मुंबई: रेल्वेने गेल्या काही वर्षात वेगाने मॉर्डन होण्याची शर्यत लावली आहे. मॉर्डनायझेशनच्या या मार्गावर रेल्वेने वंदे भारत एक्सप्रेस आणि अमृत भारत एक्सप्रेस या रेल्वेसेवा सुरू केल्या. सोबतच रेल्वे स्थानकेही मॉडर्न होण्याच्या मार्गावर आहे.
आता भारतीय रेल्वे वंदे भारत ट्रेनचे(vande bharat train) मेट्रो व्हर्जन आणण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, याला वंदे भारत मेट्रो असे नाव दिले गेले आहे. ही ट्रेन लहान प्रवासासाठी फायदेशीर असेल. भारतीय रेल्वे वंदे भारत मेट्रोच्या ट्रायल रनला जुलैपासून सुरूवात केली जाणार आहे.
रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार सध्या त्यांची प्राथमिकता वंदे भारत मेट्रो आहे. यात १२ कोच असतील. या ट्रेनला वेगाने चालण्याच्या हिशेबाने डिझाईन करण्यात आले आहे. यात चार कोच, आठ कोच आण १६ कोच असलेले मॉडेलही चालवले जाऊ शकतील. अधिक गर्दी असलेल्या मार्गावर १६ कोचची वंदे भारत मेट्रो ट्रेन चालवली जाईल. दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही ट्रेन फायदेशीर आहे.
बिझनेस स्टँडर्डच्या रिपोर्टनुसार भारतीय रेल्वेच्या मते ही वंदे मेट्रो ट्रेन १०० ते २५० किमी दूरपर्यंत चालवली जाईल. पहिल्या टप्प्यात १२४ शहरांना वंदे मेट्रो एकमेकांना जोडेल. यात काही मार्ग निश्चित करण्यात आले आहे. यात लखनऊ-कानपूर, आगरा-मथुरा आणि तिरूपती-चेन्नई यांचा समावेश आहे.
मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…