Trafficking in illegal money : दादर येथे कारमध्ये आढळली तब्बल १ लाख ८० हजारांची रोकड!

निवडणुकीच्या काळात घडला बेकायदेशीर प्रकार


मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) काळात आचारसंहिता (Code of conduct) लागू झाल्याने निवडणूक आयोग (Election Commission) राजकीय नेते व राजकीय पक्षांच्या प्रत्येक हालचालीवर व वक्तव्यावर बारीक नजर ठेवून आहे. आचारसंहितेचा भंग होत नसल्याची दखल आयोगाकडून घेतली जात आहे. यासाठी ठिकठिकाणी निवडणूक आयोगाचे पथक, पोलीस अन् आयकर विभागाची नजर कायम आहे. मात्र, अशातच दादरसारख्या अत्यंत वर्दळ असलेल्या ठिकाणाहून एक मोठी बातमी समोर आली आहे. आचारसंहिता काळात रोख रक्कम बाळगण्यास निर्बंध असताना दादरच्या शिंदेवाडी परिसरात एका कारमधून लाखो रुपयांची रोकड जप्त (Mumbai Cash Seized) करण्यात आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, दादरच्या शिंदेवाडी परिसरात एक कारमध्ये तब्बल १ लाख ८० हजारांची रोकड होती. ही सर्व रोकड ५०० रुपयांच्या करकरीत नोटांच्या स्वरुपात होती. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लावण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी गाडी अडवून तपासणी केली असता ही रोकड आढळली. निवडणूक भरारी पथकाने भोईवाडा पोलिसांच्या मदतीने रक्कम जप्त केली. या पैशांबाबत चालकाकडे कोणतीही कागदपत्रे आढळून न आल्याने पोलिसांनी कारवाई केली आहे.


निवडणूक काळात प्रामुख्याने रोकड, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान वस्तूंची मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होत असते. मुंबईत राज्यातील अनेक जिल्ह्यांमधून तसेच बाहेरील राज्यांमधून दररोज अनेक गाड्यांची वाहतूक होत असते. त्यातूनही पैशांची वाहतूक होण्याची शक्यता आहे. मतदारांना भुलवण्यासाठी याचा वापर केला जातो. ते रोखण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे अनेक ठिकाणी तपासणी नाके उभारले जातात आणि संशयित वाहनांना थांबवून त्यांची तपासणी केली जाते.


त्यामुळे मुंबई शहर, उपनगर तसेच मुंबई लगतच्या शहरांमधील एन्ट्रीवर नाकाबंदी करण्यात आली असून गाड्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. मतदानाच्या आधीचे चार दिवस हे अतिशय महत्त्वाचे असून, या दिवसांत सुरक्षा दलाची कुमक वाढवली जाणार आहे.


Comments
Add Comment

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री

मुंबईत दुपारी दीड वाजेपर्यंत २९.९६ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान सुरू आहे.

मुंबईच्या इस्लामीकरणाचे षडयंत्र ‘टीस’च्या अहवालातून उघड

मुंबई  : २०५१ पर्यंत मुंबईतील हिंदू लोकसंख्या केवळ ५४ टक्के उरेल, अशी धक्कादायक माहिती देशातील अग्रगण्य टाटा