Patra Chawl Scam : पत्राचाळ प्रकरणात संजय राऊतांना मोठा झटका!

  190

राऊतांच्या मित्राची ७३.६२ कोटींची मालमत्ता जप्त


मुंबई : पत्राचाळ घोटाळा (Patra Chawl Scam) प्रकरणात ईडीने मोठी कारवाई केली असून, ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांना (Sanjay Raut) मोठा झटका दिला आहे. पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीने राऊतांचे जवळचे कौटुंबिक मित्र प्रविण राऊत यांची ७३.६२ कोटींची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. आतापर्यंत पत्राचाळ घोटाळ्यात ११६.२७ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आज करण्यात आलेल्या कारवाईत ईडीने पालघर, दापोली, रायगड आणि ठाणे येथील मालमत्ता जप्त केली आहे.


ईडीने आज कारवाई केलेले प्रविण राऊत हे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचे कौटुंबिक मित्र असून, प्रविण यांच्या खात्यातून संजय राऊतांच्या पत्नीच्या खात्यात ५५ लाख रुपये गेले होते. मात्र, हे पैसे १० वर्षानंतर परत करण्यात आले. खात्यावर आलेले हे पैसे कर्ज रूपात घेतल्याचा दावा राऊतांच्या पत्नीने केला होता. त्यानंतर ईडीने राऊतांच्या मालमत्तेवरदेखील कारवाई केली होती.


प्रवीण राऊत यांचे संजय राऊत यांच्याशी कौटुंबिक संबंध आहेत. तर एचडीआयएल आणि पीएमसी बँक घोटाळ्याशी संबंधित असलेले वाधवान कुटुंबियांशी सुद्धा त्यांची जवळीक आहे. प्रवीण राऊत यांनी पीएमसी बँक घोटाळ्यात ९० कोटी रुपये हडपल्याचा आरोपही ईडीने केला आहे. प्रवीण राऊत यांचा एचडीआयएल आणि पीएमसी बँक घोटाळ्यात सहभाग असल्याची खात्री ईडीला आहे.


दरम्यान, गुरू आशिष बिल्डरने २००६ मध्ये जॉईंट व्हेंचरअंतर्गत पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला होता. त्यानंतर २००८ मध्ये या प्रकल्पाला सुरुवात झाली. मात्र, दहा वर्षांचा काळ उलटून गेल्यानंतरही हा प्रकल्प पूर्ण झाला नसल्याची बाब उघडकीस आली.


एवढेच नव्हे तर, बिल्डरने मूळ ६७८ रहिवाशांना वाऱ्यावर सोडून म्हाडाला १ हजार ३४ कोटींचा चुना लावला. गुरूआशिष कंपनीच्या संचालकांनी म्हाडाची दिशाभूल करून ९ त्रयस्त बिल्डरांना एफएसआय विकला आणि त्यातून ९०१ कोटी रुपये कमवले. तसेच रहिवाशांची घरेही बांधली नाहीत, असे ईडीचे म्हणणे आहे.

Comments
Add Comment

सेंच्युरी मिलची जागा गिरणी कामगारांच्या घरांसाठी मिळण्याचा मार्ग मोकळा

सेंच्युरी मिल व्यवस्थापनाने जागा देणार; गिरणी कामगार संघर्ष समितीच्या मागणीला यश मुंबई : वरळी येथील सेंच्युरी

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड, पालिकेआधी भाजपचा मोठा निर्णय, कोण आहेत अमित साटम?

मुंबई पालिका निवडणुकीच्याआधी भाजपने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड झाली आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात

मुंबईत सकाळी मुसळधार पाऊस, तासाभरात २० मिमी. पावसाची नोंद

मुंबई : मागच्या आठवड्याच्या सुरुवातीला पावसानं मुंबईला झोडपलं. यानंतर चार दिवस विश्रांती घेऊन पाऊस पुन्हा हजर

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या खात्यावर मुख्यमंत्र्यांची नाराजी, बैठकीला शिंदे उपस्थित नसल्याची माहिती

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाराजीच्या बातम्या समोर येत असताना

Health: मुलांची उंची आणि चांगले आरोग्य वाढवण्यासाठी उपयुक्त पदार्थ

मुंबई : मुलांच्या योग्य शारीरिक वाढीसाठी त्यांना योग्य आहार देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषतः त्यांची उंची