Pratap Sarnaik : ठाण्यातून एकनाथ शिंदेंचा हुकमी एक्का प्रताप सरनाईक मैदानात?

लवकरच होणार घोषणा


ठाणे : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) दोन टप्प्याचे मतदान पार पडले तरी महायुतीमधील जागावाटप अद्याप फायनल झाले नाही. मुंबई, ठाणे, नाशिक, पालघर या जागांवर अद्याप महायुतीने उमेदवारच जाहीर केलेले नाहीत. मात्र ठाणे आणि नाशिक लोकसभा मतदारसंघ शिंदे गटाच्या वाट्याला आले असल्यामुळे या दोन्ही मतदार संघातील उमेदवारांची लवकरच घोषणा होईल, अशी माहिती मिळत आहे.


ठाणे लोकसभा मतदार संघ हा मुख्यममत्री शिंदे यांच्या गटाकडे आला असून मुख्यमंत्र्यांच्या जवळचे व विश्वासू सामजले जाणारे आमदार प्रताप सरनाईक यांना उमेदवारी मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, मीनाक्षी शिंदे आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांची नावे सध्या चर्चेत असून प्रताप सरनाईक यांना ठाण्यातून उमेदवारी जवळपास निश्चित झाली असल्याचे समोर आले आहे. तर डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या जवळचे माजी महापौर नरेश म्हस्के यांचे उमेदवारीसाठी नाव आघाडीवर असल्याचे समजते. याबाबत आज किंवा उद्या अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.


दरम्यान, ठाणे लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर रविवारी राजन विचारे यांनी उमेदवारी अर्ज घेतला. मात्र महायुतीतील भाजप किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील एकाही नेत्याने उमेदवारी अर्ज घेतला नाही. त्यामुळे महायुतीचा उमेदवार नक्की कधी जाहीर होणार, याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे.

Comments
Add Comment

अमेरिकेच्या निर्बंधांचा परिणाम! भारताचा रशियाकडून तेल खरेदीवर तात्पुरत्या बंदीचा निर्णय

नवी दिल्ली: अमेरिकेने रशियातील दोन प्रमुख तेल कंपन्या रोझनेफ्ट आणि लुकोइल यांच्यावर नव्या आणि कठोर निर्बंधांची

पाऊस पडल्यामुळे मुंबईची हवा झाली एकदम 'स्वच्छ'!

मुंबई : मुंबईत रात्री झालेल्या पावसामुळे मुंबईकरांना काही दिवसांपासूनच्या उष्णतेपासून आणि प्रदूषणापासून थोडा

“मोदी मिशन हे पुस्तक पुढच्या पिढीला प्रेरणा देणारं”, 'मोदीज् मिशन' मधील काही भाग पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सूचना

मुंबई :“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘मोदीज् मिशन’ हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे आणि संग्रहित

शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना सवलतीच्या दरात वीज

मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज सवलतीची केली घोषणा मुंबई : राज्य

मुंबईनजिक बांधणार देशातील सर्वाधिक लांबीची भिंत! पण यामागचे कारण काय?

मुंबई : पालघर जिल्ह्यात बांधले जाणारे वाढवण बंदर हा केंद्र सरकारचा एक खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे. या बंदरात

दिवाळी रोजगार मेळाव्यात मोदींनी ५१,००० हून अधिक जणांना दिली नोकरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'रोजगार मेळाव्यात' ५१,००० हून अधिक तरुणांना नोकरीची पत्रे दिली.