Kunwar Sarvesh Kumar : धक्कादायक! मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी भाजपा उमेदवाराचा मृत्यू

निवडणुकीचे आता पुढे होणार काय?


मुरादाबाद : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी पार पडलं. आता २६ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. यादरम्यान, भाजपाच्या एका उमेदवाराचं मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी निधन झाल्याची धक्कादायक घटना घडली. भाजपाचे माजी खासदार आणि मुरादाबाद लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार कुंवर सर्वेश कुमार सिंह (७२) यांचे काल दु:खद निधन झाले.


मिळालेल्या माहितीनुसार, कुंवर सर्वेश सिंह यांच्या गळ्याला त्रास होत होता व त्याचं ऑपरेशन करण्यात आलं होतं. १९ एप्रिल रोजी ते तपासणीसाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात गेले होते मात्र त्यांनी रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला.


माजी खासदार कुंवर सर्वेश सिंह यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला. मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार आणि माजी खासदार कुंवर सर्वेश सिंह यांच्या निधनाने धक्का बसला. भाजपासाठी ही कधीही न भरून येणारी हानी आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले. तसेच 'भाजपाचे नेते आणि मुरादाबादमधील भाजपा कार्यकर्त्यांचे प्रेरणास्रोत माजी खासदार कुंवर सिंह यांच्या आकस्मिक निधनाने मोठा धक्का बसला. कुंवर सर्वेश सिंह यांचं निधन फक्त मुरादाबाद नव्हे तर उत्तर प्रदेशातील भाजपासाठी मोठं नुकसान असल्याचं' भूपेंद्र सिंह चौधरी यांनी म्हटले.



निवडणुकीचे पुढे काय होणार?


सिंह यांच्या मृत्यूची बातमी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली असून याबाबत निवडणुकीवर काहीही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट केले. मतमोजणी ठरलेल्या दिवशीच केली जाणार. कुंवर सर्वेश सिंह हे विजयी ठरले तर पोटनिवडणूक घेतली जाईल व पराभव झाल्यास काही फरक पडणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

निवडणूक आयोगाकडून मतदानासाठी १२ पर्यायी ओळखपत्रे मंजूर

नवी दिल्ली  : देशभरातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने एक महत्त्वाचे निर्देश जारी केले

सावित्री जिंदाल देशातील सर्वात श्रीमंत महिला; फोर्ब्स इंडियाची यादी जाहीर

नवी दिल्ली : हरियाणा हिसारच्या आमदार आणि ओपी जिंदाल ग्रुपच्या प्रमुख सावित्री जिंदाल या फोर्ब्स इंडियाच्या २०२५

बिहारसाठी ‘एनडीए’चे जागावाटप

विधानसभेच्या २४३ जागांमध्ये १०१ जेडीयू , १०० भाजप , २९ लोजप (आर), ७ हिंदुस्तानी अवामी मोर्चा आणि ६ राष्ट्रीय लोक

कैद्यांना तुरुंगात मतदानाचा हक्क मिळणार?

केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने बजावली नोटीस नवी दिल्ली : तुरुंगात असलेल्या विचाराधीन

फटाक्यांच्या मुद्द्यावर केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये

नवी दिल्ली : २० ऑक्टोबर रोजी भारत आणि जगभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर

पंतप्रधान धन धान्य कृषी योजनेमुळे शेतकऱ्यांना विशेष फायदा

मंत्री नितेश राणे यांनी दिली माहिती मुंबई : पंतप्रधान धन धान्य कृषी योजना, राष्ट्रीय डाळी अभियान तसेच कृषी