Narayan Rane : बाळासाहेबांनी उभी केलेली शिवसेना उध्दव ठाकरेने संपवली

नारायण राणे यांनी केली घणाघाती टीका


कुडाळ : हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली शिवसेना गेल्या पाच वर्षांमध्ये उद्धव ठाकरे यांनी संपवली, अशी घणाघाती टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी कुपवडे येथील कार्यकर्ता मेळाव्यात करून या निवडणुकीमध्ये विकास करणाऱ्या आणि भारताला प्रगतीपथावर घेऊन जाणाऱ्या भाजप पक्षाला मतदान करा, हे मतदान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी होणार आहे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


कुपवडे येथील साई मंदिर हॉल येथे महायुतीचा कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,डॉ. मिलिंद कुलकर्णी,प्रदेश सदस्य संध्या तेरसे, मंडल अध्यक्ष दादा साईल,सरपंच दिलीप तवटे,बाळू मडव,नारायण गावडे आदी उपस्थित होते.


यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला आत्मनिर्भर बनवले जगामध्ये भारताचा दर्जा निर्माण केला. देशातील करोडो लोकांना योजनेचा लाभ मिळवून दिला. गोरगरीब जनतेसाठी ५४ योजना आणल्या आणि त्या राबविल्या असे सांगून त्यांचे हात बळकट करण्यासाठी कमळ या निशाणीवर मतदान करून पुन्हा एकदा भाजपची सत्ता घेऊन येण्यासाठी प्रत्येकाने मतदान केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.


ते पुढे म्हणाले की, ९० सालापूर्वीचा सिंधुदुर्ग आठवला तर या जिल्ह्यांमध्ये पाणी,आरोग्य, रस्ते, वीज या मूलभूत गरजांसाठी जनता त्रस्त झाली होती. मात्र आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चांगल्या सुविधा मिळत आहेत यासाठी माझ्या आयुष्यातील ३५ वर्ष राजकारण, समाजकारणाच्या माध्यमातून जिल्ह्याला दिली. या जिल्ह्याचा विकास व्हावा म्हणून माझी सातत्याने तळमळ राहिली आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीममध्ये काम करत असताना मला सार्थ अभिमान आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपले मतदान कमळ या निशाणी वर द्यावे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी अन्य मान्यवरांनी विचार व्यक्त केले.

Comments
Add Comment

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

India Slam Pakistan at UN : 'खोट्या गोष्टी पसरवण्याची पाकिस्तानला सवय', संयुक्त राष्ट्रात काश्मीर प्रश्नावर भारताची स्पष्ट भूमिका

नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रांमध्ये (UN) त्याची खरी जागा पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. जम्मू आणि

Cockroach Janta Party : नावात 'कॉकरोच' पण दिल्लीच्या उन्हात निघाली हवा! 'VIP' नेते सौरव दास यांचा सरंजामशाही चेहरा उघडा

नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत एकीकडे 'नीट २०२६' (NEET 2026) परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात विद्यार्थ्यांचा आक्रोश

Asia Cup U-18 Hockey Ind vs Pak : भारताने पाकिस्तानला नमवत गाठली अंतिम फेरी; आशिष तानी पूर्तिचा चौकार, 5-3 ने दणदणीत विजय

Mumbai : पुरुष अंडर-18 हॉकी आशिया कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर 5-3 ने पराभव केला.

Mumbai News : मुंबईत १५ वर्षांपासून बेकायदेशीर वास्तव्य? सात बांगलादेशी नागरिक अटकेत, पोलिसांचा तपास सुरू

मुंबई : मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अवैध स्थलांतराविरोधात मोठी कारवाई करत सात बांगलादेशी (Bangladeshi) नागरिकांना अटक केली

RBI Imposes Penalty on Canara Bank : RBIचा कॅनरा बँकेला झटका! KYC नियमभंग प्रकरणी ४१.८० लाखांचा दंड

देशातील सार्वजनिक क्षेत्रातील प्रमुख बँकांपैकी एक असलेल्या कॅनरा बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) मोठा दणका