Lok Sabha Election 2024: १३ राज्यांतील ८८ जागांवर मतदान सुरू, राहुल गांधी, हेमा मालिनी, प्रकाश आंबेडकर यांची प्रतिष्ठा पणाला

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान २६ एप्रिल २०२४ला सकाळी ७ वाजल्यापासून सुरू झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात १३ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातील ८९ लोकसभा जागांवर मतदान होत आहे. मतदान संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहील. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात केरळच्या सर्व २० जागांवर मतदान होत आहे. यात राहुल गांधींच्या वायनाड मतदारसंघाचाही समावेश आहे.


लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रमुख उमेदवारांमध्ये राजनांदगाव येथून भूपेश बघेल, बंगळुरी ग्रामीण येथून डीके सुरेश, बंगळुरू उत्तर येथून शोभा करंदलाजे, बंगळुरू दक्षिण येथून तेजस्वी सूर्या, वायनाड येथून राहुल गांधी, तिरूअनंतपुरम येथून शशी थरूर, मथुरा येथून हेमा मालिनी यांचा समावेश आहे.


राज्यातून बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या मतदारसंघासाठी मतदान होत आहे. अकोला मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर, परभणी येथून संजय जाधव , यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघातून शिंदे गटाच्या उमेदवार राजश्री पाटील आणि शिवसेना ठाकरे गटाकडून संजय देशमुख यांच्यात लढाई आहे. नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकर उभे आहेत.


निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात १३ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातील ८८ जागांवर मतदान होत आहे. या टप्प्यात १५ कोटी ८८ लाख मतदार आहेत. दुसऱ्या टप्प्यात केरळमध्ये सर्वाधिक २० जागांवर मतदान होत आहे. राहुल गांधींच्या वायनाड मतदारसंघातही आज मतदान होत आहे. मोदी सरकारमधील ६ मंत्री आणि २ माजी मुख्यमंत्र्यांचा निर्णय आज होत आहे. आज ४ राज्यांतील मतदानाचे काम संपेल.

Comments
Add Comment

कंगना राणौत हिंदी सल्लागार समितीची सदस्य बनली,जाणून घेऊया किती वर्षांचा असेल कार्यकाळ

नवी दिल्ली : प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणौत ही आता आपल्याला चित्रपटासोबत मंत्रालयामध्ये देखील पहायला मिळणार

किश्तवाड जिल्ह्यातील रतले जलविद्युत प्रकल्पात २९ संशयित मजूर ?

श्रीनगर  : जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथे चिनाब नदीवर उभारल्या जाणाऱ्या ८५० मेगावॉट क्षमतेच्या ‘रतले हायड्रो

‘एगोज’च्या प्रसिद्ध ब्रँडची अंडी वादाच्या भोवऱ्यात

नवी दिल्ली  : अंड्याला आरोग्यासाठी ‘सुपरफूड’ मानले जाते, मात्र सध्या अंड्यांच्या गुणवत्तेवरून देशभरात एकच खळबळ

पत्नीकडे घर खर्चाचा हिशोब मागणे गुन्हा नाही

नवी दिल्ली  : पतीने पत्नीला घर खर्चाचा हिशोब ठेवण्यासाठी एक्सेल शीट बनवण्यास सांगणे क्रुरता नाही, तसेच या

अयोध्येच्या राम मंदिरात ७० नवे पुजारी

नवी मुंबई  : अयोध्येतील राम मंदिराचे काम पूर्ण झाले आहे. नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

चालक परवान्याचे वेळेत नूतनीकरण करणे अनिवार्य

नवी दिल्ली  : चालक परवान्याची मुदत ज्या दिवशी संपते, त्याच दिवसापासून संबंधित व्यक्तीचा चालक म्हणून असलेला दर्जा