महिला डॉक्टरांकडून उपचार घेतल्यास मृत्यूचे प्रमाण कमी, अभ्यासातून खुलासा

मुंबई: नुकत्याच केलेल्या संशोधनादरम्यान असे समोर आले आहे की ज्या रुग्णांवर महिला डॉक्टरांनी उपचार केले आहे त्यांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होते आणि त्यांना पुन्हा रुग्णालयात जाण्याची गरज कमी पडली. हा शोध एनल्स ऑफ इंटरनल मेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित झाला.



काय म्हणते संशोधन?


टोकियो युनिर्व्हसिटी जपानच्या संशोधनकर्त्यांनी ७०००००हून अधिक मेडिकेअर रुग्णांच्या डेटाचे विश्लेषण केले. यात २०१६ ते २०१९ या दरम्यान यांच्यावर उपचार करण्यात आले. यात ६५ वर्षाहून अधिक वयाचे होते आणि २०१६ ते २०१९ दरम्यान रुग्णालयात उपचार घेत होते.


या संशोधनात सामील साधारण ४६०००० महिला आणि ३२०००० पुरुष रुग्णांमध्ये एक तृतीयांश रुग्णांवर उपचार महिला डॉक्टरांनी केले. या अध्ययनात समोर आले की महिला आणि पुरूष रुग्णांमध्ये ज्यांच्यावर महिला डॉक्टरांनी उपचार केले त्यांचा मृत्यूदर कमी होता.



महिला रुग्णांना फायदे


खासकरून महिला रुग्णांसाठी याचा जास्त फायदा झाला. महिला डॉक्टरांशी महिला रुग्ण अगदी खुलेपणाने आजाराबद्दल बोलू शकतात आणि त्यामुळे व्यवस्थित काळजी घेता येते. तसेच समस्याही नीटपणे मांडल्या जातात.


रिसर्चनुसार हे ही समोर आले आहे की जर महिला डॉक्टरांची संख्या वाढवली तर त्या आपल्या आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करू शकतात. यासाठी महिलांना डॉक्टर बनण्यासाठी अधिक प्रोत्साहन दिले पाहिजे. यामुळे केवळ महिला रुग्णांनाच फायदा होणार नाही तर आपल्या आरोग्य सेवेतही समानता वाढेल.

Comments
Add Comment

२१,०००च्या गुंतवणुकीवर १५ लाख मिळवण्याचा दावा खरा की खोटा?

अर्थमंत्र्यांच्या नावाने 'खोटी' गुंतवणूक योजना! सावध राहण्याचे अर्थ मंत्रालयाचे आवाहन नवी दिल्ली: केंद्रीय

न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे नवे सरन्यायाधीश; २४ नोव्हेंबर रोजी पदभार स्वीकारणार

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांची भारताचे ५३वे सरन्यायाधीश म्हणून

भारताला सागरी रोजगाराचे जागतिक केंद्र बनवणार!

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी व्यक्त केला इंडिया मेरीटाईम वीकमध्ये विश्वास नवी दिल्ली : केंद्रीय

बिहारला ‘जंगलराज’ पासून वाचवा!

गृहमंत्री शहा आणि नड्डा यांचा बिहारच्या मतदारांना इशारा पाटणा: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे

२६/११ आरोपी 'राणा'चे पाकिस्तान कनेक्शन तपासा!

राष्ट्रीय तपास संस्थेकडूनअमेरिकेकडे विशिष्ट माहितीची मागणी; मोठी चौकशी सुरू नवी दिल्ली: राष्ट्रीय तपास

बिहार निवडणूक 2025 : फिलोदी सट्टा बाजारानं निवडणुकीच्या निकालाविषयी केलं भाकीत

पाटणा : बिहारमध्ये निवडणुकीचं तापमान चढलं असलं तरी सगळ्यांची नजर आता राजस्थानच्या प्रसिद्ध फिलोदी सट्टा