IPL 2024: प्लेऑफसाठी संघामधील चुरस शिगेला

  85

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचे ४६ सामने खेळवले गेले आहेत आतापर्यंत एकचा असा संघ आहे ज्यांनी प्लेऑफसाठी जागा निश्चित केल्याचे दिसत आहे. तर ५ संघ असे आहेत ज्यांचे गुण समान आहे तर ३ संघाची स्थिती खूपच खराब आहे. आयपीएलच्या पुढील टप्प्यात जाण्यासाठी या संघांचा संघर्ष सुरू आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सलग दोन विजय मिळवत आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहे मात्र त्यांचा बाहेर जाण्याचा धोका अद्याप कायम आहे.


संजू सॅमसनचा संघ राजस्थान रॉयल्सने या हंगामात जबरदस्त खेळ केला आहे. त्यांनी ९ सामने खेळल्यानंतर ८ सामन्यांमध्ये विजय मिळवत १६ गुण मिळवले. त्यामुळे या संघाचे प्लेऑफमध्ये पोहोचणे निश्चित झाले आहे. पॉईंट्सटेबलमध्ये ते अव्वल स्थानावर आहे. तर दुसऱ्या स्थानावर कोणता संघ असेल याचा निर्णय कठीण होत चालला आहे.



५ संघाचे समान गुण


राजस्थान रॉयल्सचा संघ सोडला तर स्पर्धेत इतर संघासाठी चढ-उतारानी भरलेली होती. कोलकाता नाईटरायडर्स, चेन्नई सुपर किंग्स, सनरायजर्स हैदराबाद, लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्सकडे ५ सामन्यातील विजयाचे १० गुण आहे. यात केवळ दिल्लीनेच १० सामने खेळले आहेत. तर कोलकाताने ९ सामने खेळले आहेत. तर इतरांनी ९ सामने खेळले आहेत. अशातच श्रेयस अय्यरच्या संघाला दुसऱ्या स्थानावर जाण्याची मोठी संधी आहे.



३ संघावर बाहेर जाण्याची नामुष्की


विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सलग ६सामन्यांत पराभव स्वीकारल्याने त्यांचा मार्ग कठीम झाला आहे. गेल्या दोन सामन्यात संघाने भले विजय मिळवला असेल मात्र ४ सामन्यानंतरही त्यांचे १४ गुण होतील. मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्याकडे ५ सामने शिल्लक आहेत. दोघांचे ६ गुण आहेत. सर्व सामने जिंकून ते १६ गुणांपर्यंत पोहोचू शकतात. मात्र एकही सामना जरी हरले तरी प्लेऑफमध्ये जाण्यासाठी नेट रनरेटवर अवलंबून राहावे लागेल.

Comments
Add Comment

R Ashwin IPL Retirement: आर. अश्विनने आयपीएलला दिला निरोप! म्हटले "प्रत्येक शेवट ही एक..."

चेन्नई: भारतीय ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण

मिस्टर ३६०' एबी डिव्हिलियर्सचे आरसीबीमध्ये पुनरागमनाचे संकेत, पण नव्या भूमिकेत!

बंगळुरू: रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघाचा लाडका खेळाडू, 'मिस्टर ३६०'

Dream11 OUT Team India Sponsorship : ऑनलाइन गेमिंग कायद्याचा फटका; BCCI ला तब्बल ११९ कोटींचा दणका, सरकारच्या निर्णयामुळे Dream११ मागे

मुंबई : भारत सरकारने अलीकडेच ऑनलाइन गेमिंग कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार पैशांच्या आधारे खेळल्या

Pujara Retirement : टीम इंडियामधून ९ महिन्यांत ४ दिग्गजांनी घेतली निवृत्ती

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीची त्सुनामी आल्याचे चित्र आहे. गेल्या ९

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये