Breach of Code of Conduct : आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी काँग्रेस व भाजपा अध्यक्षांना निवडणूक आयोगाची नोटीस!

२९ एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे आदेश


नवी दिल्ली : सध्या देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु आहे. प्रचारासाठी राजकीय नेत्यांनी सभांचा धडाका लावला आहे. यामध्ये सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. मात्र, काहीवेळेस राजकीय नेत्यांकडून विरोधी टीका करताना आचारसंहितेचा भंग (Breach of Code of Conduct) केला जातो. या प्रकरणी भाजप आणि काँग्रेसकडून (BJP VS Congress) एकमेकांविरोधात निवडणूक आयोगात (Election Commission) तक्रार दाखल करण्यात आली होती. यावर निवडणूक आयोगाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या वक्तव्याची दखल घेत दोन्ही पक्षांना २९ एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.


समाजात द्वेष पसरवणे, धार्मिक तेढ निर्माण करणे, जात, धर्म आणि भाषेच्या आधारे भेदभाव करणे अशा प्रकारचे आरोप एकमेकांविरोधात करण्यात आले होते. या प्रकरणी निवडणूक आयोगाने पक्षाध्यक्षांना जबाबदार ठरवत भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांना नोटीस पाठवली आहे. नोटीसमध्ये २९ एप्रिलच्या सकाळी ११ वाजेपर्यंत उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


निवडणूक आयोगाने याप्रकरणी लोकप्रतिनिधी कायदा अनुच्छेद ७७ चा वापर करत स्टार प्रचारकांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी पक्षाच्या अध्यक्षांना जबाबदार धरलं आहे. त्यानुसार, आयोगाने दोन्ही अध्यक्षांच्या नावावर नोटीस पाठवली आहे. नोटीसमध्ये आयोगाने सांगितलं आहे की, राजकीय पक्षांची ही जबाबदारी आहे की त्यांनी आपले उमेदवार आणि स्टार प्रचारकांना संयमित भाषेचा वापर करण्यास सांगावे. मोठ्या पदावर बसलेल्या लोकांच्या भाषणाचा मोठा प्रभाव लोकांवर पडत असतो. त्यामुळे अशा लोकांनी बोलताना सावधगिरी बाळगायला हवी.



काय होत्या तक्रारी?


भाजपने राहुल गांधींच्या एका भाषणावर आक्षेप घेत आयोगाकडे तक्रार केली होती. तर, दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एका भाषण धार्मिक, जातीवादी आणि धर्माच्या नावावर द्वेष पसरवणारे होते असे म्हणत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. आतापर्यंत निवडणूक आयोगाकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने सर्वांना संयम ठेवून वक्तव्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्राप्त झालेल्या नोटिसीवर काँग्रेस आणि भाजप काय उत्तर देतं हे पाहावं लागेल.

Comments
Add Comment

Gujarat Tragedy : वडोदरा-हालोल महामार्गावर उभ्या ट्रकला लक्झरी बसची जोरदार धडक; ६ जणांचा जागीच मृत्यू, तर २६ प्रवासी जखमी

वडोदरा : गुजरात राज्याला (Gujrat News) हादरवून सोडणारी एक अत्यंत हृदयद्रावक आणि भीषण अपघाताची घटना बुधवारी पहाटे घडली

LPG ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना; 30 जूनपूर्वी 'ही' गोष्ट पूर्ण करा

अन्यथा सबसिडी मिळण्यात अडचण

Delhi Police : राजधानीत दहशतवादी कट उधळला! ISI समर्थित नेटवर्कचा दिल्लीत पर्दाफाश; शस्त्रे-ड्रग्ज तस्करीप्रकरणी सात जण जेरबंद

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा दहशतवादी कारवायांच्या सावटाखाली आल्याचे समोर आले आहे.

Vadodara Accident : गुजरातमध्ये भीषण बस अपघात; ट्रकला धडकून 5 प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी

Vadodara Accident: वडोदरा : गुजरातमधील (Gujarat) वडोदरा-जारोड महामार्गावर आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात (Accident) पाच जणांचा मृत्यू (Death)

Madhuri Vantara : 'वनतारा'च्या उपचारांनी 'माधुरी' हत्तीण झाली ठणठणीत, लवकरच कोल्हापूरला परतणार

जामनगर: गंभीर आजारपण आणि दोन्ही पायांच्या हाडांच्या दुखापतीमुळे मृत्यूच्या छायेत असलेल्या 'माधुरी' नावाच्या

Study Tours For Maharashtra Govt School : सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांचे नशीब उजळले! आता 'NASA' आणि 'ISRO' ची सफर

मुंबई : महाराष्ट्रातील सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी