Lok Sabha Election 2024: काँग्रेसला ६० वर्षात जमले नाही ते या सेवकाने १० वर्षात करून दाखवले - पंतप्रधान मोदी

  49

मुंबई: महाराष्ट्रातील माढा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(Pm narendra modi) आज निवडणुकीच्या प्रचाराची सभा घेतली. यावेळी येथील विशाल जनसमुदायाला संबोधित करताना मोदी म्हणाले, भाजप-एनडीए सरकार महाराष्ट्राला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याचे काम करत आहे.


पंतप्रधान मोदी म्हणाले गेल्या १० वर्षात तुम्ही मला जेव्हापासून काम करण्याची संधी दिली मी माझ्या शरीरातील कण न कण तसेच प्रत्येक क्षण तुमच्या सेवेत अर्पण केला आहे. आज देशातील लोक, महाराष्ट्रातील लोक मोदी सरकारची १० वर्षे आणि काँग्रेस सरकारची ६० वर्षे यातील फरक बघत आहेत. काँग्रेसला जे ६० वर्षांत जमले नाही ते तुमच्या या सेवकाने १० वर्षांत करून दाखवले आहे.


पंतप्रधान पुढे म्हणाले, महाराष्ट्राची जनता जेव्हा प्रेम आणि आशीर्वाद देते तेव्हा कोणतीच कसर मागे सोडत नाही. मात्र जेव्हा कोणी दिलेले वचन पूर्ण करत नाही तेव्हा महाराष्ट्राची जनता ते लक्षातही ठेवते आणि वेळ आल्यास हिशोबही पूर्ण करते.


पंतप्रधान मोदींनी यावेळी विरोधी पक्षावर हल्लाबोल करताना म्हटले, १५ वर्षांपूर्वी एक मोठे नेते येथे निवडणूक लढवण्यासाठी आले होते. तेव्हा त्यांनी मावळत्या सूर्याची शपथ घेऊन म्हटले होते की येथील दुष्काळ प्रभावित क्षेत्रापर्यंत पाणी पोहोचवू मात्र त्यांनी आपले वचन पूर्ण केले नाही. आता त्यांना शिक्षा देण्याची वेळ आली आहे.



काँग्रेसच्या १०० पैकी ६३ योजना आम्ही पूर्ण केल्या - पंतप्रधान मोदी


पंतप्रधान म्हणाले, विदर्भ असो मराठवाडा असो थेंबथेब पाण्यासाठी वाट पाहायला लावण्याचे पाप गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. काँग्रेसला देशाने ६० वर्षे राज्य करण्याची संधी दिली. या ६० वर्षांत जगातील अनेक देश पूर्णपणे बदलले मात्र काँग्रेसला शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पाणी पोहोचवता आले नाही. २०१४मध्ये साधारण १०० सिंचन योजना अशा होत्या ज्या अनेक दशकांपासून तशाच होत्या. यातील २६ योजना महाराष्ट्रातील होत्या. विचार करा किती मोठा धोका काँग्रेसने महाष्ट्राला दिला आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, २०१४मध्ये सरकार बनल्यानंतर मी पूर्ण शक्ती सिंचन योजनांवर लावली. काँग्रेसने लटकवलेल्या १०० योजनांपैकी ६३ योजना आम्ही पूर्ण केल्या. प्रत्येक शेतात, प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवणे हे माझ्या जीवनाचे मोठे मिशन आहे.



शेतकऱ्यांचा पैसा लुटत होता पंजा - पंतप्रधान मोदी


पंतप्रधान मोदी म्हणाले, मोदी गावातील आपल्या बहिणींना सशक्त करण्यामध्ये गुंतले आहेत. गेल्या १० वर्षात आमच्या प्रयत्नांनी एक कोटी लखपती दीदी बनल्या आहेत. आता मोदींची ही गॅरंटी आहे की मी ३कोटी बहिणींना लखपती बनणार आहे. आधी दिल्लीतून शेतकऱ्यांच्या नावावर थोडे जरी पैसै निघत होते तेव्हा काँग्रेसचा पंजा ते लुटत होता मात्र दिल्लीत बसलेला तुमचा मुलगा आहे.
Comments
Add Comment

जागतिक महासागर दिवस २०२५: भारतातील ५ सर्वात स्वच्छ किनारे कोणते आहेत जे तुम्ही एक्सप्लोर केले पाहिजेत?

देश-विदेशातील लोक भारताची संस्कृती, खाद्यपदार्थ आणि नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी येतात. आता जर तुम्ही कुठेतरी

दंगल सुरू झाल्यामुळे मणिपूरच्या पाच जिल्ह्यांत पाच दिवस इंटरनेट आणि मोबाईल नेटवर्क बंद

इंफाळ : राष्ट्रीय तपास संस्थेने अर्थात एनआयएने मैतेई ग्रुप आरंबाई टेंगोलच्या पाच जणांना अटक केली आहे. यातील एक

एलॉन मस्क यांच्यावरून ट्रम्प - पुतिन यांच्यात जुंपणार?

रशियाने देऊ केला राजकीय आश्रय वॉशिग्टन: टेस्ला कंपनीचे सीईओ आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणातील मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना मिळणार २५ लाखांची मदत

मुंबई: बंगळुरूच्या एम.चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या दुर्देवी घटनेनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री

भारतातील २७ कोटी नागरिक गरिबीतून बाहेर

जागतिक बँकेच्या नव्या अहवालातील माहिती मोदींच्या विविध योजनांचे यश, महाराष्ट्राचा मोठा वाटा नवी दिल्ली :

सोनिया गांधी सिमल्याच्या रुग्णालयात

सिमला : काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांना सिमला येथील इंदिरा गांधी