या राज्यातील लोक Mutual Fund मध्ये गुंतवतात सर्वाधिक पैसे, घ्या जाणून

मुंबई: भारतीय शेअर बाजारांमधील(indian share market) लोकांचा इंटरेस्ट आता वाढू लागला आहे. स्टॉक मार्केटबाबत जाणून घेण्याचा फायदा म्युच्युअल फंडनाही होत आहे. याच कारणामुळे म्युच्युअल फंडमध्ये पैसे लावणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. एका रिपोर्टनुसार मार्च २०२४ पर्यंत म्युच्युअल एयूएम ५५ लाख कोटी रूपयांच्या वर गेले. देशातील प्रत्येक कोपऱ्यातून आता लोक म्युच्युअल फंडमध्ये पैसे जमा करत आहेत. तुम्हाला माहीत आहे का म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीत कोणते राज्य आघाडीवर आहे.



पहिल्या स्थानावर महाराष्ट्र


रिपोर्टनुसार मार्चच्या अखेरीसपर्यंत म्युच्युअल फंडाचे एकूण असेट अंडर मॅनेजमेंट ५५ लाख कोटी रूपयांपेक्षा अधिक आहे. यात २२ लाख ५१ हजार कोटी रूपये केवळ महाराष्ट्रातून येतात. हा एफएफच्या एकूण एयूएमच्या ४०.९ टक्के हिस्सा आहे. इक्विटी एयूएममध्ये राज्याचा भाग २८.८ टक्के आणि डेटमध्ये ४५.६ टक्के होता. एकूण एयूएमच्या आधारावर म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकण्याच्या यादीत दिल्ली दुसऱ्या स्थानावर आहे.



कर्नाटक तिसऱ्या स्थानावर


एकूण एयूएमच्या आधारावर कर्नाटक तिसऱ्या स्थानावर आहे. इक्विटी एयूएममध्येही कर्नाटक तिसऱ्या स्थानावर आहे. याचा अर्थ म्युच्युअल फंडाच्या इक्विटी स्कीममध्ये कर्नाटकचे रहिवासी खूप पैसे लावत आहेत. शेअर बाजारमध्ये गुजराती लोक खूप पैसे गुंतवतात. मात्र म्युच्युअल फंडच्या एयूएमच्या आधारावर पाहिले असता गुजरात कर्नाटकच्या नंतर चौथ्या नंबरवर येतो. दरम्यान,इक्विटी एएयूएमबद्दल बोलायचे झाल्यास गुजरात दुसऱ्या स्थानावर आहे. डेट एयूएम चौथ्या स्थानावर आहे.

Comments
Add Comment

रविवार १ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि

मुंबईतील महापालिका प्रकल्प कामांना मिळणार गती, पुढील महिन्यात ताब्यात येणार १५०० प्रकल्पबाधितांसाठीच्या सदनिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : प्रकल्पबाधित नागरिकांच्या पुनर्वसनासाठी मुंबईतील महापालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय

मनरेगा मजुरांची होळी होणार आनंदात साजरी

केंद्राकडून १,१३८ कोटींची थकीत मजुरी मंजूर केंद्र सरकारकडून तब्बल ११३८ कोटी रुपयांची थकीत मजुरी राज्याला

'मुलांनी आणि तरुणांनी मराठी भाषा विसरू नये'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : इतर भाषांच्या प्रभावाखाली मराठी भाषा हळूहळू नाहीशी होईल, अशी भीती व्यक्त केली जाते. पण,

'या' तारखेला दिसणार महराष्ट्रात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार

मुंबई : यावर्षी जगात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण दिसत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच

उच्च व तंत्रशिक्षण मध्ये पदभरती प्रक्रियेत बदल करण्याच्या सूचनेचा विचार करू – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षणमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासन