Vande Bharat Metro: आता येत आहे वंदे भारत मेट्रो, रेल्वेने ट्रायल रनची तयारी केली सुरू

मुंबई: रेल्वेने गेल्या काही वर्षात वेगाने मॉर्डन होण्याची शर्यत लावली आहे. मॉर्डनायझेशनच्या या मार्गावर रेल्वेने वंदे भारत एक्सप्रेस आणि अमृत भारत एक्सप्रेस या रेल्वेसेवा सुरू केल्या. सोबतच रेल्वे स्थानकेही मॉडर्न होण्याच्या मार्गावर आहे.


आता भारतीय रेल्वे वंदे भारत ट्रेनचे(vande bharat train) मेट्रो व्हर्जन आणण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, याला वंदे भारत मेट्रो असे नाव दिले गेले आहे. ही ट्रेन लहान प्रवासासाठी फायदेशीर असेल. भारतीय रेल्वे वंदे भारत मेट्रोच्या ट्रायल रनला जुलैपासून सुरूवात केली जाणार आहे.



वंदे भारत मेट्रोमध्ये असणार ४ ते १६ कोच


रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार सध्या त्यांची प्राथमिकता वंदे भारत मेट्रो आहे. यात १२ कोच असतील. या ट्रेनला वेगाने चालण्याच्या हिशेबाने डिझाईन करण्यात आले आहे. यात चार कोच, आठ कोच आण १६ कोच असलेले मॉडेलही चालवले जाऊ शकतील. अधिक गर्दी असलेल्या मार्गावर १६ कोचची वंदे भारत मेट्रो ट्रेन चालवली जाईल. दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही ट्रेन फायदेशीर आहे.



१०० ते २५० किमी दूरपर्यंत चालणार


बिझनेस स्टँडर्डच्या रिपोर्टनुसार भारतीय रेल्वेच्या मते ही वंदे मेट्रो ट्रेन १०० ते २५० किमी दूरपर्यंत चालवली जाईल. पहिल्या टप्प्यात १२४ शहरांना वंदे मेट्रो एकमेकांना जोडेल. यात काही मार्ग निश्चित करण्यात आले आहे. यात लखनऊ-कानपूर, आगरा-मथुरा आणि तिरूपती-चेन्नई यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

सनातन एकता पदयात्रेदरम्यान बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्री यांची प्रकृती चिंताजनक

मथुरा : सनातन एकता पदयात्रेच्या आठव्या दिवशी बागेश्वर धामाचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ

उत्पन्ना एकादशीचे महत्त्व आणि पाळा हे नियम! जाणून घ्या सविस्तर...

दर महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील एकादशीला उपवास आणि व्रत केले जाते. प्रत्येक एकादशीला विशिष्ट असे

Honda India Power Products Q2 Results: होंडा इंडिया पॉवरचा तिमाही निकाल जाहीर निव्वळ नफ्यात थेट ३०.८०% वाढ

मोहित सोमण: होंडा इंडिया पॉवर प्रॉपर्टी लिमिटेडने आपला आर्थिक तिमाही निकाल जाहीर केला आहे. कंपनीला इयर ऑन इयर

बांगलादेशी, रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात कारवाई कडक करा: मंगलप्रभात लोढा यांची मागणी

मुंबई : एकीकडे मालाड आणि मालवणी परिसरात बांग्लादेशी आणि रोहिंगे घुसखोर राहत असल्याचे निदर्शनाला येत असतानाच

महाराष्ट्र शासनाचे रत्ने व आभूषणे धोरण जाहीर

मुंबई : राज्य सरकारनं रत्ने आणि आभूषण उद्योगाला जागतिक स्पर्धेत आघाडीवर नेण्यासाठी राज्य शासनाने ‘रत्ने व

पर्यावरणवादी पद्मश्री सालूमरदा थिमक्का यांचे निधन

वयाच्या ११४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास नवी दिल्ली : प्रसिद्ध पर्यावरणवादी, पद्मश्री पुरस्कार विजेत्या