Salman Khan house firing : सलमान खानच्या घरावर ४० गोळ्या झाडण्याच्या देण्यात आल्या होत्या सूचना!

मुंबई पोलिसांनी न्यायलयामध्ये केले गौप्यस्फोट


मुंबई : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) याच्या घरावर झालेल्या गोळीबारप्रकरणी (Firing) मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) वेगाने तपास करत दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. या गोळीबाराचा संबंध लॉरेन्स बिश्नोईशी आहे. दरम्यान, आज दोन आरोपींना न्यायलयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी आरोपींच्या जबाबावरुन मुंबई पोलिसांनी अनेक मोठे गौप्यस्फोट केले आहेत. यामध्ये सलमान खानच्या घरावर आरोपींना गोळ्यांचा वर्षाव करण्याची सूचना देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खानच्या घरावर ४० गोळ्या झाडण्याच्या आरोपींना सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, आरोपींनी ५ गोळ्या फायर केल्या आणि १७ राऊंड पोलिसांनी जप्त केले. गोळीबार करून आरोपींनी पळ काढला. त्यांनी पोलिसांना गुंगारा देण्यासाठी अनेकदा कपडेही बदलले. जेणेकरून पोलीस त्यांना कपड्यावरून ओळखू नयेत. त्याशिवाय, हे दोन्ही आरोपी इंटरनेटच्या माध्यमातून तिसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात होते. यासाठी आरोपींचा एक मोबाइल वायफायने जोडलेला होता.


सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना राज्याच्या बाहेरूनही मदत पुरवण्यात आली. यामध्ये राजस्थान, बिहार आणि हरियाणातून आरोपींना मदत पुरवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या आरोपींना मदत पुरवणाऱ्या आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली.



आरोपींना २९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी


सलमान गोळीबार प्रकरणात आरोपी सागर पाल आणि विकी गुप्ता यांना मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने २९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता पोलीस चौकशीत आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

उबाठाच्या त्या माजी ज्येष्ठ नगरसेवकांना बसावे लागणार घरी

मुंबई (खास प्रतिनिधी) : आगामी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत उबाठाने आता तरुणांना आणि नवीन चेहऱ्यांनाच

महापालिकेच्या शीव रुग्णालयात अस्थिमज्जा प्रत्यारोपण सुविधा क्षमतेत ४०० टक्क्यांनी वाढ

तब्बल १२० प्रत्यारोपण केले जाणार मुंबई (खास प्रतिनिधी) : शीव (सायन) येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण

महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील

कोस्टल रोडच्या जोड रस्त्यांच्या बांधकामातील अडथळे दूर, जोड रस्त्याचे काम पूर्ण होताच लोखंडवाला, सात बंगल्यातील नागरिकांचा प्रवास सुकर

मुंबई (खास प्रतिनिधी) : कोस्टल रोड (उत्तर)ला जोडल्या जाणाऱ्या अतिरिक्त पुलाच्या जोडणीचे काम मागील दीड वर्षांपासून

शरद पवार-फडणवीस एकत्र! 'या' नेत्यांना मोठा धक्का! नक्की काय घडलं?

मुंबई : राज्याच्या राजकारणात नेहमीच एकमेकांविरोधात उभे ठाकणारे भाजपचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि

महाराष्ट्र सागरी मंडळाचे २६० कोटींचे सामंजस्य करार

हरित बंदर विकास विषयी डेन्मार्कच्या कंपनीसोबत मंत्री नितेश राणे यांची सविस्तर चर्चा मुंबई : नेस्को गोरेगाव