मुंबई : गेल्या महिनाभरापासून मुंबईकरांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. सध्या तापमान ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून येत्या काही दिवसांत हे तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. याच वेळी घरातील एसी, पंखा, फ्रीज यांसारख्या वस्तूंचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. अशातच अदानी वीज कंपनीची वीज महागली असून त्याचा फटका वीज ग्राहकांना बसणार आहे. त्यामुळे नागरिकांना आता उन्हाच्या चटक्यांसोबत वाढत्या वीज बिलाचा शॉक बसणार आहे.
अदानी कंपनीने गतवर्षी झालेल्या इंधन खर्चातील ३१८ कोटी ३८ लाख रुपयांची वाढ वसूल करण्यासाठी राज्य ऊर्जा नियामक आयोगाकडे आदरपूर्वक प्रस्ताव सादर केला होता. याबाबत आयोगाने सोमवारी मान्यता दिली. ही रक्कम इंधन अधिभारातून मे ते २४ या काळात ग्राहकांकडून वसूल केली जाईल. या वाढत्या वीजेचा फटका तब्बल ३० लाख वीज ग्राहकांना बसणार आहे. तर वाणिज्य, औद्योगिक आणि इतर ग्राहकांसाठी, इंधन अधिभार वापरानुसार निर्धारित केला जाईल.
दक्षिणेकडील राज्यांमध्ये काही महिन्यांपूर्वीच वीजदरवाढ करण्यात आली. त्यानंतर उत्तरेकडील राज्यांमध्येही असाच निर्णय घेण्यात आला होता. पण महाराष्ट्राचा विचार केला तर वीजदरवाढ करण्यात आल्यामुळे महाराष्ट्र हे सर्वात महागडी वीज मिळणारं राज्य ठरलं आहे. आंध्र प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, गोवा, तेलंगणा, गुजरात आणि मध्य प्रदेशच्या तुलनेत महाराष्ट्रातील वीजेचा दर जास्त असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
वयाच्या १०० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास मुंबई : वयाच्या १० व्या वर्षी बालकलाकार म्हणून…
नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटना अर्थात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) यांनी तंबाखू (tobacco) वापरकर्त्यांसाठी…
९ विद्यार्थी जखमी रायगड : आज सकाळी कोल्हापूरमध्ये (Kolhapur Accident) हातकणंगले येथे सोलापूरहून कणकवलीला जाणाऱ्या…
नेमकं काय घडलं होतं तेव्हा? पुणे : पुण्यातील ससून हॉस्पिटलमधून (Sassoon Hospital) ड्रग्जमाफिया ललित पाटील…
दिवसभरातील (Prahaar Bulletin) महत्वाच्या बातम्या… संजय राऊतांना बाळासाहेब ठाकरेंना पण भोंदूबाबा म्हणायचंय का? आमदार नितेश…
'माझ्या एरियात राहायचे नाही,असे म्हणत माचिसची पेटलेली काडी अंगावर फेकली अन्... संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद…