RBI Action : आरबीआयची कडक कारवाई! 'या' बँकेतील ग्राहकांना खात्यातून पैसे काढण्यावर निर्बंध

मुंबई : रिझर्व्ह बँकेकडून वेळोवेळी बँकांविरोधात कडक पाऊले उचलण्यात आली आहेत. आरबीआयने (RBI) आयडीएफसी फस्ट बँक (IDFC First Bank), एलआयसी हाऊसिंग फायनान्स (LIC Housing Finance) तसेच शिरपूर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक ऑफ महाराष्ट्र (Shirpur Merchants Co-operative Bank) यावर आरबीआयने कारवाई केली होती. त्यानंतर आरबीआयने आता आणखी एका बँकेवर बंदी घातली आहे. महाराष्ट्रातील उल्हासनगर येथील कोणार्क अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने पैसे काढण्यासह अनेक निर्बंध लादले आहेत. या बँकेची आर्थिक परिस्थिती डबघाईला आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.


आरबीआयने केलेल्या कारवाईनुसार, कोणार्क अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर बैंकिंग नियमन कायदा १९४९ च्या कलम 35A अन्वये निर्बंध २३ एप्रिल २०२४ (मंगळवार) रोजी कामकाज बंद झाल्यापासून लागू झाले आहेत. या निर्बंधांमुळे रिझर्व्ह बँकेच्या परवानगीशिवाय बँक कोणतेही कर्ज आणि आगाऊ रक्कम मंजूर किंवा नूतनीकरण करू शकत नाही. कोणीही गुंतवणूक करू शकत नाही. कोणतेही दायित्व हस्तांतरित करू शकत नाही किंवा त्याच्या कोणत्याही मालमत्तेची विल्हेवाट लावू शकत नाही.


बँकेची सध्याची स्थिती लक्षात घेता ठेवीदाराच्या सर्व बचत खात्यांमध्ये किंवा चालू खात्यामध्ये किंवा इतर कोणत्याही खात्यातील एकूण शिल्लक रकमेतून कोणतीही रक्कम काढण्यास परवानगी दिली जाऊ शकत नाही, परंतु कर्जाचे समायोजन करण्यास परवानगी देण्यात आली आहे.



ग्राहकांना मिळणार ५ लाख रुपये


बँकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने बँकेवर हे निर्बंध लादण्यात आले आहेत. पात्र ठेवीदारांना ठेव विमा व पत हमी महामंडळाकडून (डीआयसीजीसी) त्यांच्या ठेवींमधून पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेव विमा दाव्याची रक्कम मिळणार आहे. बँकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईपर्यंत निर्बंधांसह बँकिंग व्यवहार सुरूच राहतील, असे आरबीआयने म्हटले आहे.

Comments
Add Comment

Deep Amavasya : दीप अमावस्येला कशी करावी दिव्यांची पूजा ? सविस्तर जाणून घ्या...

मुंबई : हिंदू पुराणानुसार, आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 'दीप अमावस्येला' घरातील सर्व दिव्यांची पूजा

Best Outfits For Beach Trip : समुद्रकिनारी स्टायलिश आणि कम्फर्टेबल दिसण्यासाठी ‘हे’ आउटफिट्स नक्की ट्राय करा

मुंबई : समुद्रकिनारी फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर कपड्यांची निवडही तितकीच महत्त्वाची ठरते. बीचवर उन्हं,

Dashmi Movie Poster Launch : अन्यायाविरुद्ध उठणार ‘दशमी’ची गर्जना! रहस्य, संघर्ष आणि स्त्रीशक्तीची कहाणी घेऊन मराठी चित्रपटाची दमदार एंट्री

मुंबई : भारतीय संस्कृतीत विजयादशमी म्हणजे केवळ सण नाही, तर अन्यायावर न्यायाचा, अधर्मावर धर्माचा आणि दुष्ट

Jalgaon : भंगार विक्रीतून मध्य रेल्वे मालामाल, भुसावळ विभाग ३३ कोटींच्या महसुलासह दुसऱ्या क्रमांकावर

Jalgaon : आजपर्यंत आपण तिकीट विक्री किंवा तिकीट तपासणी मधून रेल्वे विभागाने (Central Railway) कोटींची कमाई केल्याचे ऐकले असेल,

Empty Stomach Food : सकाळी रिकाम्या पोटी नक्की काय खावं अन् काय टाळावं? 'या' एका चुकीमुळे बिघडू शकतं तुमचं पचनतंत्र!

रिकाम्या पोटी प्रत्येकासाठी एकच पदार्थ योग्य असेल असे नाही. तुमची पचनशक्ती, अॅसिडिटी आणि इतर आरोग्यविषयक

Dombivli Barvi Dam : कल्याण - डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी, बारवी धरण ९९.८८ टक्के भरले

डोंबिवली : कल्याण - डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यातील मोठ्या भागाची तहान भागविणारे बारवी धरण ९९.८८