Lok Sabha Election 2024: काँग्रेसला ६० वर्षात जमले नाही ते या सेवकाने १० वर्षात करून दाखवले – पंतप्रधान मोदी

Share

मुंबई: महाराष्ट्रातील माढा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(Pm narendra modi) आज निवडणुकीच्या प्रचाराची सभा घेतली. यावेळी येथील विशाल जनसमुदायाला संबोधित करताना मोदी म्हणाले, भाजप-एनडीए सरकार महाराष्ट्राला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याचे काम करत आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले गेल्या १० वर्षात तुम्ही मला जेव्हापासून काम करण्याची संधी दिली मी माझ्या शरीरातील कण न कण तसेच प्रत्येक क्षण तुमच्या सेवेत अर्पण केला आहे. आज देशातील लोक, महाराष्ट्रातील लोक मोदी सरकारची १० वर्षे आणि काँग्रेस सरकारची ६० वर्षे यातील फरक बघत आहेत. काँग्रेसला जे ६० वर्षांत जमले नाही ते तुमच्या या सेवकाने १० वर्षांत करून दाखवले आहे.

पंतप्रधान पुढे म्हणाले, महाराष्ट्राची जनता जेव्हा प्रेम आणि आशीर्वाद देते तेव्हा कोणतीच कसर मागे सोडत नाही. मात्र जेव्हा कोणी दिलेले वचन पूर्ण करत नाही तेव्हा महाराष्ट्राची जनता ते लक्षातही ठेवते आणि वेळ आल्यास हिशोबही पूर्ण करते.

पंतप्रधान मोदींनी यावेळी विरोधी पक्षावर हल्लाबोल करताना म्हटले, १५ वर्षांपूर्वी एक मोठे नेते येथे निवडणूक लढवण्यासाठी आले होते. तेव्हा त्यांनी मावळत्या सूर्याची शपथ घेऊन म्हटले होते की येथील दुष्काळ प्रभावित क्षेत्रापर्यंत पाणी पोहोचवू मात्र त्यांनी आपले वचन पूर्ण केले नाही. आता त्यांना शिक्षा देण्याची वेळ आली आहे.

काँग्रेसच्या १०० पैकी ६३ योजना आम्ही पूर्ण केल्या – पंतप्रधान मोदी

पंतप्रधान म्हणाले, विदर्भ असो मराठवाडा असो थेंबथेब पाण्यासाठी वाट पाहायला लावण्याचे पाप गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. काँग्रेसला देशाने ६० वर्षे राज्य करण्याची संधी दिली. या ६० वर्षांत जगातील अनेक देश पूर्णपणे बदलले मात्र काँग्रेसला शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पाणी पोहोचवता आले नाही. २०१४मध्ये साधारण १०० सिंचन योजना अशा होत्या ज्या अनेक दशकांपासून तशाच होत्या. यातील २६ योजना महाराष्ट्रातील होत्या. विचार करा किती मोठा धोका काँग्रेसने महाष्ट्राला दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, २०१४मध्ये सरकार बनल्यानंतर मी पूर्ण शक्ती सिंचन योजनांवर लावली. काँग्रेसने लटकवलेल्या १०० योजनांपैकी ६३ योजना आम्ही पूर्ण केल्या. प्रत्येक शेतात, प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवणे हे माझ्या जीवनाचे मोठे मिशन आहे.

शेतकऱ्यांचा पैसा लुटत होता पंजा – पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी म्हणाले, मोदी गावातील आपल्या बहिणींना सशक्त करण्यामध्ये गुंतले आहेत. गेल्या १० वर्षात आमच्या प्रयत्नांनी एक कोटी लखपती दीदी बनल्या आहेत. आता मोदींची ही गॅरंटी आहे की मी ३कोटी बहिणींना लखपती बनणार आहे. आधी दिल्लीतून शेतकऱ्यांच्या नावावर थोडे जरी पैसै निघत होते तेव्हा काँग्रेसचा पंजा ते लुटत होता मात्र दिल्लीत बसलेला तुमचा मुलगा आहे.

Recent Posts

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…

26 minutes ago

चंद्रपूर: येत्या २४ एप्रिल पर्यंत उष्णतेचा ‘येलो अलर्ट’

चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…

1 hour ago

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

8 hours ago

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

9 hours ago

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…

9 hours ago

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

10 hours ago