BCCI: कोट्यावधींमध्ये आहे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांचा पगार

मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ जगातील सर्वात श्रीमंत मंडळ आहे. बीसीसीआयची लीग आयपीएलमधूनही तगडी कमाई करते. आयपीएलमुळेच अनेक खेळाडूंनाही भरपूर पैसे कमावण्याची संधी मिळते. साधारणपणे खेळाडूच्या पगाराबाबतची माहिती समोर येते. मात्र बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या पगाराबद्दल फार कमी लोकांना माहीत असते.


बीसीसीआयमध्ये जय शाह हे नाव नेहमीच चर्चेत असते. मात्र यासोबत त्यांच्यासह मंडळामध्ये अनेक महत्त्वाची लोक काम करतात. जय शाह सचिव आहेत. तर रॉजर बिन्नी अध्यक्ष आहेत. राजीव शुक्ला बीसीसीआयचे उपाध्यक्ष आहेत. जर आयपीएल पाहिली तर याचे चेअरमन पद अरूण धुमळ यांच्याकडे आहे.


रिपोर्टनुसार बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी यांना पगाराच्या रूपात दरवर्षी साधारण ५ कोटी रूपये मइळतात. रिपोर्टनुसार माजी अध्यक्ष सौरव गांगुलीलाही इतकाच पगार मिळत होता. तर सचिन आणि दुसऱ्या अधिकाऱ्यांनाही चांगली रक्कम मिळते.


एका रिपोर्टनुसार बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना मासिक पगार मिळत आहे तर दिवसाच्या हिशेबाने भत्ता मिळतो. रिपोर्टनुसार बोर्डाच्या सर्व सदस्यांना दर दिवशीच्या हिशेबाने एका बैठकीसाठी ४० हजार रूपये मिळतात. हा भत्ता आयपीएल चेअरमनवरही लागू होतो.


जय शाहच्या पगाराबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र रिपोर्टनुसार त्यांनाही दर दिवसाच्या हिशेबाने भत्ता मिळतो. जर ते परदेशी दौऱ्यावर गेले तर हा भत्ता वाढतो. यासोबतच येण्या-जाण्यासाठी बिझनेस क्लासचे तिकीटही मिळते.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत