UP News : परिक्षेत लिहिले फक्त 'जय श्री राम' अन् विद्यार्थी झाले ५६ टक्क्यांनी पास!

  64

प्राध्यापकांवर होणार कठोर कारवाई


लखनऊ : सध्या देशभरात निवडणुकांचे वारे वाहत असताना राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या टीका-टिप्पणी हा चर्चेचा विषय ठरतो. त्याशिवाय देशभरात होणाऱ्या बाकी घडामोडीदेखील चर्चेचा चांगलाच विषय ठरत आहे. अशातच उत्तर प्रदेशात घडलेला एक अजब प्रकार समोर उघडकीस येत आहे. उत्तर प्रदेशामधील फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी परीक्षेत फक्त 'जय श्री राम' लिहले असून ते चक्क ५६ टक्क्यांनी पास झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याबाबत विद्यापीठाकडून संबंधित प्राध्यापकांची कसून चौकशी करत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं सांगितले जातं.



नेमकं प्रकार काय?


एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार हा अजब प्रकार उत्तर प्रदेशमधील वीर बहादूर सिंह पूर्वांचल विद्यापीठात घडला आहे. विद्यापीठाच्याच एका माजी विद्यार्थ्याने दाखल केलेल्या माहिती अधिकार अर्जातून हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या विद्यापीठात फार्मसीच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या चार विद्यार्थ्यांनी फार्मसीच्या परीक्षेत पेपरमध्ये फक्त ‘जय श्री राम, आम्ही पास होऊ देत’ आणि रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंड्या अशा काही भारतीय क्रिकेटपटूंची नावं लिहिली.


परीक्षेचे निकाल आल्यानंतर हे विद्यार्थी तब्बल ५६ टक्क्यांनी उत्तीर्ण झाल्याची बाब समोर आली. दिव्यांशू सिंह नावाच्या एका विद्यार्थ्यानं परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या संशयामुळे एकूण १८ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका मिळाव्यात व त्यांची पुनर्तपासणी करण्यासाठी आरटीआयअंतर्गत अर्ज दाखल केला. या विद्यार्थ्याला अर्जाच्या उत्तरादाखल मिळालेल्या उत्तर पत्रिकांपैकी चार विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकांमध्ये हा सगळा मजकूर असल्याचं दिसून आलं.



प्राध्यापकांविरोधात पैसे खाल्ल्याचे आरोप


दरम्यान, विद्यापीठातील प्राध्यापक पैसे घेऊन विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करत असल्याची तक्रार याआधीही समोर आली होती. यासंदर्भात संबंधित विद्यार्थ्याने उत्तर प्रदेशच्या राज्यपालांनाही पत्र लिहून तक्रार केली होती. त्यांनी २१ डिसेंबर २०२३ रोजी चौकशीचे आदेश दिले होते. अखेर यासंदर्भातला अहवाल सादर झाला असून संबंधित प्राध्यापक दोषी आढळून आले आहेत. हा प्रकार उघड झाल्यानंतर प्राध्यापकांवर लवकरच कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.


Comments
Add Comment

Rajasthan Accident : साथ जन्माची गाठ अधुरी! भीषण अपघातात वधू-वरासह ५ जण जागीच ठार

जयपूर : राजस्थानच्या जयपूर येथे आज, बुधवारी ट्रक आणि जीपची धडक होऊन भीषण अपघात झाला. यामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला

खासदार असदुद्दीन ओवैसींनी पंतप्रधान मोदींसोबतची भेट का टाळली ?

नवी दिल्ली : पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी केलेल्या कारवाईनंतर भारताने ऑपेशन सिंदूर राबवले.

शुभांशू शुक्ला यांचे उड्डाण पुन्हा पुढे ढकलले, Axiom-4मिशन लाँचिंगची तारीख लवकरच होणार जाहीर

नवी दिल्ली: भारताच्या हवाई दलाचे पायलट ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठीचे

“आगळीक केल्यास पाकिस्तानात घुसून मारू”- एस. जयशंकर

नवी दिल्ली : पाकिस्तानने दहशतवादी हल्ल्याची आगळीक केल्यास आम्ही पाकिस्तानात घुसून मोठा हल्ला करू असा इशारा

Rajasthan: पिकनिकसाठी गेलेल्या ८ जणांचा बुडून मृत्यू

जयपूर : राजस्थानच्या जयपूरहून टोंकमध्ये पिकनिकसाठी आलेले ११ तरुण बनास नदीत अंघोळीसाठी उतरलेले असताना वाहून

ChatGPT Down : चॅटजीपीटी डाऊन, कॉपी पेस्ट करणाऱ्या लोकांची उडाली झोप!

चॅटजीपीटी (Chat Gpt) हा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय आहे. लोकांनी त्याची क्षमता आजमावली आणि आता लोकांची क्रेझ