Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरे पहिले निष्क्रिय मुख्यमंत्री!

नालायक लोकांच्या सर्वेक्षणात उद्धव ठाकरे टॉपला असतील


चंद्रशेखर बावनकुळे यांचा हल्लाबोल


मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलेले दावे आणि टीकांमुळे भाजप नेते प्रचंड संतापले आहेत. त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा 'नालायक' असा उल्लेख केला. उद्धव ठाकरेंनी पातळी सोडून वक्तव्य केल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी त्यांना खडे बोल सुनावले आहेत. सोबतच आदित्य ठाकरेंवरही (Aditya Thackeray) हल्लाबोल केला आहे.


चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, जगातील कोणत्याही एजन्सीमार्फत १४ कोटी जनतेचं सर्वेक्षण केलं तरी या महाराष्ट्रातील लायक व्यक्तींच्या यादीत टॉप क्रमांक एकला माननीय देवेंद्र फडणवीस यांचं नाव असेल. कारण मुख्यमंत्री आणि संवेदनशील नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव जनतेच्या मनामनांत आहे. तसंच महाराष्ट्रातील सर्वात नालायक लोकांचं जर दुसरं सर्वेक्षण केलं तर त्यात सर्वात टॉपला उद्धव ठाकरे दिसतील, अशी जहरी टीका बावनकुळे यांनी केली.


पुढे ते म्हणाले, उद्धव ठाकरेंनी कार्यकाळात काय केलं ते माहित आहे. अडीच वर्षे खिशात पेन नसलेला मुख्यमंत्री, अडीच वर्षे विधानमंडळात दोनदा आलेला मुख्यमंत्री, अडीच वर्षांत दोनच तास मंत्रालयात आलेला मुख्यमंत्री, असा त्यांचा कार्यकाळ या १४ कोटी जनेतेने पाहिला आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादी आणि इतिहास पाहिला तर पहिला निष्क्रीय मुख्यमंत्री, राज्याला नापसंत असलेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहे. ते मनोरुग्णासारखे, मानसिक स्थिती ढासळल्यासारखे वागतायत. त्यांना लवकरच एखाद्या हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज आहे, असं मला वाटतं, असं बावनकुळे म्हणाले.



उद्धव ठाकरेंच्या दाव्यावर बावनकुळेंचं प्रत्युत्तर


देवेंद्र फडणवीस आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचं ट्रेनिंग देऊन मग राष्ट्रीय राजकारणात सहभागी होणार होते, असा दावा उद्धव ठाकरे यांनी एका मुलाखतीदरम्यान केला. यावर बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, आदित्य ठाकरेंना कधीच कुणी मुख्यमंत्री काय मंत्रीही केलं नसतं. त्याची काय लायकी आहे? कुठली पंचायत ते पार्लामेंट त्यांनी काम केलं आहे? कधी रेशनकार्ड, आधारकार्ड काढलं आहे? चुकून ते एका मतदारसंघात निवडून आले आहेत, काही वेळेस असं होऊ शकतं. पण त्यांची लायकी आहे का? कोण असा शब्द देईल त्यांना?, असं बावनकुळे म्हणाले.

Comments
Add Comment

रविवार १ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि

मुंबईतील महापालिका प्रकल्प कामांना मिळणार गती, पुढील महिन्यात ताब्यात येणार १५०० प्रकल्पबाधितांसाठीच्या सदनिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : प्रकल्पबाधित नागरिकांच्या पुनर्वसनासाठी मुंबईतील महापालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय

मनरेगा मजुरांची होळी होणार आनंदात साजरी

केंद्राकडून १,१३८ कोटींची थकीत मजुरी मंजूर केंद्र सरकारकडून तब्बल ११३८ कोटी रुपयांची थकीत मजुरी राज्याला

'मुलांनी आणि तरुणांनी मराठी भाषा विसरू नये'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : इतर भाषांच्या प्रभावाखाली मराठी भाषा हळूहळू नाहीशी होईल, अशी भीती व्यक्त केली जाते. पण,

'या' तारखेला दिसणार महराष्ट्रात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार

मुंबई : यावर्षी जगात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण दिसत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच

उच्च व तंत्रशिक्षण मध्ये पदभरती प्रक्रियेत बदल करण्याच्या सूचनेचा विचार करू – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षणमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासन