Narayan Rane : बाळासाहेबांनी उभी केलेली शिवसेना उध्दव ठाकरेने संपवली

  105

नारायण राणे यांनी केली घणाघाती टीका


कुडाळ : हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली शिवसेना गेल्या पाच वर्षांमध्ये उद्धव ठाकरे यांनी संपवली, अशी घणाघाती टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी कुपवडे येथील कार्यकर्ता मेळाव्यात करून या निवडणुकीमध्ये विकास करणाऱ्या आणि भारताला प्रगतीपथावर घेऊन जाणाऱ्या भाजप पक्षाला मतदान करा, हे मतदान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी होणार आहे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


कुपवडे येथील साई मंदिर हॉल येथे महायुतीचा कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,डॉ. मिलिंद कुलकर्णी,प्रदेश सदस्य संध्या तेरसे, मंडल अध्यक्ष दादा साईल,सरपंच दिलीप तवटे,बाळू मडव,नारायण गावडे आदी उपस्थित होते.


यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला आत्मनिर्भर बनवले जगामध्ये भारताचा दर्जा निर्माण केला. देशातील करोडो लोकांना योजनेचा लाभ मिळवून दिला. गोरगरीब जनतेसाठी ५४ योजना आणल्या आणि त्या राबविल्या असे सांगून त्यांचे हात बळकट करण्यासाठी कमळ या निशाणीवर मतदान करून पुन्हा एकदा भाजपची सत्ता घेऊन येण्यासाठी प्रत्येकाने मतदान केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.


ते पुढे म्हणाले की, ९० सालापूर्वीचा सिंधुदुर्ग आठवला तर या जिल्ह्यांमध्ये पाणी,आरोग्य, रस्ते, वीज या मूलभूत गरजांसाठी जनता त्रस्त झाली होती. मात्र आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चांगल्या सुविधा मिळत आहेत यासाठी माझ्या आयुष्यातील ३५ वर्ष राजकारण, समाजकारणाच्या माध्यमातून जिल्ह्याला दिली. या जिल्ह्याचा विकास व्हावा म्हणून माझी सातत्याने तळमळ राहिली आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीममध्ये काम करत असताना मला सार्थ अभिमान आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपले मतदान कमळ या निशाणी वर द्यावे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी अन्य मान्यवरांनी विचार व्यक्त केले.

Comments
Add Comment

'प्रहार' Exclusive: शेअर बाजारात 'धोके' दुसरीकडे 'मजबूत' अर्थव्यवस्था गुंतवणूकदारांसाठी 'हा' सल्ला गेल्या आठवड्यात असा होता बाजार !

मोहित सोमण: मागील संपूर्ण आठवडा शेअर बाजारासाठी खडतर होता. सेन्सेक्स व निफ्टीत चांगले संकेत नाहीत. जागतिक

दहीहंडीला लागले गालबोट, आतापर्यंत झाले एवढे मृत्यू

मुंबई : दहीहंडी उत्साहात साजरी होत असताना मुंबईत एक दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे दहीहंडी उत्सवालाच गालबोट

Gautami Patil : काळी साडी, झटकेदार स्टेप्स आणि थरारक फ्लायिंग किस, गौतमी पाटीलने वाढवला उत्साहाचा तापमान

मुंबई : मुंबईच्या मागाठाणे येथे पारंपरिक दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. (Gautami patil dance

'शिंदेंना लॉटरी लागली, मुख्यमंत्री झाले, पण टिकवता आली... मंत्री गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंना डिवचलं

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचा वाद हा काही राज्याला नवा नाही. मंत्री गणेश नाईक

कोकण नगर आणि जय जवान गोविंदा पथकाची ऐतिहासिक कामगिरी

मुंबई : दहीहंडीच्या निमित्ताने सर्वत्र ढाकूमाकूम... चा उत्साह दिसत आहे. या उत्साही वातावरणात दोन गोविंदा पथकांनी

पुणे महानगरपालिकेच्या सुरक्षेची कमान तृतीयपंथीयांच्या हाती

पुणे : पुणे महानगरपालिकेमध्ये सध्या सुरक्षेची जबाबदारी काही तृतीयपंथीयांवर देण्यात आलेली आहे. सुरुवातीच्या