफत रेशन आणि आरोग्याच्या सुविधा देत आहे. मात्र, टीएमसी बंगालमध्ये आमचा उपक्रम राबवत नाही. त्यामुळे तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागत आहे, असे मोदी म्हणाले. तसेच, बंगालमध्ये आमच्या माजी सैनिकांवर अन्याय होत आहे. या आव्हानात्मक काळात भाजपा तुमच्या पाठीशी उभा आहे आणि तुमचे जीवन सुकर करण्यासाठी माझ्या तिसऱ्या कार्यकाळात केंद्र सरकार तुम्हाला सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन नरेंद्र मोदी यांनी दिले.

Comments
Add Comment

Himachal Pradesh Avalanche : अटल बोगद्याजवळ हिमस्खलन; सुदैवाने, कोणतीही जीवितहानी झाली नाही

हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळ असलेल्या अटल टनल रोहतांगच्या टोकाजवळ हिमखंड कोसळल्याची घटना घडली आहे. दोन

Nitish Kumar : नितीश कुमार १० एप्रिल रोजी राज्यसभा सदस्यत्वाची घेणार शपथ

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यसभेत प्रवेश करण्यास सज्ज झाले आहेत. त्यांच्या शपथविधीची तारीखही

Google Gemma 4 : एआय क्षेत्रात गुगलचा मोठा धमाका; GPT-5 आणि Llama 4 ला तगडी स्पर्धा

मुंबई : तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी Google ने आपले अत्याधुनिक आणि ‘ओपन-सोर्स’ कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल Gemma 4

Pakistan Threatens To Target Kolkata : पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी दिली भारताला धमकी; कोलकाता शहर पाकिस्तानच्या टार्गेटवर?

- शाहीन ३ मिसाइलच्या जोरावर पाकिस्तानचा भारताला धमकी देण्याचा नाहक प्रयत्न मुंबई :

Odisha Earthquake: ओडिशात भूकंपाचे धक्के, लोक घरातून बाहेर धावले; दृश्य सीसीटीव्हीत कैद

ओडिशा: ओडिशाच्या कोरापुट जिल्ह्यात शनिवारी रात्री उशिरा भूकंप झाला, ज्यामुळे सर्वत्र घबराट पसरली. रात्री सुमारे

Rain Alert: दिल्लीत पुन्हा पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला सतर्कतेचा इशारा; आणखी कोणत्या राज्यात बरसणार?

नवी दिल्ली: भारतीय हवामान विभागाने मंगळवारी दिल्लीसाठी पावसाचा इशारा दिला आहे. आयएमडीने म्हटले आहे की, आणखी एक