गुना : ‘पंतप्रधान मोदींनी या देशाच्या विकासात एससी, एसटी आणि ओबीसींना प्राधान्य दिले. दुसरीकडे या देशातील संपत्तीवर पहिला हक्क मुस्लिमांचा असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. काँग्रेसचा हेतू आम्ही पूर्ण होऊ देणार नाही. हा देश समान नागरी कायद्यावर (युसीसी) चालेल. हा आपल्या राज्यघटनेचा आत्मा आहे. आम्ही उत्तराखंडमध्ये यूसीसी आणले, आता देशभरात लागू करू. काँग्रेसला देशात मुस्लिम पर्सनल लॉ आणायचा आहे. पण, हा देश शरियतवर नाही, युसीसीवर चालेल, असे प्रतिपादन करत गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
लोकसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी दुसऱ्या टप्प्यातील मतदान झाले. आता तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारांचा प्रचार सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी गुना लोकसभा मतदारसंघात सभा घेत काँग्रेसवर जोरदार टीका केली.
‘काँग्रेस ओबीसीविरोधी पक्ष आहे. अनेक वर्षांपासून ओबीसी प्रवर्गातील लोकांना केंद्रीय संस्थांमध्ये आरक्षण दिले जात नव्हते. काँग्रेसने ७० वर्षे आपल्या मुलाप्रमाणे कलम ३७० वाढवले, तर पंतप्रधान मोदींनी हे कलम ३७० रद्द केले, असे अमित शहा म्हणाले.
‘पंतप्रधान मोदींनी या देशातून दहशतवाद आणि नक्षलवाद संपवला. आता ही निवडणूक देशाला तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनवण्याची निवडणूक आहे. पंतप्रधान मोदींनी देशात १ कोटी लखपती दीदी निर्माण केल्या, आता ही निवडणूक ३ कोटी मातांना लखपती दीदी बनवण्याची निवडणूक आहे. मोदींनी १० वर्षात देशातील कोट्यवधी गरीब जनतेसाठी खूप कामे केली आहे’, असेही शहा यावेळी म्हणाले.
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सची टक्कर गुजरात टायटन्सशी होत आहे. हा…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगत…
मुंबई : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नवीन मोबाईल घेऊ पाहत असाल तर, ओप्पोने भारतीय बाजारात नवा…