IPL 2024: प्लेऑफसाठी संघामधील चुरस शिगेला

  80

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचे ४६ सामने खेळवले गेले आहेत आतापर्यंत एकचा असा संघ आहे ज्यांनी प्लेऑफसाठी जागा निश्चित केल्याचे दिसत आहे. तर ५ संघ असे आहेत ज्यांचे गुण समान आहे तर ३ संघाची स्थिती खूपच खराब आहे. आयपीएलच्या पुढील टप्प्यात जाण्यासाठी या संघांचा संघर्ष सुरू आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सलग दोन विजय मिळवत आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहे मात्र त्यांचा बाहेर जाण्याचा धोका अद्याप कायम आहे.


संजू सॅमसनचा संघ राजस्थान रॉयल्सने या हंगामात जबरदस्त खेळ केला आहे. त्यांनी ९ सामने खेळल्यानंतर ८ सामन्यांमध्ये विजय मिळवत १६ गुण मिळवले. त्यामुळे या संघाचे प्लेऑफमध्ये पोहोचणे निश्चित झाले आहे. पॉईंट्सटेबलमध्ये ते अव्वल स्थानावर आहे. तर दुसऱ्या स्थानावर कोणता संघ असेल याचा निर्णय कठीण होत चालला आहे.



५ संघाचे समान गुण


राजस्थान रॉयल्सचा संघ सोडला तर स्पर्धेत इतर संघासाठी चढ-उतारानी भरलेली होती. कोलकाता नाईटरायडर्स, चेन्नई सुपर किंग्स, सनरायजर्स हैदराबाद, लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्सकडे ५ सामन्यातील विजयाचे १० गुण आहे. यात केवळ दिल्लीनेच १० सामने खेळले आहेत. तर कोलकाताने ९ सामने खेळले आहेत. तर इतरांनी ९ सामने खेळले आहेत. अशातच श्रेयस अय्यरच्या संघाला दुसऱ्या स्थानावर जाण्याची मोठी संधी आहे.



३ संघावर बाहेर जाण्याची नामुष्की


विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सलग ६सामन्यांत पराभव स्वीकारल्याने त्यांचा मार्ग कठीम झाला आहे. गेल्या दोन सामन्यात संघाने भले विजय मिळवला असेल मात्र ४ सामन्यानंतरही त्यांचे १४ गुण होतील. मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्याकडे ५ सामने शिल्लक आहेत. दोघांचे ६ गुण आहेत. सर्व सामने जिंकून ते १६ गुणांपर्यंत पोहोचू शकतात. मात्र एकही सामना जरी हरले तरी प्लेऑफमध्ये जाण्यासाठी नेट रनरेटवर अवलंबून राहावे लागेल.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार