IPL 2024: प्लेऑफसाठी संघामधील चुरस शिगेला

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचे ४६ सामने खेळवले गेले आहेत आतापर्यंत एकचा असा संघ आहे ज्यांनी प्लेऑफसाठी जागा निश्चित केल्याचे दिसत आहे. तर ५ संघ असे आहेत ज्यांचे गुण समान आहे तर ३ संघाची स्थिती खूपच खराब आहे. आयपीएलच्या पुढील टप्प्यात जाण्यासाठी या संघांचा संघर्ष सुरू आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सलग दोन विजय मिळवत आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहे मात्र त्यांचा बाहेर जाण्याचा धोका अद्याप कायम आहे.


संजू सॅमसनचा संघ राजस्थान रॉयल्सने या हंगामात जबरदस्त खेळ केला आहे. त्यांनी ९ सामने खेळल्यानंतर ८ सामन्यांमध्ये विजय मिळवत १६ गुण मिळवले. त्यामुळे या संघाचे प्लेऑफमध्ये पोहोचणे निश्चित झाले आहे. पॉईंट्सटेबलमध्ये ते अव्वल स्थानावर आहे. तर दुसऱ्या स्थानावर कोणता संघ असेल याचा निर्णय कठीण होत चालला आहे.



५ संघाचे समान गुण


राजस्थान रॉयल्सचा संघ सोडला तर स्पर्धेत इतर संघासाठी चढ-उतारानी भरलेली होती. कोलकाता नाईटरायडर्स, चेन्नई सुपर किंग्स, सनरायजर्स हैदराबाद, लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्सकडे ५ सामन्यातील विजयाचे १० गुण आहे. यात केवळ दिल्लीनेच १० सामने खेळले आहेत. तर कोलकाताने ९ सामने खेळले आहेत. तर इतरांनी ९ सामने खेळले आहेत. अशातच श्रेयस अय्यरच्या संघाला दुसऱ्या स्थानावर जाण्याची मोठी संधी आहे.



३ संघावर बाहेर जाण्याची नामुष्की


विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सलग ६सामन्यांत पराभव स्वीकारल्याने त्यांचा मार्ग कठीम झाला आहे. गेल्या दोन सामन्यात संघाने भले विजय मिळवला असेल मात्र ४ सामन्यानंतरही त्यांचे १४ गुण होतील. मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्याकडे ५ सामने शिल्लक आहेत. दोघांचे ६ गुण आहेत. सर्व सामने जिंकून ते १६ गुणांपर्यंत पोहोचू शकतात. मात्र एकही सामना जरी हरले तरी प्लेऑफमध्ये जाण्यासाठी नेट रनरेटवर अवलंबून राहावे लागेल.

Comments
Add Comment

भारत - ऑस्ट्रेलिया पहिला T20 सामना २९ ऑक्टोबरला, पहा टीम इंडियाची संभाव्य Playing XI

मुंबई : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताचा पराभव झाला. ही मालिका ऑस्ट्रेलियाने २-१

बाईपण भारी देवा ! ७ महिन्यांची गरोदर तरीही १४५ किलो वजन उचलत जिंकली वेटलिफ्टिंग स्पर्धा

दिल्ली : आयुष्यात काहीही अशक्य नसत फक्त जिद्द असायला हवी . दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल सोनिका यादव यांनी हे सिद्ध

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेचा २९ ऑक्टोबरपासून थरार

दुपारी १.४५ वाजता सामन्यांना होणार सुरुवात मुंबई  : भारतीय संघाचा सध्या ऑस्ट्रेलिया दौरा सुरू आहे. नुकतीच तीन

श्रेयस अय्यर आयसीयूमधून बाहेर

गंभीर दुखापतीनंतर प्रकृती स्थिर मुंबई  : भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज श्रेयस अय्यर याची प्रकृती अद्यापही

मला चिंता नाही, सूर्यकुमार यादवच्या खराब फॉर्मवर प्रशिक्षक गौतम गंभीरचा पूर्ण पाठिंबा!

मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आगामी टी-२० मालिकेपूर्वी टीम इंडियाचे मुख्य

भारत-ऑस्ट्रेलिया महिला वर्ल्डकप उपांत्य सामना पावसामुळे रद्द झाल्यास काय होईल? वाचा नियम

मुंबई : महिला वनडे वर्ल्डकप २०२५ आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, क्रिकेट चाहत्यांना उपांत्य फेरीतील रोमांचक