Kunwar Sarvesh Kumar : धक्कादायक! मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी भाजपा उमेदवाराचा मृत्यू

निवडणुकीचे आता पुढे होणार काय?


मुरादाबाद : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी पार पडलं. आता २६ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. यादरम्यान, भाजपाच्या एका उमेदवाराचं मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी निधन झाल्याची धक्कादायक घटना घडली. भाजपाचे माजी खासदार आणि मुरादाबाद लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार कुंवर सर्वेश कुमार सिंह (७२) यांचे काल दु:खद निधन झाले.


मिळालेल्या माहितीनुसार, कुंवर सर्वेश सिंह यांच्या गळ्याला त्रास होत होता व त्याचं ऑपरेशन करण्यात आलं होतं. १९ एप्रिल रोजी ते तपासणीसाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात गेले होते मात्र त्यांनी रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला.


माजी खासदार कुंवर सर्वेश सिंह यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला. मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार आणि माजी खासदार कुंवर सर्वेश सिंह यांच्या निधनाने धक्का बसला. भाजपासाठी ही कधीही न भरून येणारी हानी आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले. तसेच 'भाजपाचे नेते आणि मुरादाबादमधील भाजपा कार्यकर्त्यांचे प्रेरणास्रोत माजी खासदार कुंवर सिंह यांच्या आकस्मिक निधनाने मोठा धक्का बसला. कुंवर सर्वेश सिंह यांचं निधन फक्त मुरादाबाद नव्हे तर उत्तर प्रदेशातील भाजपासाठी मोठं नुकसान असल्याचं' भूपेंद्र सिंह चौधरी यांनी म्हटले.



निवडणुकीचे पुढे काय होणार?


सिंह यांच्या मृत्यूची बातमी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली असून याबाबत निवडणुकीवर काहीही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट केले. मतमोजणी ठरलेल्या दिवशीच केली जाणार. कुंवर सर्वेश सिंह हे विजयी ठरले तर पोटनिवडणूक घेतली जाईल व पराभव झाल्यास काही फरक पडणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Shopian Terror Case : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन संशयितांना अटक, हँड ग्रेनेड आणि पोस्टर्स जप्त

श्रीनगर : काश्मिरी पंडितांना असलेला धोका आणि दक्षिण काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:

Artificial Intelligence : शिक्षणात AI चा वाढता प्रभाव, भारताची शैक्षणिक व्यवस्था आता बदलणार

मुंबई : AI आता फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते थेट वर्गखोल्यांपर्यंत पोहोचलं आहे. पण

Kashmiri Pandit Threat Letter : काश्मिरी पंडितांना १५ दिवसांत दुसऱ्यांदा धमकीचं पत्र; वैयक्तिक माहिती व्हायरल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काश्मिरी

Tamil Nadu Gold Ring Scheme : ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर; ७५५ कोटींचा खर्च, ‘या’ बाळांना मिळणार १ ग्रॅम सोनं!

चेन्नई : तामिळनाडू सरकारने तब्बल ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर दिल्याने सध्या या निर्णयाची चर्चा सुरू

INS Mangrol : ‘आयएनएस मंगरोल'मुळे नौदलाची ताकद वाढली; पाण्याखालील शत्रूंच्या हालचालींवर ठेवणार नजर!

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढली आहे. स्वदेशी बनावटीची ‘आयएनएस मंगरोल’ (INS Mangrol) ही पाणबुडीविरोधी