Ram Satpute : 'मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत फेटा बांधणार नाही'

भाजपा आमदार राम सातपुतेंचा संकल्प


सोलापूर : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यातच सोलापूरमध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि महायुतीकडून भाजपा आमदार राम सातपुते यांच्यात लढत होणार आहे. दोन्ही उमेदवारांकडून प्रचारसभांचा धुमधडाका पाहायला मिळत आहे. रविवारच्या भगवान महावीर जयंती निमित्त सोलापुरात जैन बांधवांकडून काढण्यात आलेल्या शोभायात्रेत राम सातपुते उपस्थित होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर महत्वाचे विधान केले आहे.


'जोपर्यंत मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत डोक्यावर फेटा बांधणार नाही,' असा संकल्प सोलापूर लोकसभा मतदार संघातील भाजपाचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी केला आहे. लोकसभा निवडणुक प्रचारादरम्यान माध्यमांशी बोलताना सातपुते यांनी आपली भावना व्यक्त केली.



राम सातपुते यांचा काँग्रेसवर आरोप


"मराठा समाजातील सर्व कार्यकर्त्यांसमोर मी संकल्प केला आहे. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही अथवा मार्गी लागत नाही तोपर्यंत मी फेटा घालणार नाही. निवडून आल्यानंतरही मी फेटा घालणार नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न संपल्यानंतरच मी फेटा घालणार आहे," असे त्यांनी यावेळी नमूद केले.


"हिंदू लिंगायत समाजातील नेहा हिरेमठ या युवतीची फैयाज शेख नामक जिहादी मानसिकतेच्या तरुणाने हत्या केली. या घटनेचा मी निषेध करतो. तसेच मोदीजींना पाडण्यासाठी सोलापुरात मशिदीतून फतवे निघत आहेत. मशिदीतून फतवे काढून संविधानाला आव्हान देण्याचे काम काँग्रेसचे लोक करत आहेत," असा आरोपही यावेळी राम सातपुतेंनी केला.

Comments
Add Comment

बीएमसी शाळा खासगीकरण वादाने अधिवेशन तापले; अस्लम शेख–लोढा आमनेसामने

नागपूर : मालवणीतील बीएमसी टाऊनशिप शाळेच्या मुद्द्यावरून मालाड पश्चिमचे आमदार अस्लम शेख आणि मुंबई उपनगरचे

मंदिरांच्या जमिनी वाचवण्यासाठी विशेष कायदा करा!

नागपूर : भूमाफियांनी राज्यातील देवस्थानांच्या शेकडो एकर शेतजमिनी हडपल्याने त्यांच्या संरक्षणासाठी गुजरात आणि

छोटी राज्ये चांगल्या प्रकारे विकसित होऊ शकतात! - वेगळ्या विदर्भाबाबतच्या प्रश्नावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे उत्तर

नागपूर : "छोटी राज्ये ही अधिक चांगल्या प्रकारे विकसित होऊ शकतात. त्यामुळे याबाबत भाजपचा नेहमीच पुढाकार राहिला

संगमनेर येथील 'पोकळी हिस्से' नोंदीचा प्रश्न मार्गी

नागपूर : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील इंदिरा नगर भागात सर्वे

पुण्यात पोर्शे कार अपघात प्रकरणी पोलिसांविरोधात मोठी कारवाई

पुणे : पुण्याच्या कल्याणीनगर भागात १९ मे २०२४ रोजी पोर्शे कारचा अपघात झाला होता. पोर्शे कारने अश्विनी कोस्टा आणि

नाशिक - पुणे रेल्वे मार्गात बदल, अहिल्यानगरचे नागरिक नाराज

नागपूर : कित्येक वर्षांपासून बहुचर्चित नाशिक - पुणे लोहमार्ग होण्याच्या दिशेने गंभीरपणे हालचाली सुरू झाल्या