Gondavlekar Maharaj : कोणत्याही कृतीत हेतू शुद्ध पाहिजे


  • अध्यात्म : ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज


तमोगुण हा तिन्ही गुणांत जास्त जड असल्याने, त्याचा परिणाम या जगामध्ये लगेच दिसून येतो. दुष्टबुद्धी हा तमोगुणाचा परिणाम आहे. परंतु भगवंताच्या नामाने बुद्धी स्वच्छ करण्याची सोय माणसाच्या ठिकाणी आहे. यासाठी पुष्कळ नामस्मरण करावे. म्हणजे सत्त्वगुणाचा उदय होतो आणि बुद्धी शुद्ध बनते. देहाला कष्ट दिले म्हणजे भगवंत वश होतो, हे काही खरे नाही. तसे जर असते, तर रस्त्यात उन्हामध्ये खडी फोडणाऱ्यांना भगवंत लवकर वश झाला असता! भगवंताचे लक्ष आपल्या देहापेक्षा मनाकडे असते. आपल्या मनामध्ये प्रापंचिक हेतू ठेवून, भगवंताच्या नावाने उपवासासारखे कितीही कष्ट केले, तरी ते पाहून लोक फसतील, पण भगवंत फसणार नाही. आपण जसे बोलतो, तसे वागण्याचा अभ्यास करावा. परमार्थामध्ये ढोंग फार बाधक असते. प्रापंचिक गोष्टीकरिता उपवास करणे, ही गोष्ट मला पसंत नाही.



उपवास ‘घडावा’ यात जी मौज आहे, ती उपवास ‘करावा’ यामध्ये नाही. भगवंताच्या स्मरणामध्ये इतके तल्लीन व्हावे की, आपण नेहमी त्याच्याजवळ वास करतो आहोत, असे मनाला वाटावे. मग देहाने अन्न खाल्ले म्हणून कुठे बिघडले? या उलट आपल्या चित्तात भगवंताचे नाम नसताना आपण देहाने पुष्कळ उपवास केले, तरी अशक्तपणाशिवाय दुसरे काही पदरात पडणार नाही.



काही लोक वेडे असतात, त्यांना आपण उपासतापास कशासाठी करतो आहोत, हेच समजत नाही. कोणत्याही कृतीला वास्तविक मोल तिच्या हेतूवरून येते. हेतू शुद्ध असून, एखादे वेळी कृती बरी नसली, तरी भगवंताच्या घरी चालते; पण हेतू चांगला नसून कृती मात्र फार चांगली असली, तरी भगवंत त्यापासून दूरच राहतो. माणसाने केलेला उपवास निष्काम असून, तो केवळ भगवंताच्या स्मरणात राहावे म्हणून केलेला असला, तर फारच उत्तम आहे. निष्काम कर्माचे फार फार महत्त्व आहे. ‘भगवंतासाठी भगवंत हवा’ अशी आपली वृत्ती असावी. किंबहुना नाम घेत असताना, प्रत्यक्ष भगवंत समोर उभा ठाकला आणि ‘तुला काय पाहिजे?’ असे त्याने विचारले, तर ‘तुझे नामच मला दे’ हे त्याच्याजवळ मागणे, याचे नाव निष्कामता होय. कारण रुपाने व्यक्त झालेला भगवंत केव्हा तरी नाहीसा होईल, पण त्याचे नाम मात्र अखंड टिकेल आणि त्याचे नाम घेतले की त्याला आपल्याकडे येणे जरूर आहे. म्हणून देहाला कष्ट देण्याच्या भानगडीत न पडता, भगवंतासाठीच नाम घेत असावे. त्याची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही.



तात्पर्य : जेथे नाम तेथे राम हा ठेवावा विश्वास ।
कृपा करील रघुनाथ खास॥

Comments
Add Comment

Horoscope: दसऱ्याला बनतोय गुरू-बुध शक्तीशाली योग, या राशींना होणार लाभ

मुंबई: केंद्र योग आणि गुरु-बुध युतीमुळे मेष, कर्क, आणि धनु या राशींना १ ऑक्टोबर २०२५ च्या आसपास मोठा आर्थिक आणि

Navratri Ashtami kanya pujan 2025 : मुलींच्या पूजनाने पूर्ण होतील सर्व मनोकामना! महाअष्टमीला कन्या पूजनाचा विधी आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

नवरात्रोत्सव हा हिंदू धर्मातील शक्ती उपासनेचा एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा उत्सव आहे. या नऊ दिवसांमध्ये,

दसऱ्यानंतर ‘या’ राशींचे नशीब चमकणार! होणार धनलाभ आणि प्रगती

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे राशी परिवर्तन (गोचर) मानवी जीवनावर मोठा परिणाम करतात. लवकरच बुध ग्रह आपली

Navratri 2025 : नवरात्रीत कांदा आणि लसूण खाणं पाप? यावर प्रेमानंद महाराज काय म्हणाले?

शारदीय नवरात्र उत्सवाला २२ सप्टेंबरपासून भव्य सुरुवात झाली आहे. देशभरातील श्रद्धालूंनी या नऊ दिवसांच्या

माता शैलपुत्रीच्या आवडत्या फुलाचे रोप नवरात्रीत घरात नक्की लावा, देवीच्या आशीर्वादाने घरात भरभराट होईल.

माता शैलपुत्रीच्या आवडत्या फुलाचे रोप नवरात्रीत घरात नक्की लावा, देवीच्या आशीर्वादाने घरात भरभराट

नवरात्र उत्सवात गरबा नृत्यावर पावसाचे पाणी

नवरात्र उत्सवात गरबा नृत्यावर पावसाचे पाणी -विनायक बेटावदकर कल्याण शहरात मोठ्या उत्साहात गणपती उत्सव साजरा