या राज्यातील लोक Mutual Fund मध्ये गुंतवतात सर्वाधिक पैसे, घ्या जाणून

  111

मुंबई: भारतीय शेअर बाजारांमधील(indian share market) लोकांचा इंटरेस्ट आता वाढू लागला आहे. स्टॉक मार्केटबाबत जाणून घेण्याचा फायदा म्युच्युअल फंडनाही होत आहे. याच कारणामुळे म्युच्युअल फंडमध्ये पैसे लावणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. एका रिपोर्टनुसार मार्च २०२४ पर्यंत म्युच्युअल एयूएम ५५ लाख कोटी रूपयांच्या वर गेले. देशातील प्रत्येक कोपऱ्यातून आता लोक म्युच्युअल फंडमध्ये पैसे जमा करत आहेत. तुम्हाला माहीत आहे का म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीत कोणते राज्य आघाडीवर आहे.



पहिल्या स्थानावर महाराष्ट्र


रिपोर्टनुसार मार्चच्या अखेरीसपर्यंत म्युच्युअल फंडाचे एकूण असेट अंडर मॅनेजमेंट ५५ लाख कोटी रूपयांपेक्षा अधिक आहे. यात २२ लाख ५१ हजार कोटी रूपये केवळ महाराष्ट्रातून येतात. हा एफएफच्या एकूण एयूएमच्या ४०.९ टक्के हिस्सा आहे. इक्विटी एयूएममध्ये राज्याचा भाग २८.८ टक्के आणि डेटमध्ये ४५.६ टक्के होता. एकूण एयूएमच्या आधारावर म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकण्याच्या यादीत दिल्ली दुसऱ्या स्थानावर आहे.



कर्नाटक तिसऱ्या स्थानावर


एकूण एयूएमच्या आधारावर कर्नाटक तिसऱ्या स्थानावर आहे. इक्विटी एयूएममध्येही कर्नाटक तिसऱ्या स्थानावर आहे. याचा अर्थ म्युच्युअल फंडाच्या इक्विटी स्कीममध्ये कर्नाटकचे रहिवासी खूप पैसे लावत आहेत. शेअर बाजारमध्ये गुजराती लोक खूप पैसे गुंतवतात. मात्र म्युच्युअल फंडच्या एयूएमच्या आधारावर पाहिले असता गुजरात कर्नाटकच्या नंतर चौथ्या नंबरवर येतो. दरम्यान,इक्विटी एएयूएमबद्दल बोलायचे झाल्यास गुजरात दुसऱ्या स्थानावर आहे. डेट एयूएम चौथ्या स्थानावर आहे.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.