मुंबई: हिंदू धर्मात हनुमान जन्मोत्सव खास असतो. हिंदू पंचागानुसार हनुमान जन्मोत्सव चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पोर्णिमेला साजरी केली जाते. यावेळेस हनुमान जन्मोत्सव २३ एप्रिलला साजरी केली जात आहे. अंजना आणि केसरी यांचे पुत्र हनुमान यांना वानरदेवता, बजरंगबली आणि वायदेव या नावांनीही ओळखले जातात.
आज देशभरात हनुमान जन्मोत्सव साजरा केला जात आहे. हनुमानाला त्याची अपार शक्ती आणि ताकदीसाठी पूजन केले जाते. हनुमानाला विविध नावांनीही ओळखले जाते. जसे मारूती, बजरंगबली, पवन पुत्र, वीर हनुमान, संकटमोचन, केसरीनंदन अशीही नावे हनुमानाची आहेत.
हनुमान जयंती पोर्णिमा तिथी २३ एप्रिलला सकाळी ३ वाजून २५ मिनिटांनी सुरू झाली आहे आणि तिथीची समाप्ती २४ एप्रिलला म्हणजेच उद्या सकाळी ५ वाजून १८ मिनिटांनी होईल. ज्योतिषांच्या मते हनुमान जयंतीची पुजा अभिजीत मुहूर्तामध्ये करणे शुभ मानले जाते. अभिजीत मुहूर्त आज सकाळी ११ वाजून ५३ मिनिटांपासून दुपारी १२ वाजल्यापासून ४६ मिनिटांपर्यंत राहील.
आज सकाळी ४ वाजून २० मिनिटांपासून ते सकाळी ५ वाजून ४ मिनिटांपर्यंत राहील.
दुसरा मुहूर्त – सकाळी ९ वाजून ३ मिनिटांपासून ते सकाळी १० वाजून ४१ मिनिटांपर्यंत राहील.
तिसरा मुहूर्त रात्री असेल – रात्री ८ वाजून १४ मिनिटांपासून ते रात्री ९ वाजून ३५ मिनिटांपर्यंत असेल.
आधी श्रीरामाचा मंत्र ऊं राम रामाय नम:चा जप करा. त्यानंतर हनुमानाचा मंत्र ऊं हं हनुमते नम:चा जप करा.
हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाच्या मंदिरात जाऊन हनुमानासमोर तूप अथवा राईच्या तेलाचा दिवा लावा. तसेच ५ ते ११ वेळा हनुमान चालिसाचे पठण करा. यामुळे जीवनातील प्रत्येक समस्येपासून सुटका मिळते.
हनुमान मंदिरात जाऊन या दिवशी देवाची विधीवत पुजा करा. सोबतच बजरंग बाणचे पठण करा.
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…