मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराजवळ १४ एप्रिल रोजी गोळीबार (Firing) करण्यात आला. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी अत्यंत वेगाने हालचाली करत आरोपींना ताब्यात घेतले. दरम्यान, यातील एका आरोपीने अनुज थापनने (Anuj Thapan) काल तुरुंगात आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मात्र, आता अनुजच्या कुटुंबियांनी त्याने ही आत्महत्या केली नसून त्याची हत्या करण्यात आली आहे, असा दावा केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यासाठी अनुजने दोन्ही आरोपींना शस्त्रे पुरवली होती. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. तुरुंगात अनुज थापनने आत्महत्येचा प्रयत्न केल्यावर त्याला जीटी रुग्णालयात नेण्यात आलं, तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. तर दुसरीकडे त्याच्या कुटुंबीयांनी तुरुंगात थापनची हत्या करण्यात आली असल्याचा आरोप केला आहे. थापनचा पोस्टमार्टम मुंबईबाहेर करण्याची मागणी कुटुंबीय करत आहेत.
सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणातील इतर दोन आरोपींना जबाब नोंदवण्यासाठी नेण्यात आले होते , त्यावेळी थापन इतर १० आरोपींसह एका कोठडीत होता. सकाळी ११ वाजताच्या सुमारास तो बाथरूममध्ये गेला आणि तिथे त्याने आत्महत्या केली. आरोपी अनुज थापन हा बिष्णोई टोळीशी संबंधित असून त्याच्याविरोधात खंडणी, शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी तीन गुन्हे दाखल आहेत.
मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…
मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…
मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…
थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…
मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…