Kunwar Sarvesh Kumar : धक्कादायक! मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी भाजपा उमेदवाराचा मृत्यू

निवडणुकीचे आता पुढे होणार काय?


मुरादाबाद : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी पार पडलं. आता २६ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. यादरम्यान, भाजपाच्या एका उमेदवाराचं मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी निधन झाल्याची धक्कादायक घटना घडली. भाजपाचे माजी खासदार आणि मुरादाबाद लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार कुंवर सर्वेश कुमार सिंह (७२) यांचे काल दु:खद निधन झाले.


मिळालेल्या माहितीनुसार, कुंवर सर्वेश सिंह यांच्या गळ्याला त्रास होत होता व त्याचं ऑपरेशन करण्यात आलं होतं. १९ एप्रिल रोजी ते तपासणीसाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात गेले होते मात्र त्यांनी रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला.


माजी खासदार कुंवर सर्वेश सिंह यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला. मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार आणि माजी खासदार कुंवर सर्वेश सिंह यांच्या निधनाने धक्का बसला. भाजपासाठी ही कधीही न भरून येणारी हानी आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले. तसेच 'भाजपाचे नेते आणि मुरादाबादमधील भाजपा कार्यकर्त्यांचे प्रेरणास्रोत माजी खासदार कुंवर सिंह यांच्या आकस्मिक निधनाने मोठा धक्का बसला. कुंवर सर्वेश सिंह यांचं निधन फक्त मुरादाबाद नव्हे तर उत्तर प्रदेशातील भाजपासाठी मोठं नुकसान असल्याचं' भूपेंद्र सिंह चौधरी यांनी म्हटले.



निवडणुकीचे पुढे काय होणार?


सिंह यांच्या मृत्यूची बातमी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली असून याबाबत निवडणुकीवर काहीही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट केले. मतमोजणी ठरलेल्या दिवशीच केली जाणार. कुंवर सर्वेश सिंह हे विजयी ठरले तर पोटनिवडणूक घेतली जाईल व पराभव झाल्यास काही फरक पडणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने