महिला डॉक्टरांकडून उपचार घेतल्यास मृत्यूचे प्रमाण कमी, अभ्यासातून खुलासा

मुंबई: नुकत्याच केलेल्या संशोधनादरम्यान असे समोर आले आहे की ज्या रुग्णांवर महिला डॉक्टरांनी उपचार केले आहे त्यांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होते आणि त्यांना पुन्हा रुग्णालयात जाण्याची गरज कमी पडली. हा शोध एनल्स ऑफ इंटरनल मेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित झाला.



काय म्हणते संशोधन?


टोकियो युनिर्व्हसिटी जपानच्या संशोधनकर्त्यांनी ७०००००हून अधिक मेडिकेअर रुग्णांच्या डेटाचे विश्लेषण केले. यात २०१६ ते २०१९ या दरम्यान यांच्यावर उपचार करण्यात आले. यात ६५ वर्षाहून अधिक वयाचे होते आणि २०१६ ते २०१९ दरम्यान रुग्णालयात उपचार घेत होते.


या संशोधनात सामील साधारण ४६०००० महिला आणि ३२०००० पुरुष रुग्णांमध्ये एक तृतीयांश रुग्णांवर उपचार महिला डॉक्टरांनी केले. या अध्ययनात समोर आले की महिला आणि पुरूष रुग्णांमध्ये ज्यांच्यावर महिला डॉक्टरांनी उपचार केले त्यांचा मृत्यूदर कमी होता.



महिला रुग्णांना फायदे


खासकरून महिला रुग्णांसाठी याचा जास्त फायदा झाला. महिला डॉक्टरांशी महिला रुग्ण अगदी खुलेपणाने आजाराबद्दल बोलू शकतात आणि त्यामुळे व्यवस्थित काळजी घेता येते. तसेच समस्याही नीटपणे मांडल्या जातात.


रिसर्चनुसार हे ही समोर आले आहे की जर महिला डॉक्टरांची संख्या वाढवली तर त्या आपल्या आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करू शकतात. यासाठी महिलांना डॉक्टर बनण्यासाठी अधिक प्रोत्साहन दिले पाहिजे. यामुळे केवळ महिला रुग्णांनाच फायदा होणार नाही तर आपल्या आरोग्य सेवेतही समानता वाढेल.

Comments
Add Comment

Andhra Pradesh Accident : आंध्र प्रदेशात खासगी ट्रॅव्हलची डंपरला जोरदार धडक; १३ जणांचा होरपळून मृत्यू

आंध्र प्रदेशातील मार्कापुरम जिल्ह्यात आज पहाटेच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली आहे. रायवरमजवळ एका खासगी

PM Narendra Modi : जगात मोदींचीच हवा! पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा बनले जगातील सर्वात लोकप्रिय नेते

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जागतिक स्तरावर सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून समोर आले आहेत.

खराब जेवण देणं पडलं महागात, भारतीय रेल्वेने आकारला ६० लाख रुपयांचा दंड

मुंबई: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. निकृष्ट दर्जाचे अन्न

रशियाकडून ६ कोटी बॅरल तेल खरेदी, एप्रिल महिन्यात होणार पुरवठा

नवी दिल्ली : आखाती देशातील युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून तब्बल ६ कोटी बॅरल तेलाची खरेदी केली

देशामध्ये १०० नवीन विमानतळ, २०० हेलीपॅड उभारणार, केंद्रीय मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत देशाच्या विमान वाहतूक, इमिग्रेशन आणि

देशभरात पेट्रोल-डिझेल, एलपीजीचा पुरवठा सुरळीत, सर्वपक्षीय बैठकीत सरकारची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली  : पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठकीचे