Adani Electricity Price Hike : वीज ग्राहकांना उन्हाच्या चटक्यासोबत बसणार महावितरणाचा शॉक!

'इतक्या' रुपयांची वीज दरवाढ


मुंबई : गेल्या महिनाभरापासून मुंबईकरांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. सध्या तापमान ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून येत्या काही दिवसांत हे तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. याच वेळी घरातील एसी, पंखा, फ्रीज यांसारख्या वस्तूंचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. अशातच अदानी वीज कंपनीची वीज महागली असून त्याचा फटका वीज ग्राहकांना बसणार आहे. त्यामुळे नागरिकांना आता उन्हाच्या चटक्यांसोबत वाढत्या वीज बिलाचा शॉक बसणार आहे.


अदानी कंपनीने गतवर्षी झालेल्या इंधन खर्चातील ३१८ कोटी ३८ लाख रुपयांची वाढ वसूल करण्यासाठी राज्य ऊर्जा नियामक आयोगाकडे आदरपूर्वक प्रस्ताव सादर केला होता. याबाबत आयोगाने सोमवारी मान्यता दिली. ही रक्कम इंधन अधिभारातून मे ते २४ या काळात ग्राहकांकडून वसूल केली जाईल. या वाढत्या वीजेचा फटका तब्बल ३० लाख वीज ग्राहकांना बसणार आहे. तर वाणिज्य, औद्योगिक आणि इतर ग्राहकांसाठी, इंधन अधिभार वापरानुसार निर्धारित केला जाईल.



अशी असणार वीज दरवाढ



  • मे महिन्याच्या बिलापासून निवासी ग्राहकांच्या इंधन अधिभारात प्रति युनिट ७० पैसे ते १.७० रुपये इतकी मोठी वाढ होणार आहे.

  • ०-१००युनिट वीज वापर असणाऱ्या निवासी ग्राहकांकडून प्रति युनिट ७० पैसे

  • १०१-३०० युनिटसाठी १.१० रुपये

  • ३०१-५०० युनिटसाठी १.५ रुपये

  • ५०० हून अधिक वीज वापरासाठी १.७० रुपये इंधन अधिभार आकारण्यात येणार आहे.


महाराष्ट्रात सर्वात महागडी वीज


दक्षिणेकडील राज्यांमध्ये काही महिन्यांपूर्वीच वीजदरवाढ करण्यात आली. त्यानंतर उत्तरेकडील राज्यांमध्येही असाच निर्णय घेण्यात आला होता. पण महाराष्ट्राचा विचार केला तर वीजदरवाढ करण्यात आल्यामुळे महाराष्ट्र हे सर्वात महागडी वीज मिळणारं राज्य ठरलं आहे. आंध्र प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, गोवा, तेलंगणा, गुजरात आणि मध्य प्रदेशच्या तुलनेत महाराष्ट्रातील वीजेचा दर जास्त असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

Comments
Add Comment

सोन्याला उत्पन्नाचा स्त्रोत बनवण्याची हीच वेळ आहे...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिलांसाठी, सोने हे फक्त दागिने नसतात तर त्यांच्या भावना त्याच्याशी जोडलेल्या असतात.

भारतातील पेट्रोल पंपांची संख्या १ लाखांवर, ९० टक्के पंप सरकारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत जगातील तिसरा सर्वात मोठा इंधन किरकोळ बाजार बनला आहे. पेट्रोलियम योजना आणि

पॅराग्लायडिंग करताना अपघात, पर्यटकासह दोघे आकाशातून कोसळले, एकाचा मृत्यू

बीर बिलिंग : पॅराग्लायडिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या हिमाचल प्रदेशातील 'बीर बिलिंग'मध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे.

सुपरस्टार थलापती विजयचा राजकारणासाठी फिल्मइंडस्ट्रीला रामराम; माझ्यासाठी महत्वाचे आहे कि....

मुंबई : दक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार थलापती विजयने अभिनय क्षेत्रातून बाहेर पडण्याचा मोठा निर्णय घेतला

३० कोटींच्या फसवणूक प्रकरणात विक्रम भट्ट अडचणीत, कोर्टाने जामीन अर्ज पुन्हा फेटाळला

मुंबई : दिग्दर्शक विक्रम भट्ट आणि त्यांची पत्नी श्वेतांबरी भट्ट यांना न्यायालयाकडून पुन्हा एकदा मोठा धक्का बसला

फेस स्टीम घेण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहित आहे का ?

फेस स्टीम किंवा चेहऱ्याला वाफ देण्याचे अनेक सौंदर्यदायी फायदे होतात . वाफ घेतल्यामुळे त्वचेची छिद्रे उघडतात,