Ram Satpute : 'मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत फेटा बांधणार नाही'

  231

भाजपा आमदार राम सातपुतेंचा संकल्प


सोलापूर : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यातच सोलापूरमध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि महायुतीकडून भाजपा आमदार राम सातपुते यांच्यात लढत होणार आहे. दोन्ही उमेदवारांकडून प्रचारसभांचा धुमधडाका पाहायला मिळत आहे. रविवारच्या भगवान महावीर जयंती निमित्त सोलापुरात जैन बांधवांकडून काढण्यात आलेल्या शोभायात्रेत राम सातपुते उपस्थित होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर महत्वाचे विधान केले आहे.


'जोपर्यंत मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत डोक्यावर फेटा बांधणार नाही,' असा संकल्प सोलापूर लोकसभा मतदार संघातील भाजपाचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी केला आहे. लोकसभा निवडणुक प्रचारादरम्यान माध्यमांशी बोलताना सातपुते यांनी आपली भावना व्यक्त केली.



राम सातपुते यांचा काँग्रेसवर आरोप


"मराठा समाजातील सर्व कार्यकर्त्यांसमोर मी संकल्प केला आहे. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही अथवा मार्गी लागत नाही तोपर्यंत मी फेटा घालणार नाही. निवडून आल्यानंतरही मी फेटा घालणार नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न संपल्यानंतरच मी फेटा घालणार आहे," असे त्यांनी यावेळी नमूद केले.


"हिंदू लिंगायत समाजातील नेहा हिरेमठ या युवतीची फैयाज शेख नामक जिहादी मानसिकतेच्या तरुणाने हत्या केली. या घटनेचा मी निषेध करतो. तसेच मोदीजींना पाडण्यासाठी सोलापुरात मशिदीतून फतवे निघत आहेत. मशिदीतून फतवे काढून संविधानाला आव्हान देण्याचे काम काँग्रेसचे लोक करत आहेत," असा आरोपही यावेळी राम सातपुतेंनी केला.

Comments
Add Comment

99th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मान यावर्षी साताऱ्याला!

तब्बल ३२ वर्षानंतर भरवले जाणार चौथे संमेलन पुणे:  यंदाचे 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (99th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan)

अशोक नगरमधील पालिकेच्या मैदानाला तलावाचे स्वरूप

नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही पालिकेचे दुर्लक्ष कांदिवली : कांदिवली पूर्वेला अशोक नगरमधील एकमेव असलेल्या

पुण्यात भिडे पूल दीड महिना बंद

पुणे : सदाशिवपेठेतून डेक्कन मेट्रो स्थानकात जाण्यासाठी महामेट्रोकडून भिडे पुलावरून लोखंडी पादचारी पूल

महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची

आरबीएलतर्फे विद्यार्थिनींना सायकलसह शालेय साहित्याचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे

ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री ८ वाजता

पुणे : आषाढी वारीतील संत ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री आठ वाजता होणार आहे.

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण