Heat Wave : मुंबईकरांची होणार लाहीलाही! हवामान विभागाकडून सर्तकतेचा इशारा!

पुढील तीन दिवस मुंबईसह 'या' राज्यांत वाढणार उकाडा


वेधशाळेकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन


मुंबई : देशभरात वाढत्या उन्हाच्या कडाक्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या दोन आठवड्यापासून मुंबईत उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे. त्यातच या तापमानाची वाढ आणखी तीन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दर्शवला आहे. मुंबईसह काही राज्यांत उकाडा वाढणार असल्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होणार असल्याचा सर्तकतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.


राज्यात अवकाळी पावसामुळे काही भागात गारवा पसरला आहे. मात्र मुंबईत निरभ्र आकाश आणि प्रखर सूर्यप्रकाशामुळे नागरिकांचा घामटा निघत आहे. मुंबई, ठाणे,पालघर, रायगडमध्ये आणखी दोन दिवस उष्णतेच्या तीव्र लाटेची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तापमान ३७ ते ३८ अंशांवर जाणार असून शनिवार, रविवार आणि सोमवारी उकाडा आणखी वाढणार आहे. तर २६, २७,२८ एप्रिल रोजी मुंबईसह पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात उन्हाचा पारा चढणार आहे. उकाडा वाढणार असल्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होणार आहे. त्यामुळे नागरिकांना आवश्यक काळजी घेण्याचं आवाहन कुलाबा वेधशाळेकडून करण्यात आले आहे.



अशी घ्या काळजी-



  • उन्हात गेल्यास डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करावा.

  • पांढरे, सौम्य रंगाचे व सैल असणारे कपडे घाला.

  • पुरेसे पाणी प्यावे. ताक, लिंबूपाणी अशा द्रव्य प्रदार्थांचा आहार घ्या.

  • दुपारी १२ ते सायंकाळी ४ च्या दरम्यान बाहेर जाणे शक्यतो टाळा.

Comments
Add Comment

पुणेकरांसाठी मनपाचा उपक्रम; 'क्यूआर' स्कॅन करा अन विकासकामे सुचवा

पुणे :  पुणे महापालिकेच्या २०२६-२७ च्या वार्षिक अर्थसंकल्पात पुणेकरांना थेट सहभाग घेता येणार आहे. शहराच्या

'ई-चलान' वसुलीसाठी सक्ती केल्यास पोलिसांवरच होणार कारवाई; पोलीस महासंचालकांचे निर्देश

मुंबई : रस्त्यावरील वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर आकारल्या जाणाऱ्या ‘ई-चलान’च्या दंडाची वसुली करताना

जळगावात मयत ग्राहकाच्या पत्नीला पैशाचं आमिष दाखवून...

जळगाव: जळगावमध्ये एका मयत ग्राहकाच्या पत्नीला पैशाचं आमिष देऊन अपघाताचं प्रकरण बनवलं आणि विम्याचे ५० लाख

सरकारने १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांसंदर्भातील दिली मोठी बातमी, काय सांगितलं?

नवी दिल्ली: देशातील चलनात १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांचा तुटवडा आहे का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. रोखीचे

जेएनपीए बंदरात कंटेनर अडकलेल्या फळे व भाजीपाला निर्यातदारांना मोठा दिलासा; पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील फळे व भाजीपाला उत्पादक शेतकरी व निर्यातदार यांचे हित लक्षात घेता केंद्र सरकारच्या

लोकनेते बाळासाहेब देसाई यांना ११६व्या जयंतीनिमित्त अभिवादन; मुख्यमंत्र्यांसह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

मुंबई: लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्या ११६व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम मुंबई येथील मेघदूत