IPL 2024: कोलकाताने दिल्लीला हरवत पॉईंट्स टेबलमध्ये केला बदल?

मुंबई: आयपीएल २०२४मधील ४७वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळवण्यात आला होता. यात कोलकाता नाईट रायडर्सने बाजी मारली. ईडन गार्डन्समध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात कोलकाताने ७ विकेटनी विजय मिळवला. हा केकेआरचा एकतर्फी विजय होता. आता या विजयानंतर पॉईंट्स टेबलमध्ये काय बदल झाले आहेत ते जाणून घेऊया...


दिल्लीविरुद्ध विजय मिळवल्यानंतर कोलकाता १२ गुण आणि +1.096 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर पराभव झालेला दिल्लीचा संघ सहाव्या स्थानावर आहे. दिल्लीकडे १० गुण आणि -0.442 हा रनरेट आहे.


पॉईंट्सटेबलमधील टॉप ४ संघांवर नजर टाकली असताना राजस्थान रॉयल्स १६ पॉईंट्ससह अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर कोलकाता १२ पॉईंट्ससह दुसऱ्या स्थानावर येते. यानंतर चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायजर्स हैदराबाद १०-१० गुणांसह अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. चेन्नईकडे +0.810 आणि हैदराबादकडे +0.075 चा रनरेट आहे.



बाकी संघाची अशी स्थिती


बाकी संघाना पाहिल्यास लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स १०-१० गुणांसह अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत. त्यानंतर गुजरात टायटन्स ८ गुणांसह सातव्या स्थानावर आहे. त्यानंतर पंजाब किंग्स, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ६-६ गुणांसह अनुक्रमे आठव्या, नवव्या आणि दहाव्या स्थानावर आहेत.

Comments
Add Comment

जोश हेझलवूडची एमसीजीवर 'ड्रीम स्पेल'!

मेलबर्न: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड याने शुक्रवार, ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी मेलबर्न क्रिकेट

आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ अंतिम सामन्यासाठी पंचांची घोषणा

नवी मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील विश्वचषक २०२५ च्या अंतिम

महिला संघाने विश्वचषक जिंकल्यास गावस्कर करणार हे विशेष काम

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघ वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात दिमाखात दाखल झाला आहे. भारतीय महिला संघ आता

मेलबर्नमध्ये भारताचा पराभव: ऑस्ट्रेलियाची १-० ने आघाडी!

मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेतील दुसरा सामना मेलबर्नमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने

भारताची फलंदाजी कोलमडली, अभिषेक शर्माचे लढाऊ अर्धशतक व्यर्थ: टी-२० सामन्यात पुन्हा निराशाजनक कामगिरी

मेलबर्न : वनडे मालिकेत पराभवाचा धक्का बसल्यानंतर टी-२० मालिकेत पुनरागमनाची स्वप्नं पाहणाऱ्या भारतीय संघाला

सामन्याच्या अंतिम क्षणी केवळ बायबलच्या त्या ओळी म्हटल्या, विजयानंतर भावूक झाली जेमिमा

नवी मुंबई : ऑस्ट्रेलियाला महिला वर्ल्ड कपच्या सेमीफायनल सामन्यात धूळ चारल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्सच्या डोळ्यात