Narayan Rane : बाळासाहेबांनी उभी केलेली शिवसेना उध्दव ठाकरेने संपवली

  99

नारायण राणे यांनी केली घणाघाती टीका


कुडाळ : हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली शिवसेना गेल्या पाच वर्षांमध्ये उद्धव ठाकरे यांनी संपवली, अशी घणाघाती टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी कुपवडे येथील कार्यकर्ता मेळाव्यात करून या निवडणुकीमध्ये विकास करणाऱ्या आणि भारताला प्रगतीपथावर घेऊन जाणाऱ्या भाजप पक्षाला मतदान करा, हे मतदान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी होणार आहे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


कुपवडे येथील साई मंदिर हॉल येथे महायुतीचा कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,डॉ. मिलिंद कुलकर्णी,प्रदेश सदस्य संध्या तेरसे, मंडल अध्यक्ष दादा साईल,सरपंच दिलीप तवटे,बाळू मडव,नारायण गावडे आदी उपस्थित होते.


यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला आत्मनिर्भर बनवले जगामध्ये भारताचा दर्जा निर्माण केला. देशातील करोडो लोकांना योजनेचा लाभ मिळवून दिला. गोरगरीब जनतेसाठी ५४ योजना आणल्या आणि त्या राबविल्या असे सांगून त्यांचे हात बळकट करण्यासाठी कमळ या निशाणीवर मतदान करून पुन्हा एकदा भाजपची सत्ता घेऊन येण्यासाठी प्रत्येकाने मतदान केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.


ते पुढे म्हणाले की, ९० सालापूर्वीचा सिंधुदुर्ग आठवला तर या जिल्ह्यांमध्ये पाणी,आरोग्य, रस्ते, वीज या मूलभूत गरजांसाठी जनता त्रस्त झाली होती. मात्र आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चांगल्या सुविधा मिळत आहेत यासाठी माझ्या आयुष्यातील ३५ वर्ष राजकारण, समाजकारणाच्या माध्यमातून जिल्ह्याला दिली. या जिल्ह्याचा विकास व्हावा म्हणून माझी सातत्याने तळमळ राहिली आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीममध्ये काम करत असताना मला सार्थ अभिमान आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपले मतदान कमळ या निशाणी वर द्यावे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी अन्य मान्यवरांनी विचार व्यक्त केले.

Comments
Add Comment

रत्नागिरीत एलपीजी टँकर आणि मिनी बसचा अपघात

रत्नागिरी : चिपळूणहून रत्नागिरीकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स मिनी बसला सीएनजी गॅस घेऊन जात असलेल्या टँकरने धडक

बिश्नोई टोळीने धमकी दिल्याचा काँग्रेस नेत्याचा दावा

गाझियाबाद : उत्तर प्रदेशमधील गाझियाबादचे प्रापर्टी डीलर आणि काँग्रेस नेते अकबर चौधरी यांनी पोलिसांकडे बिश्नोई

आज होणार क्रिकेटपटू रिंकू सिंहचा साखरपुडा

लखनऊ : भारतीय क्रिकेटर रिंकू सिंह आणि समाजवादी पक्षाची खासदार प्रिया सरोज यांचा साखपुडा आज म्हणजेच रविवार ८ जून

दंगल सुरू झाल्यामुळे मणिपूरच्या पाच जिल्ह्यांत पाच दिवस इंटरनेट आणि मोबाईल नेटवर्क बंद

इंफाळ : राष्ट्रीय तपास संस्थेने अर्थात एनआयएने मैतेई ग्रुप आरंबाई टेंगोलच्या पाच जणांना अटक केली आहे. यातील एक

भारतातील २७ कोटी नागरिक गरिबीतून बाहेर

जागतिक बँकेच्या नव्या अहवालातील माहिती मोदींच्या विविध योजनांचे यश, महाराष्ट्राचा मोठा वाटा नवी दिल्ली :

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली