RCB vs SRH: बंगळुरुच्या गोलंदाजीसमोर हैदराबादची दांडीगुल, तब्बल ३५ धावांनी विजय...

RCB Vs SRH: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने सलग तिसऱ्या सामन्यात 200 धावांचा टप्पा ओलांडण्यात यश मिळवले. विराट कोहली आणि रजत पाटीदारच्या अर्धशतकीय कामगिरीमुळे सनरायझर्स हैदराबाद (SRH) समोर 207 धावांचे लक्ष्य उभे राहिले.


हैदराबादच्या दोन्ही धडाकेबाज सलामीवीरांसोबत एडन मार्कराम याला  पॉवरप्लेमध्ये परत पाठवून बंगळुरूच्या संघाने सणसणीत सुरुवात केली. पहिल्याच षटकात ट्रॅव्हिस हेड तर चौथ्या षटकात अभिषेक शर्मा बाद झाला. त्यानंतर पाचव्या षटकात बेंगळुरूचा नवोदित गोलंदाज स्वप्नील सिंगने मार्कराम आणि हेनरिक क्लासेन यांची दांडीगुल केली. एसआरएचने या मोसमात पहिल्यांदाच पॉवरप्लेमध्ये चार विकेट गमावल्या आहेत.


हैदराबादच्या फलंदाजांनी मोठ्या फटकेबाजीची प्रतिष्ठा कायम ठेवण्याच्या प्रयत्नात  एका पाटोपाट एक अश्या विकेट गमावल्या. कर्ण शर्माने नितीश रेड्डी आणि अब्दुल समद यांना परत पाठवले, हे दोन हैदराबादच्या संघातील नावाजलेले भारतीय फलंदाज आहेत. हैदराबादसाठी कोणताही खेळाडु मोठी खेळी करु शकला नाही. त्यामुळे २० षटकांमध्ये हैदराबाद केवळ १७१ धावा बनवू शकले. बंगळुरुने हैदराबादवर तब्बल ३५ धावांनी विजय मिळवला.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत