Hemant Soren : हेमंत सोरेन यांच्या तात्पुरत्या जामीनाचा अर्ज ईडीने फेटाळला!

काय आहे प्रकरण?


रांची : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना ईडीने (ED) जमीन घोटाळ्याप्रकरणी जानेवारी महिन्यात अटक केली. यानंतर हेमंत सोरेन यांनी त्यांचे चुलते राजाराम सोरेन यांचं निधन झाल्यामुळे १३ दिवसांचा जामीन द्यावा, अशी मागणी केली होती. या तात्पुरत्या जामिनावर आज ईडी कोर्टात सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे हा त्यांच्यासाठी मोठा धक्का आहे.


हेमंत सोरेन यांच्या वतीने दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं होतं की, त्यांचे चुलते राजाराम सोरेन यांचं निधन झालं आहे. त्यांच्या क्रियाकर्मासाठी १३ दिवसांचा जामीन द्यावा. परंतु ईडी कोर्टाने हेमंत सोरेन यांना तात्पुरता जामीन देण्यास नकार दिला आहे. कोर्टाने सोरेने यांची याचिका फेटाळून लावली आहे.


दरम्यान, जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने हेमंत सोरेन यांना अटक केली आहे. सध्या ते होटवार जेलमध्ये आहेत. या प्रकरणी कोर्टात सुनावणी झाली आणि दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने निर्णय सुरक्षित ठेवला.


यापूर्वी हेमंत सोरेन यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. २४ एप्रिल रोजी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यात म्हटलं होतं की, ईडीच्या अटकेविरोधातील याचिकेवर हायकोर्ट निर्णय देत नाहीये. उच्च न्यायालयाने २८ फेब्रुवारी रोजी आपला निकाल राखून ठेवला होता.

Comments
Add Comment

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च

पाचगणी ते महाबळेश्वर, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारताची ७ ठिकाणे झळकली!

महाराष्ट्राचा डंका! नवी दिल्ली : देशातील ७ सुंदर ऐतिहासिक स्थळांची नावे युनेस्कोच्या संभाव्य जागतिक वारसा