हाँगकाँग, सिंगापूरमध्ये भारतीय मसाला ब्रँडवर बंदी घातल्यानंतर केंद्राची कारवाई

  90

देशातील एमडीएच आणि एव्हरेस्टसह सर्व मसाले उत्पादक कंपन्यांकडून सर्व मसाल्यांचे नमुने गोळा करण्याचे आदेश


नवी दिल्ली : हाँगकाँग आणि सिंगापूरमधील अन्न नियामकांनी दोन लोकप्रिय भारतीय मसाल्यांच्या विशिष्ट उत्पादनांमध्ये कर्करोगास कारणीभूत घटक असल्याचे सांगत भारतातील मसाले निर्मिती करणाऱ्या दोन कंपन्यांच्या काही उत्पादनांवर बंदी घातली आहे. याची गंभीर दखल घेत भारतातही केंद्र सरकारने अन्न आयुक्तांना देशातील एमडीएच आणि एव्हरेस्टसह सर्व मसाले उत्पादक कंपन्यांकडून सर्व मसाल्यांचे नमुने गोळा करण्याचे आदेश दिले आहेत.



"देशातील सर्व अन्न आयुक्तांना सतर्क करण्यात आले आहे. मसाल्यांचे नमुने गोळा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तीन ते चार दिवसांत देशातील सर्व मसाल्यांच्या उत्पादन युनिटमधून नमुने गोळा केले जातील," उच्च सरकारी सूत्रांनी सांगितले.


"केवळ एमडीएच आणि एव्हरेस्टच नाही तर सर्व मसाले उत्पादक कंपन्यांकडून नमुने घेतले जातील. सुमारे २० दिवसांत लॅबमधून अहवाल येईल," असे ते पुढे म्हणाले.

Comments
Add Comment

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके

लष्करी अधिकाऱ्याकडून स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, श्रीनगर विमानतळावर नेमके घडले काय?

एका कर्मचाऱ्याच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर आणि जबड्याला गंभीर दुखापत श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील श्रीनगर

‘इस्राो’ची मंगळ तयारी

नवी दिल्ली : ३१ जुलै रोजी इस्रोने लडाखच्या त्सो कार या दुर्गम आणि मंगळ ग्रहासारख्या भासणाऱ्या प्रदेशात आपल्या

सैन्याच्या शौर्याचा काँग्रेसकडून सतत अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीत आरोप वाराणसी  : ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे