Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरे पहिले निष्क्रिय मुख्यमंत्री!

नालायक लोकांच्या सर्वेक्षणात उद्धव ठाकरे टॉपला असतील


चंद्रशेखर बावनकुळे यांचा हल्लाबोल


मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलेले दावे आणि टीकांमुळे भाजप नेते प्रचंड संतापले आहेत. त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा 'नालायक' असा उल्लेख केला. उद्धव ठाकरेंनी पातळी सोडून वक्तव्य केल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी त्यांना खडे बोल सुनावले आहेत. सोबतच आदित्य ठाकरेंवरही (Aditya Thackeray) हल्लाबोल केला आहे.


चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, जगातील कोणत्याही एजन्सीमार्फत १४ कोटी जनतेचं सर्वेक्षण केलं तरी या महाराष्ट्रातील लायक व्यक्तींच्या यादीत टॉप क्रमांक एकला माननीय देवेंद्र फडणवीस यांचं नाव असेल. कारण मुख्यमंत्री आणि संवेदनशील नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव जनतेच्या मनामनांत आहे. तसंच महाराष्ट्रातील सर्वात नालायक लोकांचं जर दुसरं सर्वेक्षण केलं तर त्यात सर्वात टॉपला उद्धव ठाकरे दिसतील, अशी जहरी टीका बावनकुळे यांनी केली.


पुढे ते म्हणाले, उद्धव ठाकरेंनी कार्यकाळात काय केलं ते माहित आहे. अडीच वर्षे खिशात पेन नसलेला मुख्यमंत्री, अडीच वर्षे विधानमंडळात दोनदा आलेला मुख्यमंत्री, अडीच वर्षांत दोनच तास मंत्रालयात आलेला मुख्यमंत्री, असा त्यांचा कार्यकाळ या १४ कोटी जनेतेने पाहिला आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादी आणि इतिहास पाहिला तर पहिला निष्क्रीय मुख्यमंत्री, राज्याला नापसंत असलेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहे. ते मनोरुग्णासारखे, मानसिक स्थिती ढासळल्यासारखे वागतायत. त्यांना लवकरच एखाद्या हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज आहे, असं मला वाटतं, असं बावनकुळे म्हणाले.



उद्धव ठाकरेंच्या दाव्यावर बावनकुळेंचं प्रत्युत्तर


देवेंद्र फडणवीस आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचं ट्रेनिंग देऊन मग राष्ट्रीय राजकारणात सहभागी होणार होते, असा दावा उद्धव ठाकरे यांनी एका मुलाखतीदरम्यान केला. यावर बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, आदित्य ठाकरेंना कधीच कुणी मुख्यमंत्री काय मंत्रीही केलं नसतं. त्याची काय लायकी आहे? कुठली पंचायत ते पार्लामेंट त्यांनी काम केलं आहे? कधी रेशनकार्ड, आधारकार्ड काढलं आहे? चुकून ते एका मतदारसंघात निवडून आले आहेत, काही वेळेस असं होऊ शकतं. पण त्यांची लायकी आहे का? कोण असा शब्द देईल त्यांना?, असं बावनकुळे म्हणाले.

Comments
Add Comment

'महाराष्ट्र सागरी मंडळाच्या इमारतीला आकारलेले विस्तारित शुल्क रद्द करून भाडे दर कमी करावेत'

मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथे महाराष्ट्र सागरी मंडळाच्या प्रस्तावित कार्यालयीन इमारतीच्या

Nitesh Rane on Nashik Tree Cutting : 'वृक्षतोडीवर आक्षेप, मग बकरी कापताना गप्प का?' पर्यावरणाच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांना मंत्री नितेश राणेंचा तिखट सवाल!

मुंबई : नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा २०२७ (Kumbh Mela 2027) च्या भव्य तयारीला सुरुवात झाली असताना, साधूग्राम उभारणीसाठी

हनुमान रोड मेट्रो स्टेशनला डॉ. रमेश प्रभू यांचे नाव देणार

मुंबई : शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे विलेपार्ल्याचे माजी आमदार व

गोरेगावमधील मलनिस्सारण वाहिनीच्या खोदकामामुळे नागरिक हैराण

भाजपच्या माजी नगरसेविकेने अधिकाऱ्यांना घेतले फैलावर मुंबई  : गोरेगाव पूर्व येथील आरे भास्कर मार्गावर मल जल

आज-उद्या-परवा समुद्रकिनाऱ्यावर काळजी घ्या!

४ ते ७ डिसेंबर दरम्यान सलग तीन दिवस मोठी भरती मुंबई : मुंबईमधील समुद्रकिनाऱ्यांवर फेरफटका कारण्यासाठी जाणारे

निकाल लागून ४५ दिवसांनंतरही भरती प्रक्रिया मंदावलेलीच!

वैद्यकीय आरोग्य अधिकारी भरती प्रक्रियेत गोंधळ निकालानंतर ‘अतिरिक्त गुण’ नियम बदलाचा निर्णय वैद्यकीय आरोग्य