Lok Sabha Election 2024: १३ राज्यांतील ८८ जागांवर मतदान सुरू, राहुल गांधी, हेमा मालिनी, प्रकाश आंबेडकर यांची प्रतिष्ठा पणाला

  89

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान २६ एप्रिल २०२४ला सकाळी ७ वाजल्यापासून सुरू झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात १३ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातील ८९ लोकसभा जागांवर मतदान होत आहे. मतदान संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहील. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात केरळच्या सर्व २० जागांवर मतदान होत आहे. यात राहुल गांधींच्या वायनाड मतदारसंघाचाही समावेश आहे.


लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रमुख उमेदवारांमध्ये राजनांदगाव येथून भूपेश बघेल, बंगळुरी ग्रामीण येथून डीके सुरेश, बंगळुरू उत्तर येथून शोभा करंदलाजे, बंगळुरू दक्षिण येथून तेजस्वी सूर्या, वायनाड येथून राहुल गांधी, तिरूअनंतपुरम येथून शशी थरूर, मथुरा येथून हेमा मालिनी यांचा समावेश आहे.


राज्यातून बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या मतदारसंघासाठी मतदान होत आहे. अकोला मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर, परभणी येथून संजय जाधव , यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघातून शिंदे गटाच्या उमेदवार राजश्री पाटील आणि शिवसेना ठाकरे गटाकडून संजय देशमुख यांच्यात लढाई आहे. नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकर उभे आहेत.


निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात १३ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातील ८८ जागांवर मतदान होत आहे. या टप्प्यात १५ कोटी ८८ लाख मतदार आहेत. दुसऱ्या टप्प्यात केरळमध्ये सर्वाधिक २० जागांवर मतदान होत आहे. राहुल गांधींच्या वायनाड मतदारसंघातही आज मतदान होत आहे. मोदी सरकारमधील ६ मंत्री आणि २ माजी मुख्यमंत्र्यांचा निर्णय आज होत आहे. आज ४ राज्यांतील मतदानाचे काम संपेल.

Comments
Add Comment

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )